शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
3
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
4
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
5
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
6
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
7
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
8
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
9
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
10
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
11
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
12
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
13
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
14
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
15
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
16
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
17
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

‘आप’च्या झुंडशाहीची नांदी !

By admin | Published: May 06, 2015 5:19 AM

भाजपा आणि ‘आप’ हे दोन्ही पक्ष एकमेकांना अगदी पाण्यात पाहत असतात. मात्र इतके राजकीय हाडवैर असलेल्या या दोन्ही पक्षांचे एका मुद्द्यावर एकमत झाले आहे.

भाजपा आणि ‘आप’ हे दोन्ही पक्ष एकमेकांना अगदी पाण्यात पाहत असतात. मात्र इतके राजकीय हाडवैर असलेल्या या दोन्ही पक्षांचे एका मुद्द्यावर एकमत झाले आहे. तो मुद्दा आहे प्रसारमाध्यमांचा. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सरकारातील कायदा मंत्री जितेंद्रसिंह तोमर हे कायद्याचे पदवीधर आहेत. पण ही पदवी बोगस आहे, असा आरोप झाला आहे. त्या संबंधी न्यायालयात एक याचिकाही दाखल करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने न्यायालयाने बिहारमधील ज्या विद्यापीठाची पदवी तोमर यांनी मिळवली, त्याच्याकडे विचारणा केली, तेव्हा ही पदवी बनावट असून, असे कोणतेही प्रमाणपत्र आम्ही दिलेले नाही, असा खुलासा करणारे प्रतिज्ञापत्र विद्यापीठाने न्यायालयात सादर केले. आता तोमर यांना आपली बाजू मांडायची आहे आणि त्यासाठी २० आॅगस्ट ही तारीख न्यायालयाने मुक्र र केली आहे. या सगळ्या प्रकरणाच्या बातम्या प्रसारमाध्यमांनी, विशेषत: वृत्तवाहिन्यांनी, विस्तृतपणे व वारंवार दिल्या. तोमर यांच्या राजीनाम्याची मागणी इतर राजकीय पक्षांनी लावून धरली. त्यामुळे केजरीवाल अडचणीत आले आहेत. त्यातही ‘या गोष्टीची कल्पना केजरीवाल यांना आधीच दिलेली होती व तोमर यांना उमेदवारी देऊ नका, असा सल्ला दिला होता’, असे केजरीवाल यांचे राजकीय शत्रू बनलेले, त्यांचे पूर्वीचे सहकारी प्रशांत भूषण यांनी जाहीर केल्याने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची कोंडी झाली आहे. तोमर यांना ते काढून टाकू शकत नाहीत. तसे केल्यास विरोधकांच्या पुढे नमल्याचे दिसून येईल आणि प्रसारमाध्यमे या प्रकरणाचा मागोवा घेण्याचे थांबवणार नाहीत. या पेचातून सुटण्यासाठी इतर साऱ्या राजकारण्यांप्रमाणेच केजरीवाल यांनी ‘प्रसारमाध्यमांची कॉर्पोरेट मालकी, या मालकांचे हितसंबंध आणि त्यामुळे वृत्तवाहिन्या जाणूनबुजून चालवत असलेली बदनामीची मोहीम’ या मुद्द्यावर एका संकेतस्थळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने