शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

कांद्यावर पीळ तर कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:42 IST

दुसाणे : साक्री तालुक्यातील दुसाणे गावासह परिसरातील सर्वच शेतकऱ्यांचे कांदा पीक हे पीळ रोगामुळे पूर्णतः उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत ...

दुसाणे : साक्री तालुक्यातील दुसाणे गावासह परिसरातील सर्वच शेतकऱ्यांचे कांदा पीक हे पीळ रोगामुळे पूर्णतः उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

यावर्षी आधीच संपूर्ण माळमाथा परिसरात पाऊस खूप कमी प्रमाणात झाल्याने नदी-नाल्यांना पाणी आलेले नाही तर विहिरींनी तळ गाठलेला आहे. तेवढ्या पाण्यावर कांद्याचे बियाणे शेतकऱ्याने टाकले होते. परंतु, कमी पाऊस व धुक्यामुळे कांद्याचे रोप पूर्णतः नष्ट झाले होते. त्यानंतरही शेतकऱ्यांनी हार न मानता महाग व दर्जेदार रोप विकत घेऊन कांदा पिकाची लागवड केली होती. परंतु, या नवीनच उत्पन्न झालेल्या पीळ रोगामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा कांदा उद्ध्वस्त झाला आहे. ज्यात कांदा लागवडीनंतर जवळपास एक महिन्यानंतर त्यांना पीड पडायला सुरुवात होते व नंतर संपूर्ण कोवळा कांदा सडून खाक होताना सर्व शेतांमध्ये दिसत आहे. त्यावर सर्वच महागातल्या महाग औषधांची फवारणी करूनदेखील त्यावर काही फरक पडताना दिसत नसल्याने सर्वच शेतकऱ्यांनी कांदा पिकाला वाऱ्यावर सोडून दिले आहे.

अशीच काहीशी गत कापसाचीदेखील लाल्या रोगामुळे झाली आहे. कापूस लागवडीनंतर त्याला फुलफुगडी लागण्याच्या तोंडावर सर्व कापूस पीक लाल पडून त्यावरील फुलफुगडी पूर्णतः खाली गळून ते पीकदेखील संपूर्ण उद्ध्वस्त झालेले आहे. परिसरातील या दोन्ही प्रमुख पिकांनी शेतकऱ्यांकडे पाठ फिरवली असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांसमोर चिंतेचे मोठे वादळ उभे राहिले आहे. यावर शासनाने विचार करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी सर्वच शेतकऱ्यांची मागणी आहे.

प्रतिक्रिया

माझ्या शेतातील जवळपास चार एकरमधील कांदा पीक पीळ रोगामुळे संपूर्ण नष्ट झाले आहे. ज्याच्यावर मी आतापर्यंत अंदाजे एक ते दीड लाख रुपये खर्च केले असून, त्यावरील उत्पन्न शून्य झाले आहे. माझ्यासह परिसरातील संपूर्ण शेतकऱ्यांची अशीच परिस्थिती आहे.

- शामजी श्रावण महाले (माजी चेअरमन, विविध कार्यकारी सोसायटी व प्रगतशील शेतकरी, दुसाणे)