शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

जनमन - विद्यार्थी ‘विद्यार्थी’ असतो, मुलगा-मुलगी असा फरक नको!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 07:29 IST

उच्च शिक्षण महाग झाल्याने केवळ मुलींचेच नाही, तर ग्रामीण भागातील मुलांचे देखील उच्च शिक्षणातील प्रमाण कमी होत आहे

‘मुलींना शुल्कमाफी, गरजू मुलांचे काय?’ हा डॉ. सुनील कुटे यांचा लेख (दि. १४ फेब्रुवारी) वाचला. उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मात्र आर्थिक अडचणीमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागणाऱ्या विद्यार्थिनींना याचा मोठा फायदा होणार आहे. ज्या पालकांचे उत्पन्न ८ लाखांच्या आत आहे त्या मुलींचे शंभर टक्के शुल्क सरकार भरणार आहे. या प्रस्तावित निर्णयाचे स्वागत.

उच्च शिक्षण महाग झाल्याने केवळ मुलींचेच नाही, तर ग्रामीण भागातील मुलांचे देखील उच्च शिक्षणातील प्रमाण कमी होत आहे. राज्यभरात आरक्षणासाठी मोर्चे निघत आहेत. मराठा आरक्षण मागणीच्या अनेक कारणांमध्ये महागलेले उच्च शिक्षण हे देखील एक महत्त्वाचे कारण आहे. शेतीत उत्पन्न नाही. त्यामुळे महागडे उच्च शिक्षण घेता येत नाही. शिक्षण नाही म्हणून रोजगार नाही. रोजगार नाही म्हणून पैसा नाही. हे एक दुष्टचक्र आहे. कुशल मनुष्यबळाची निर्मिती करण्यासाठी शिक्षणच आवश्यक असते. शिक्षणाच्या बाबतीत सवलत देताना मुलगे आणि मुली असा फरक करु नये, असेही सुचवावेसे वाटते. एकाच आर्थिक परिस्थितीने गांजलेल्या मुलींपेक्षा मुलांना वेगळा न्याय लावण्याची गरज नाही. पैशांअभावी मुलींचेच नव्हे, तर गुणवत्ताधारक मुलांचेही शिक्षण थांबू नये. 

प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती देताना जात, धर्म, लिंग याआधारे सवलती नको. सर्वांसाठी समान आणि दर्जेदार शिक्षण ही जबाबदारी सरकारने घ्यावी. खासगी महाविद्यालये, अभिमत विद्यापीठे या ठिकाणी प्रवेश घेतलेल्या डिप्लोमा, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम यासाठीची शुल्कपूर्ती करताना ती सरसकट करून सर्वांना मोफत शिक्षण उपलब्ध करून द्यावे. दर्जेदार शिक्षणातूनच व्यक्ती, समाज आणि राष्ट्राची उभारणी होते. ज्या राष्ट्रांनी जगात आर्थिक महासत्ता म्हणून स्थान मिळविले आहे त्यांचा पायाच शिक्षण व संशोधन आहे. विद्यार्थ्यांना जात, धर्म, लिंग पाहून सवलत देण्यापेक्षा विद्यार्थी म्हणून सवलत द्यावी.

- शिवाजी काकडे,पाथ्री, ता. फुलंब्री 

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीchandrakant patilचंद्रकांत पाटील