तोंडसुख घेतले आहे. आपल्याला फायद्याचे असेल, तेव्हा प्रसारमाध्यमांची पाठराखण करणे आणि वृत्तवाहिन्या वा वृत्तपत्रे अडचणीची ठरू लागली की, त्यांच्यावर हेत्वारोप करणे, ही अलीकडे राजकारणात रीतच पडली आहे. मात्र केजरीवाल यांनी पुढचे पाऊल टाकले आहे. प्रसारमाध्यमांच्या मालकांचा करभरणा इत्यादी मुद्द्यांची विशेष चौकशी करण्याचा मनोदय त्यांनी बोलून दाखवला आहे. शिवाय जनतेनेच आता प्रसारमाध्यमांची जाहीर झाडाझडती घ्यावी, अशीही सूचना त्यांनी केली आहे. ही ‘आप’च्या झुंडशाहीची नांदी आहे. प्रसारमाध्यमे जेव्हा अण्णा हजारे यांच्या आंदोलनाच्या दरम्यान केजरीवाल यांना डोक्यावर घेत होती, तेव्हा वृत्तवाहिन्या वा वृत्तपत्रे यांची ‘कॉर्पोरेट’ मालकी त्यांना चालत होती. या आंदोलनाच्या दरम्यान वृत्तवाहिन्यांनी सलग प्रक्षेपण केले आणि त्यापायी जवळ जवळ ६५० कोटी रुपयांचा जाहिरातीचा महसूल एका आठवडाभरात हेतूत: सोडून दिला. हे कोणा ‘कॉर्पोरेट’ मालकीविना घडले काय? तेव्हा केजरीवाल यांनी कधी आक्षेप का घेतला नव्हता? त्याचे कारण साधे आहे. ते म्हणजे तेव्हा प्रसारमाध्यमे त्यांची पाठराखण करीत होती. पण प्रसारमाध्यमे हे दुधारी हत्त्यार आहे, याची जाणीव दिल्लीत पहिल्यांदा सरकार बनविण्याचा घोळ, नंतर लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभव आणि पुढे दिल्लीतील निर्विवाद विजय व ‘आप’मधील बेबनावाच्या निमित्ताने केजरीवाल यांना झाली. म्हणूनच दिल्लीच्या सचिवालयात पत्रकारांच्या प्रवेशाला त्यांनी बंदी घातली आणि आता प्रसारमाध्यमांच्या विरोधात झुंडशाही सुरू करण्याच्या बेतात ते आहेत. केजरीवाल यांच्या या वक्तव्यावर भाजपाने टीकेची झोड उठवली आहे. पण ‘दिल्लीतील प्रदूषणाच्या मुद्द्यावरून प्रसारमाध्यमांतून काढण्यात आलेल्या मोहिमेमागे हितसंबंधांचे राजकारण आहे’, असा आरोप मोदी सरकारचे पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी अलीकडेच एका मुलाखतीत केला आहे. पण जावडेकर यांचा शहाजोगपणा एवढा की, ‘प्रसारमाध्यमे हेतूत: हे करीत आहेत, असे मी म्हणत नाही’, असं सांगतानाच, ‘हे हितसंबंध काय आहेत, ते प्रसारमाध्यमांनीच शोधून काढावे’, असा अनाहूत सल्लाही त्यांनी दिला आहे. जावडेकर यांचे हे वागणे त्यांचे ‘बॉस’ नरेंद्र मोदी यांच्या धर्तीचेच आहे. लोकशाही राज्यव्यवस्थेत खरे तर प्रसारमाध्यमे हा समाजाचा आरसा असतात. म्हणूनच त्यांना लोकशाहीचा चौथा खांब म्हटले जाते. ही झाली आदर्श व्यवस्था. पण भारतातील प्रसारमाध्यमे, विशेषत: वृत्तवाहिन्या, ही जबाबदारी झटकून बेबंदपणे सनसनाटी पद्धतीने बातम्या व वृत्तांत देत असतात. त्यामागं ‘टीआरपी’चे व्यापारी गणित असते. प्रसारमाध्यमांचा अतिरेकी आक्रमकपणा व व्यक्तिगत खाजगी जीवनातील विधिनिषेधशून्य घुसखोरी अशा बेबंद वागण्यामुळं भूकंपग्रस्त नेपाळमध्येही ‘भारतीय प्रसारमाध्यमांनो परत जा’, अशी तीव्र प्रतिक्रि या उमटत आहे. म्हणूनच प्रसारमाध्यमांनाही स्वयंशिस्तीचे धडे देण्याची गरज आहे, हे कोणीच नाकारणार नाही. पण याचा अर्थ केजरीवाल जे म्हणत आहेत किंवा जावडेकर जे सुचवत आहेत, तो या बेबंदपणावरचा उपाय नव्हे. ती प्रसारमाध्यमांच्या, एका अर्थाने लोकशाहीतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या, विरोधातील झुंडशाहीची नांदीच आहे आणि त्याला प्रखर विरोधच केला जायला हवा.