शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

Adhyatmik : नम: सभाभ्य:

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 00:25 IST

प्रजाहितदक्ष हे छत्रपती शिवरायांचे विशेष भूषण. प्रजेची, रयतेची काळजी आद्य मानून ‘जाहले शिवाजी छत्रपती महाराज.’ राजा प्रजाहितदक्ष असतो तेव्हा परदास्याचे बंध तुटतात. लोकशाहीचे बीज विश्वामध्ये प्रथम भारतीयांनीच पेरले. हजारो वर्षांपूर्वीपासून लोकशाहीची पाळेमुळे म्हणूनच या देशात घट्ट रुजली आहेत. वैदिक काळापासूनची ही परंपरा दृढ झाली आहे.

- डॉ. गोविंद काळेप्रजाहितदक्ष हे छत्रपती शिवरायांचे विशेष भूषण. प्रजेची, रयतेची काळजी आद्य मानून ‘जाहले शिवाजी छत्रपती महाराज.’ राजा प्रजाहितदक्ष असतो तेव्हा परदास्याचे बंध तुटतात. लोकशाहीचे बीज विश्वामध्ये प्रथम भारतीयांनीच पेरले. हजारो वर्षांपूर्वीपासून लोकशाहीची पाळेमुळे म्हणूनच या देशात घट्ट रुजली आहेत. वैदिक काळापासूनची ही परंपरा दृढ झाली आहे.भगवान शंकराला प्रिय असलेल्या ‘रुद्रसूक्त’मधील ऋषी म्हणतात ‘नम: सभाभ्य: सभापतिश्च वो नमो’ सभेला पहिला नमस्कार. नंतर सभापतीला. सभा आहे म्हणून सभापती. शंकराच्या अभिषेकासाठी म्हटले जाणारे हे वेदमंत्र पाच हजार वर्षांपूर्वीचे आहेत. पाच हजार वर्षांपूर्वी आमच्या पूर्वजांनी लोकशाहीचा डंका पिटला. भगवंतांनी गीतेमध्ये ‘लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि’ असे अर्जुनाला सांगताना लोकमहतीला प्राधान्य दिले आहे. संस्कृत साहित्यातील लोकशाहीच्या वैश्विक विचारमूल्यांचे जतन संवर्धन पुढे संतसाहित्याने केले. ‘वक्ता वक्ताचि नोहे श्रोतेविण’ असे माउली लिहिती झाली. सभा आहे म्हणून सभापती, श्रोतृवर्ग आहे म्हणून वक्ता, लोक आहेत म्हणून नेता. लोकशाही म्हणून संसद, समर्थांनी ‘जनाचा प्रवाह चालिला पाहिजे/ जन ठायी ठायी तुंबला म्हणजे खोटे’ असे सांगताना जनप्रवाह म्हणजे लोकमताचाच आदर केला.आपल्या विचारवंतांनी लोककल्याणाचेच गीत गायले. यद्यपि सिद्धम् लोकविरुद्धम/ नाकरणीयम् नाचरणीयम्’ हे विचार लोकशाहीची पाळेमुळे बळकट करणारेच आहेत. व्यक्तिगत स्वार्थापोटी जाणीवपूर्वक डावलण्याचे प्रयत्न आपण करतो. घरामध्ये कामधेनू असताना शेजाऱ्याकडे आपण ताक मागतो हा राष्टÑ दैवदुर्विलासच मानावा लागेल. शंकरापेक्षा सुद्धा लोकशंकराचे स्थान लोकशाहीत मोठे. आपण लोक शंकराची कवाडे बंद करून टाकली आहेत असे म्हणण्याची पाळी येऊ नये. ‘आम्ही चालवू हा पुढे वारसा’ हे गीत आळवणाºयांनी वेळीच सावध होऊन कार्यरत झाले पाहिजे. वारसा जपला पाहिजे. बॅ. नाथ पैंनी लोकसभेत लोकशाहीच्या पुष्ट्यर्थ ‘लोकशक्ति: विशिष्यते’ हा श्लोक खासदारांना अनेकवेळा ऐकविला होता. राजसत्तेचे अधिष्ठान लोकशक्ती आहे. राजसत्ता आणि लोकसत्ता यामध्ये दुरावा निर्माण होत असेल तर लोकशाहीच्या बाजूनेच राहिले पाहिजे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक