शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

Adhyatmik : नम: सभाभ्य:

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 00:25 IST

प्रजाहितदक्ष हे छत्रपती शिवरायांचे विशेष भूषण. प्रजेची, रयतेची काळजी आद्य मानून ‘जाहले शिवाजी छत्रपती महाराज.’ राजा प्रजाहितदक्ष असतो तेव्हा परदास्याचे बंध तुटतात. लोकशाहीचे बीज विश्वामध्ये प्रथम भारतीयांनीच पेरले. हजारो वर्षांपूर्वीपासून लोकशाहीची पाळेमुळे म्हणूनच या देशात घट्ट रुजली आहेत. वैदिक काळापासूनची ही परंपरा दृढ झाली आहे.

- डॉ. गोविंद काळेप्रजाहितदक्ष हे छत्रपती शिवरायांचे विशेष भूषण. प्रजेची, रयतेची काळजी आद्य मानून ‘जाहले शिवाजी छत्रपती महाराज.’ राजा प्रजाहितदक्ष असतो तेव्हा परदास्याचे बंध तुटतात. लोकशाहीचे बीज विश्वामध्ये प्रथम भारतीयांनीच पेरले. हजारो वर्षांपूर्वीपासून लोकशाहीची पाळेमुळे म्हणूनच या देशात घट्ट रुजली आहेत. वैदिक काळापासूनची ही परंपरा दृढ झाली आहे.भगवान शंकराला प्रिय असलेल्या ‘रुद्रसूक्त’मधील ऋषी म्हणतात ‘नम: सभाभ्य: सभापतिश्च वो नमो’ सभेला पहिला नमस्कार. नंतर सभापतीला. सभा आहे म्हणून सभापती. शंकराच्या अभिषेकासाठी म्हटले जाणारे हे वेदमंत्र पाच हजार वर्षांपूर्वीचे आहेत. पाच हजार वर्षांपूर्वी आमच्या पूर्वजांनी लोकशाहीचा डंका पिटला. भगवंतांनी गीतेमध्ये ‘लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि’ असे अर्जुनाला सांगताना लोकमहतीला प्राधान्य दिले आहे. संस्कृत साहित्यातील लोकशाहीच्या वैश्विक विचारमूल्यांचे जतन संवर्धन पुढे संतसाहित्याने केले. ‘वक्ता वक्ताचि नोहे श्रोतेविण’ असे माउली लिहिती झाली. सभा आहे म्हणून सभापती, श्रोतृवर्ग आहे म्हणून वक्ता, लोक आहेत म्हणून नेता. लोकशाही म्हणून संसद, समर्थांनी ‘जनाचा प्रवाह चालिला पाहिजे/ जन ठायी ठायी तुंबला म्हणजे खोटे’ असे सांगताना जनप्रवाह म्हणजे लोकमताचाच आदर केला.आपल्या विचारवंतांनी लोककल्याणाचेच गीत गायले. यद्यपि सिद्धम् लोकविरुद्धम/ नाकरणीयम् नाचरणीयम्’ हे विचार लोकशाहीची पाळेमुळे बळकट करणारेच आहेत. व्यक्तिगत स्वार्थापोटी जाणीवपूर्वक डावलण्याचे प्रयत्न आपण करतो. घरामध्ये कामधेनू असताना शेजाऱ्याकडे आपण ताक मागतो हा राष्टÑ दैवदुर्विलासच मानावा लागेल. शंकरापेक्षा सुद्धा लोकशंकराचे स्थान लोकशाहीत मोठे. आपण लोक शंकराची कवाडे बंद करून टाकली आहेत असे म्हणण्याची पाळी येऊ नये. ‘आम्ही चालवू हा पुढे वारसा’ हे गीत आळवणाºयांनी वेळीच सावध होऊन कार्यरत झाले पाहिजे. वारसा जपला पाहिजे. बॅ. नाथ पैंनी लोकसभेत लोकशाहीच्या पुष्ट्यर्थ ‘लोकशक्ति: विशिष्यते’ हा श्लोक खासदारांना अनेकवेळा ऐकविला होता. राजसत्तेचे अधिष्ठान लोकशक्ती आहे. राजसत्ता आणि लोकसत्ता यामध्ये दुरावा निर्माण होत असेल तर लोकशाहीच्या बाजूनेच राहिले पाहिजे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक