शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

२६३ वर्षांपूर्वीची संघर्षपूर्ण आणि निर्णायक संक्रांत...

By पुष्कर कुलकर्णी | Updated: January 14, 2024 10:55 IST

पानिपतचे तिसरे महायुद्ध म्हणून ते ओळखले जाते. या युद्धात दोन्ही बाजूंचे मोठे नुकसान झाले. यात मराठ्यांचे दोन मोती, सत्तावीस मोहरा आणि अनेक चिल्लरखुर्दा कामी आले.

- डाॅ. पुष्कर कुलकर्णी 

१७ व्या शतकात भारताचा मोठा भूभाग मराठा साम्राज्यात होता. मराठ्यांनी अटकेपार भगवा रोवल्यावर तिळपापड झालेला अफगाण लुटेरा अहमदशाह अब्दाली हा रोहिलखंडच्या नजीबच्या बोलविण्यावरून पुन्हा एकदा भारतात आला. नजीबला मोगलांकडे असलेले दिल्लीचे तख्त हवे होते. अब्दालीला अटकाव करण्याची ताकद फक्त मराठ्यांमध्येच होती. सदाशिवरावभाऊ पेशवे यांच्या नेतृत्वात मोठे सैन्य पुण्यातून उत्तरेत कूच झाले. २६३ वर्षांपूर्वी १४ जानेवारी १७६१ रोजी संक्रांतीच्या दिवशी पानिपत येथे घनघोर युद्ध झाले. पानिपतचे तिसरे महायुद्ध म्हणून ते ओळखले जाते. या युद्धात दोन्ही बाजूंचे मोठे नुकसान झाले. यात मराठ्यांचे दोन मोती, सत्तावीस मोहरा आणि अनेक चिल्लरखुर्दा कामी आले. परकीयांच्या आक्रमणापासून मायभूमीच्या संरक्षणार्थ झालेल्या या लढाईत आपल्या मातीचा इमान राखत अगणित शूर योद्धे धारातीर्थी पडले. मराठा साम्राज्याच्या भाळावरची भळभळणारी जखम, असे या युद्धाचे वर्णन केले जाते. 

युद्धाच्या वर्षभरापूर्वी म्हणजे १७६० मध्ये उदगीरच्या लढाईत मराठ्यांनी निजामाचा पराभव केला. यात सदाशिवरावभाऊंनी निजामाचा तोफखाना प्रमुख इब्राहिमखान गारदी याला मराठ्यांकडे घेतले. पानिपतच्या युद्धातही मराठ्यांच्या तोफखान्याचे नेतृत्व इब्राहिमकडे दिले होते. युद्धापूर्वी अब्दालीने धर्माचा शब्द टाकून त्याला वळविण्याचा प्रयत्न केला. पण स्वकीय इमान राखत याच त्याने मैदान गाजवून अब्दालीला नाकीनऊ आणले. मराठा शूर सरदारांनी पाठ न दाखवता शेवटपर्यंत बाजी लावून वीरमरण स्वीकारले. सदाशिवरावभाऊ आणि विश्वासराव पेशवे यांनाही वीरमरण आले. मल्हारराव होळकर यांनी महिलांना युद्धभूमीतून सुखरूप बाहेर काढून सदाशिवरावभाऊंनी दिलेले कर्तव्य बजावले. 

शिकण्यासारखेबरेच काही...दिल्लीचे रक्षण करणाऱ्या मराठ्यांना साथ दे, असे सांगूनही आपल्या आईचे न ऐकता शेवटच्या निर्णायक घडीत अवधचा सुजा अब्दालीकडे वळला. दिल्लीचे तख्त मिळावे ही अट राखत सूरजमल जाट यांनी युद्धात मराठ्यांच्या बाजूने न लढण्याचा निर्णय घेत तटस्थ भूमिका स्वीकारली. दरवर्षी १४ जानेवारी रोजी पानिपत युद्धाच्या स्मरणार्थ मराठ्यांचे शौर्य आठवते... धर्म आड न आणता आपल्या भूमीसाठी इमान राखत वीरमरण पत्करलेल्या योद्ध्यांची आठवण येते. वर्तमानातील पिढीला यातून बरेच काही शिकण्यासारखे आहे.

टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांती