शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
3
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
4
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
5
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
6
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
7
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
8
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
9
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
10
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
11
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
12
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
13
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
14
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
15
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
16
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
17
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
18
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
19
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
20
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  

आदित्यचा भाजपाला सल्ला..!

By अतुल कुलकर्णी | Published: January 17, 2018 2:54 AM

दादरला भाजपा पक्ष पदाधिकाºयांच्या बैठकीत एका कार्यकर्त्याने त्याच्या भावना व्यक्त करणारे पत्र लिहून आणले. ते पत्र प्रदेशाध्यक्षांनी वाचून दाखवले, ते असे...

(दादरला भाजपा पक्ष पदाधिकाºयांच्या बैठकीत एका कार्यकर्त्याने त्याच्या भावना व्यक्त करणारे पत्र लिहून आणले. ते पत्र प्रदेशाध्यक्षांनी वाचून दाखवले, ते असे...)नेते मंडळीहो,नमस्कार. झालेल्या मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा. तुम्हाला मंत्रिपदाच्या खुर्च्या मिळाल्या आहेतच. आता तीळगूळपण आमचाच घ्या आणि जमलं तर आमच्याशी थोड कडूपण बोला... तुमच्या एवढ्या गोड बोलण्याची आम्हाला सवय लागली तर पुढं कसं होणार आमचं. मी पक्षाच्या बैठकीला निघालो तर वाटेत आदित्य ठाकरे भेटले. मला काय काय सांगू लागले... ते ऐकून काय प्रतिक्रिया द्यावी हे मला काही कळलं नाही. आपण सगळे ज्येष्ठ नेते जमणारच आहात तर तेव्हा आदित्यनी जे काय सांगितलं ते तुमच्या कानावर घालावं म्हणून हा पत्रप्रपंच. त्यावर आपणच योग्य ते मार्गदर्शन केलं तर बरे. आदित्य, गिरीश बापटांचे खूप कौतुक करत होते. म्हणाले तुमच्याकडे एकमेव दिव्यदृष्टी प्राप्त असणारा नेता तेवढाचयं... बापटांनी सांगून टाकलयं, की वर्षभरात सरकार बदलणार आहेच, जे काय मागायंच ते आत्ताच मागून टाका... पण तुम्ही काही कार्यकर्ते, पदाधिकाºयांचे फार मनावर घेऊ नका. काही कुणाला द्यायची गरज नाही असा सल्ला दिलाय आदित्यनी. ते म्हणाले, महामंडळं, विशेष कार्यकारी अधिकारी अशा अनेक गोष्टी असतानाही तीन वर्षे तुम्हाला कोणी काही मागीतलं का? आता उरलेल्या दीड वर्षातही तुम्हाला कुणीही काहीही मागणार नाही, तुम्हीदेखील काही देण्याच्या भानगडीत पडू नये. दीड वर्षात तुम्ही काय देणार आणि आम्ही कार्यकर्ते काय घेणार? तेव्हा देण्याघेण्याच्या गोष्टी बाजूलाच राहू द्याव्यात असा त्यांचा सल्ला आहे. मलाही पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून तो पटलाय. उगाच नको ते व्यवहार कशाला?पक्ष कसा वाढवायचा यासाठी आपण बैठक घेत आहात त्याबद्दल आपले अभिनंदन करायला सांगितलं आदित्यनी मला. पण ते असंही म्हणाले, की पक्ष वाढवण्यासाठी तुमच्या कुणाचीही गरज उरलेली नाही. कार्य सिद्धीस नेण्यास ‘मामु’ (माननीय मुख्यमंत्री) समर्थ आहेत. ते एकटेच दिवसातील सगळे तास सतत काम करत असतात. त्यांनी एक सर्वे केलाय म्हणे. त्यात असं लक्षात आलंय की, तुम्ही केलेले घोळ दुरुस्त करण्यातच त्यांचा जास्त वेळ जातोय. तेव्हा तुम्ही जेवढे कमी घोटाळे कराल तेवढा जास्त वेळ ‘मामु’ना विधायक कामांसाठी मिळेल असा त्यांचा सल्ला होता. परवा तर म्हणे, ‘मामु’नी एका मंत्र्याला बोलावून सांगितले म्हणे, की तुमच्या मुलाला, पीएसला व ओएसडीला एकदम शांत बसायला सांगा नाहीतर तुमचा खडसे करून टाकीन... हे खरं की खोटं, की ‘मामु’बद्दल उगाच वावड्या आहेत ते पण तपासून घ्या. जाता जाता आदित्य असंही म्हणाले की, आपल्या पक्षात म्हणे पाच दहा हजारांची सभा घेणारा एकही नेता नाही. त्यावर मी त्याला सुधीरभाऊ, पंकजाताई अशी काही नावं सांगितली तर तो म्हणतो, ते अपवाद सोडून सभा गाजवणारा, भाषणं गाजवणारा एकपण नेता आपल्याकडे उरला नाही असे त्यांचे म्हणणे होते. त्यावर पण रावसाहेबांना विचारा काय करायचं ते. बाकी काळजी नको. आपले सगळे आमदार बसल्या जागी आरामात निवडून येणार आहेतच...

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेBJPभाजपा