शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

२६३ वर्षांपूर्वीची संघर्षपूर्ण आणि निर्णायक संक्रांत...

By पुष्कर कुलकर्णी | Updated: January 14, 2024 10:55 IST

पानिपतचे तिसरे महायुद्ध म्हणून ते ओळखले जाते. या युद्धात दोन्ही बाजूंचे मोठे नुकसान झाले. यात मराठ्यांचे दोन मोती, सत्तावीस मोहरा आणि अनेक चिल्लरखुर्दा कामी आले.

- डाॅ. पुष्कर कुलकर्णी 

१७ व्या शतकात भारताचा मोठा भूभाग मराठा साम्राज्यात होता. मराठ्यांनी अटकेपार भगवा रोवल्यावर तिळपापड झालेला अफगाण लुटेरा अहमदशाह अब्दाली हा रोहिलखंडच्या नजीबच्या बोलविण्यावरून पुन्हा एकदा भारतात आला. नजीबला मोगलांकडे असलेले दिल्लीचे तख्त हवे होते. अब्दालीला अटकाव करण्याची ताकद फक्त मराठ्यांमध्येच होती. सदाशिवरावभाऊ पेशवे यांच्या नेतृत्वात मोठे सैन्य पुण्यातून उत्तरेत कूच झाले. २६३ वर्षांपूर्वी १४ जानेवारी १७६१ रोजी संक्रांतीच्या दिवशी पानिपत येथे घनघोर युद्ध झाले. पानिपतचे तिसरे महायुद्ध म्हणून ते ओळखले जाते. या युद्धात दोन्ही बाजूंचे मोठे नुकसान झाले. यात मराठ्यांचे दोन मोती, सत्तावीस मोहरा आणि अनेक चिल्लरखुर्दा कामी आले. परकीयांच्या आक्रमणापासून मायभूमीच्या संरक्षणार्थ झालेल्या या लढाईत आपल्या मातीचा इमान राखत अगणित शूर योद्धे धारातीर्थी पडले. मराठा साम्राज्याच्या भाळावरची भळभळणारी जखम, असे या युद्धाचे वर्णन केले जाते. 

युद्धाच्या वर्षभरापूर्वी म्हणजे १७६० मध्ये उदगीरच्या लढाईत मराठ्यांनी निजामाचा पराभव केला. यात सदाशिवरावभाऊंनी निजामाचा तोफखाना प्रमुख इब्राहिमखान गारदी याला मराठ्यांकडे घेतले. पानिपतच्या युद्धातही मराठ्यांच्या तोफखान्याचे नेतृत्व इब्राहिमकडे दिले होते. युद्धापूर्वी अब्दालीने धर्माचा शब्द टाकून त्याला वळविण्याचा प्रयत्न केला. पण स्वकीय इमान राखत याच त्याने मैदान गाजवून अब्दालीला नाकीनऊ आणले. मराठा शूर सरदारांनी पाठ न दाखवता शेवटपर्यंत बाजी लावून वीरमरण स्वीकारले. सदाशिवरावभाऊ आणि विश्वासराव पेशवे यांनाही वीरमरण आले. मल्हारराव होळकर यांनी महिलांना युद्धभूमीतून सुखरूप बाहेर काढून सदाशिवरावभाऊंनी दिलेले कर्तव्य बजावले. 

शिकण्यासारखेबरेच काही...दिल्लीचे रक्षण करणाऱ्या मराठ्यांना साथ दे, असे सांगूनही आपल्या आईचे न ऐकता शेवटच्या निर्णायक घडीत अवधचा सुजा अब्दालीकडे वळला. दिल्लीचे तख्त मिळावे ही अट राखत सूरजमल जाट यांनी युद्धात मराठ्यांच्या बाजूने न लढण्याचा निर्णय घेत तटस्थ भूमिका स्वीकारली. दरवर्षी १४ जानेवारी रोजी पानिपत युद्धाच्या स्मरणार्थ मराठ्यांचे शौर्य आठवते... धर्म आड न आणता आपल्या भूमीसाठी इमान राखत वीरमरण पत्करलेल्या योद्ध्यांची आठवण येते. वर्तमानातील पिढीला यातून बरेच काही शिकण्यासारखे आहे.

टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांती