शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

आडम मास्तर, तुमचं जरा चुकलंच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2019 11:43 IST

नरसय्या आडम यांच्यासारख्या कडव्या कम्युनिष्ट ‘मास्तरा’ने सोलापुरात जाहीर व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुणगान गायल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

- नंदकिशोर पाटील

उजव्या, प्रतिगामी आणि तितक्याच असहिष्णू मनोवृत्तीची पिलावळ अंगाखांद्यावर बाळगणाऱ्या सध्याच्या राजकीय वर्तमानाला काँग्रेस, समाजवादी आणि डाव्यांसहित समस्त समविचारी पक्षांनी कडवे आव्हान उभे केलेले असताना नरसय्या आडम यांच्यासारख्या कडव्या कम्युनिष्ट ‘मास्तरा’ने सोलापुरात जाहीर व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुणगान गायल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मास्तरांच्या हातून मोठे राजकीय पातक घडल्याची प्रतिक्रियाही समाजमाध्यमात उमटली. मोदींना ‘लालनिशाण’ दाखविण्याऐवजी नरसय्यांनी भगव्या कळपात सामील होणे अनेकांना रुचलेले दिसत नाही. ज्यांना आडम मास्तरांची वैचारिक भूमिका, राजकीय कारकीर्द आणि कामगार चळवळीतील त्यांचे योगदान माहित आहे, अशांना देखील मास्तरांचे ‘मोदीगान’ पचनी पडणारे नाही. आम्हाला मात्र मास्तरांच्या हातून काही वावगे घडले असे वाटत नाही. जरा मागे वळून आपण राजकीय संस्कृतीचा गतकाळ आठवला तर, आडम मास्तरांनी दाखविलेल्या अशा राजकीय शिष्टाचाराला वैचारिक मतभेदाच्या भिंतींचा अडसर कधीच नव्हता. इंदिरा गांधींनी पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून बांगलादेशाची निर्मिती केली, तेव्हा विरोधी बाकांवर बसलेल्या अटलबिहारी वाजपेयींनी दुर्गेची उपमा देऊन त्यांचा गौरव केला. इंदिराजींचे कौतुक करताना वाजपेयींना जशी त्यांची विचारधारा आडवी आली नाही, तशी अटलजींच्या भूमिकेवर कुणी किंतु, परंतु उपस्थित केला नाही. अलीकडच्या काळात अशा शिष्टाचाराचे दर्शनच दुर्मीळ झाल्याने आडम मास्तरांची ती कृती अनेकांना खटकली,विचारधारेशी केलेली प्रतारणा वाटली.

कधीकाळी गिरणगाव म्हणून ओळख असलेल्या सोलापुरात एका गिरणी कामगाराच्या पोटी नरसय्या आडम यांचा जन्म झाला. वडील गिरणी कामगार तर आई विडी कामगार. घरची परिस्थिती बेताची. त्यामुळे ते मॅट्रिकपर्यंतच शिकू शकले. कुटूंबाला हातभार लावण्यासाठी मुलांच्या शिकवण्या घ्यायचे, म्हणून ते ‘मास्तर’! कामगाराच्या घरची हालअपेष्टा हा त्यांचा जीवनानुभव असल्याने गिरणी आणि विडी कामगारांच्या समस्या पोटतिडकीने मांडत त्यांनी या असंघटीत वर्गाचे मोठे संघटन उभे केले. लालबावट्याखाली कष्टकºयांना संघटीत केले आणि पुढे याच ‘नाही रे’ वर्गाच्या पाठबळावर १९७४ मध्ये सोलापूर महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आले. पालिकेतील कामगिरीच्या जोरावर १९७८ मध्ये ते विधानसभेवर निवडून गेले. सोलापूर हा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला असताना कष्टकºयांच्या पाठबळावर १९७८, १९९५ व २००४ असे तीन वेळा विधानसभेवर निवडून आले. मात्र मागील दोन निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिता शिंदे यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. सोलापुरचा खासदार भाजपाचा असला तरी, स्थानिक पातळीवर मास्तरांचा राजकीय संघर्ष काँग्रेसशी आहे. हा संदर्भही त्यांच्या वक्तव्याचे विश्लेषण करताना लक्षात घ्यावा लागेल.

एकीकडे संघर्षांतून माध्यमातून मागण्या मान्य करून घेताना रचनात्मक कामातून त्यांनी सोलापूरमध्ये दहा हजार महिला विडी कामगारांसाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारला. जुलै २०१३ मध्ये या प्रकल्पाचे लोकार्पण तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. तेव्हाही मास्तरांनी डॉ. मनमोहन सिंग यांचा गौरव करत उत्कृष्ट पंतप्रधान असे प्रशस्तीपत्र डॉ. सिंग यांना दिले होते. तसेच या प्रकल्पासाठी मदत केल्याबद्दल त्यांनी शरद पवारांबद्दल जाहीर कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. प्रश्न एवढाच आहे की, मोदी सरकारच्या कामगारविरोधी धोरण वरवंट्याखाली लहान-मोठ्या उद्योगातील कामगार भरडले जात आहेत. त्याविरोधात देशभरातील कामगार संघटनांनी एल्गार पुकारलेला असताना, आडम मास्तरांनी ‘पुन्हा मोदीच पंतप्रधान !’ अशी भविष्यवाणी वर्तवून कम्युनिष्टांनी आजवर जपलेल्या (अंध)श्रद्धेलाच नख लावले आहे. त्यामुळे मास्तर तुमचं जरा चुकलंच !

(लेखक, लोकमतचे कार्यकारी संपादक आहेत)

टॅग्स :Solapurसोलापूर