शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

दिल्लीत शिजतेय 'बिरबलाची खिचडी', मतांसाठी 'शाही' हुशारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 16:14 IST

नोटाबंदीचा ‘तुघलकी’ निर्णय आणि ‘शेखचिल्ली’ टाईप राफेल करारावरून उठलेले वादळ कायम असताना आता दिल्लीत बिरबलाची खिचडी शिजू घातली आहे.

- नंदकिशोर पाटील(कार्यकारी संपादक, लोकमत)अकबर बादशहाचे राज्य खालसा होऊन शेकडो वर्षे लोटली तरी, त्याच्या ‘अकबरी कारनाम्यांचा’ पगडा भारतीय राज्यकर्त्यांवर मनावर कायम असल्याचा प्रयत्य वारंवार येत असतो. विशेषत: गेल्या साडेचार वर्षात तर राजधानी दिल्लीत बादशहा अकबर, मोहंमद तुघलक, की शेखचिल्ली? यापैकी नेमकं कोण राज्य करतंय, असा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही. तो पडण्यामागं तशी असंख्य कारणं आणि धोरणं आहेत. पण ‘हम करे सो कायदा’ हे या सर्व भूतपूर्व आणि सध्याच्या राज्यकर्त्यांचे समानसूत्र आहे. आजवरचे अनेक राजेमहाराजे, ‘दिल्ली जिंकली म्हणजे जग जिंकले’, अशा आविर्भावात होते. सध्याच्या राज्यकर्त्यांचा समजही तसाच आहे. नोटाबंदीचा ‘तुघलकी’ निर्णय आणि ‘शेखचिल्ली’ टाईप राफेल करारावरून उठलेले वादळ कायम असताना आता दिल्लीत बिरबलाची खिचडी शिजू घातली आहे.बिरबलाची ती गोष्ट अशी-बिरबलाची गोष्ट तशी सर्वांना माहित आहेच. असेच थंडीचे दिवस होते. सम्राट अकबराने एके दिवशी एक अजब घोषणा केली. त्याच्या राजवाड्यासमोरच्या जलकुंडात रात्रभर कुणी उभा राहिल्यास त्याला शंभर सुवर्ण मुद्रा देण्यात येतील, अशी दवंडी पिटवली गेलीे. ती ऐकून एक गरीब माणूस रात्रभर त्या जलकुंडात काकडत उभा राहतो. सकाळी अकबर येतो, तेव्हा त्याचे नजर जलकुंडाजवळ ठेवलेल्या एका छोट्याशा दिव्याकडे जाते. अकबर विचारतो, दिवा रात्रभर तेवत होता का? सेवक, होय म्हणतो. रात्रभर दिवा तेवत राहिल्याने जलकुंडात उभा राहणाऱ्या माणसाला उब मिळाल्याचे अनुमान अकबर काढतो आणि शंभर सुवर्ण मुद्रांचे बक्षीस देता येणार नसल्याचे बजावतो.तो गरीब माणूस दु:खी होतो. त्याला वाटते की आता बिरबलच आपल्याला न्याय देईल. तो बिरबलाकडे जाऊन संपूर्ण घटना सांगतो. बिरबल त्याला म्हणतो, 'तू आता घरी जा. मी बघतो काय करायचे ते.'दुस-या दिवशी दरबार भरतो. रोज वेळेवर येणारा बिरबल आज आला नाही, म्हणून अकबर सेवकामार्फत बोलाविणे पाठवितो. सेवक जाऊन परत येतो व बिरवल खिचडी शिजवत असल्याचे सांगतो. बिरबल खिचडी शिजल्यानंतरच येणार असल्याने राजा दरबाराच्या कामास सुरवात करतो. दुपार झाल्यावरही बिरबल न आल्याने राजा दुसºया सेवकाला पाठवितो. दूसरा सेवकही बिरबलाची खिचडी झालीच नसल्याचे सांगतो.अकबराला आश्चर्य वाटते. दरबार संपतो तरी बिरबल येत नाही म्हणून अकबरच त्याच्या घरी जातो. तेथे गेल्यानंतर पाहतो तो काय. बिरबलाने छोटी चूल पेटवून बºयाच उंचीवर एका मडक्यात खिचडी शिजायला ठेवलेली असते. अकबर हसतो आणि म्हणतो, अरे बिरबल तू एवढा हुशार आणि चतुर. मग तुला एवढे समजत नाही, की खिचडी आणि विस्तवात एवढे अंतर असेल तर ती तापेल कशी?तेव्हा बिरबल म्हणतो, 'क्षमा असावी महाराज, दूरच्या दिव्याची उब घेऊन एखादा माणूस रात्रभर कडाक्याच्या थंडीत उभा राहू शकतो, मग याच न्यायाने खिचडी शिजायला काय हरकत आहे? राजाच्या चूक लक्षात येते. रात्रभर पाण्यात उभा राहणारया माणसाला तो तातडीने बोलावणे पाठवून शंभर सुवर्ण मुद्रांचे बक्षीस देतो.आजच्या खिचडीची गोष्ट अशी-येत्या लोकसभा निवडणुकीत अनुसूचित जाती-जमातीतील लोकांची मते मिळावित म्हणून भाजपा नेत्यांनी नामी शक्कल लढविली आहे. देशभरातील अनु.जाती-जमातीतीच्या लोकांच्या घरून आणलेल्या तीन हजार किलो तांदूळ आणि डाळीची खिचडी दिल्लीत शिजवली जात आहे. त्यासाठी खास नागपुरी शेफ विष्णू मनोहर यांना पाचारण करण्यात आले आहे. आजवर ९१८ किलो तांदळाच्या खिचडीचा रेकॉर्ड प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांच्या नावावर आहे. भाजपा नेत्यांना ३ हजार किलो तांदूळ व डाळीच्या खिचडीचा नवा विक्रम प्रस्थापित करायचा आहे. ही खिचडी खाल्ल्यानंतर देशात खºया अर्थाने समरसता येईल, असा दावा केला जात आहे.सम्राट अकबराच्या दरबारात बिरबल होता म्हणून गरीबांना न्याय आणि सुधारणांना वाव होता, मात्र मोदींच्या दरबारात शहेन‘शहा’ची चलती असल्याने खिचडी खा आणि मस्त राहा!

 

टॅग्स :PoliticsराजकारणNew Delhiनवी दिल्ली