शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

गालबोट लावणाºयांची गय करणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 4:06 PM

दादा भुसे : ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी आढावा बैठक

ठळक मुद्देलोकसहभाग महत्त्वाचा! स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. त्यादृष्टीने मनपातर्फे नियोजन करून विविध कार्यक्रमांवर भर दिला जात असल्याचे महापौर कल्पना महाले यांनी सांगितले. तर हे अभियानाचे महत्व तरुणांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंउद्या पांझरा नदीत स्वच्छता मोहीम धुळे शहराला शासनाने हगणदारीमुक्त घोषीत केले आहे. तत्पूर्वी मनपाने शहरातील ४४ ठिकाणे ही हगणदारी असलेली ठिकाणे निश्चित केली होती. त्यानंतर पथकांची नियुक्ती करून या ठिकाणांवर उघघड्यावर शौचास बसणाºयांवर दंडात्मक कार्यवाही करणउल्लेखनीय कार्य करणाºयांचा सत्कार यावेळी स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणारे सफाई कर्मचारी व अधिकाºयांचा सत्कार करण्यात आला. त्यात मुकादम- लोटन धोंडू सूर्यवंशी, स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण हंसराज पाटील, चंद्रकांत नथ्थू जाधव, वासिद असिफ पठाण

धुळे :  शासनातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ ही अभिनव योजना राबविली जात आहे. ही योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्वांनीच प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. केवळ ही योजना सरकारी असल्यामुळे आपला त्याच्याशी काहीही संबंध नाही, असे म्हणून चालणार नाही. तसेच या योजनेचा गैरफायदा किंवा त्याला गालबोट लावण्याचा कोणी प्रयत्न केल्यास संबंधिताला गय केले  जाणार नाही, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी येथे केले. जिल्हा परिषद व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छता ही सेवा’ हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी शुक्रवारी दुपारी शहरातील राजर्षी शाहू महाराज नाट्यमंदिरात आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. मंचावर महापौर कल्पना महाले, जि.प. अध्यक्ष शिवाजी दहिते,  जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, जि.प.चे सीईओ गंगाथरन देवराजन, मनपा आयुक्त सुधाकर देशमुख, भाजपाच्या गटनेत्या प्रतिभा चौधरी, मनपा विरोधी पक्षनेते गंगाधर माळी, शिवसेना जिल्हा प्रमुख हिलाल माळी, महानगरप्रमुख सतीश महाले आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन वाहिद अली सैय्यद यांनी केले. अडचणीतून मार्ग काढा पालकमंत्री दादा भुसे म्हणाले, की जिल्ह्यातील ग्रामीण भागात हगणदारीमुक्तीचे ७३ टक्के काम  झाले आहे. ही आनंदाची बाब आहे. उर्वरीत काम पूर्ण करण्यासाठी येणाºया अडचणींवर मात करून काम पूर्ण केले पाहिजे. यासाठी कर्म ही पूजा हे सूत्र सर्वांनी लक्षात ठेवावे. हे अभियान केवळ १५ ते २ आॅक्टोबर याकालावधित न राबवता पुढच्या पिढीचाही विचार करून राबवावे.  हा कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करावे. निधीच्या अडचणी आल्या तरी त्याबाबत विचार न करता काम केले पाहिजे,  असे आवाहन त्यांनी येथे केले. ग्रामसेवकांचे बहिष्कार आंदोलन मागे!‘स्वच्छता ही सेवा’ हे  अभियान ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहभागातून राबविले जाणार आहे. परंतु, ग्रामसेवकांनी त्यांच्या प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासाठी बहिष्कार आंदोलन पुकारले होते.  त्यापार्श्वभूमीवर येथील आढावा बैठकीपूर्वी ग्रामसेवकांशी यशस्वी चर्चा झाली आहे. त्यांना शासनाच्या ध्येय धोरणांबाबत माहिती देण्यात आली. तसेच त्यांचे प्रश्न लवकरच सुटणार असल्याचे आश्वासन दिले असून  त्यांनी त्यांचे आंदोलन मागे घेतल्याची माहिती पालकमंत्री भुसे यांनी येथे दिली. डिसेंबर २०१७  पर्यंत हगणदारीमुक्त जिल्हा करणार जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे म्हणाले, की स्वच्छतेसाठी शासनातर्फे अभिवन योजना राबविली जात असताना हगणदारीमुक्तीसाठी अजुनही अनेकांची मनोवृत्ती बदललेली नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्येकाची मनोवृत्ती बदलली तर जिल्हा हगणदारीमुक्त होणे सहज शक्य आहे. आतापर्यंत वैयक्तीक शौचालये बांधून दिल्यानंतरही ग्रामीण भागातील अनेक जण त्याचा उपयोग करताना दिसत नाही. जुन्या कल्पना सोडून देऊन नागरिकांनी त्यांची मानसिकता बदलविणे गरजेचे आहे. डिसेंबर २०१७ पर्यंत धुळे जिल्हा हगणदारीमुक्त करणार असल्याचे आश्वासन त्यांनी येथे दिले.