शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

धुळे जिल्ह्यात गव्हाचे क्षेत्र ७० टक्यांनी घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 11:42 AM

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचा अंदाज : असमाधानकारक पावसाचा परिणाम, हरभºयाचे क्षेत्र घटणार

ठळक मुद्देजिल्ह्यात रब्बीचे ९० हजार १९ हेक्टर लागवडीचे उद्दिष्ट धुळे, शिंदखेडा तालुक्यात गव्हाची लागवड अशक्यहरभºयाचे क्षेत्रही घटणार

आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्हा कृषी विभागाने रब्बी हंगामासाठी ९० हजार १९ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. मात्र यावर्षी झालेल्या असमाधानकारक पावसामुळे    जिल्ह्यात रब्बी हंगामातील  गव्हाच्या क्षेत्रात ७० तर हरभºयाचे क्षेत्र ६० टक्यांनी घटणार आहे. त्यातल्या त्यात धुळे व शिंदखेडा तालुक्यात गव्हाची लागवडच होऊ शकणार नाही, अशी माहिती  जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातून देण्यात आली. रब्बीचे क्षेत्र घटणार असल्याने, खतांची मागणीही कमी होणार आहे.धुळे जिल्हयात यावर्षी असमाधानकारक पाऊस झालेला आहे. सुरवातीच्या कालावधीत दमदार पाऊस झाल्याने, खरिपाच्या पिकांची स्थिती चांगली होती. मात्र त्यानंतर पावसाचा मोठा खंड पडला.श्रावण  महिना कोरडा गेला. तर परतीच्या पावसानेही दडी मारली. त्यामुळे खरिप पिकांचे जवळपास ५० टक्यांपेक्षा अधिकचे नुकसान झालेले आहे.ज्वारीचे पीक केवळ चारा म्हणूनच हातात आलेले आहे. धुळे, शिंदखेडा तालुक्यात पावसाचे प्रमाण अतिशय कमी असल्याने दुष्काळाची स्थिती आहे. त्याचा परिणाम आता रब्बीच्या लागवडीवर होणार आहे. लागवडीचे क्षेत्रात घट होणारकृषी विभागाने उद्दिष्ट निर्धारित केलेले असले तरी पाण्याअभावी रब्बीचे लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गहू व हरभरा या पिकांना पाण्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासत असते. मात्र यावर्षी पाण्याचा अभाव असल्याने गव्हाचे क्षेत्र ७० टक्यांनी तर हरभºयाचे क्षेत्र ६० टक्यांनी घटणार आहे. जिल्हा कृषी विभागाने २०१८-१९ या वर्षात रब्बी क्षेत्राचे ९८ हजार १९ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे.  यात ४३ हजार ९८७ हेक्टर क्षेत्रावर गहू लागवडीचे उद्दिष्ट आहे. विशेष म्हणजे शिंदखेडा तालुक्यात पावसाचे प्रमाण अतिशय कमी असतांना तेथे १४ हजार ४०१ हेक्टरवर गहू लागवडीचे उद्दिष्ट आहे. तर त्या खालोखाल साक्री तालुक्यात १२ हजार ८४२,  धुळे तालुक्यात ८ हजार ५९७, तर शिरपूर तालुक्यात ८ हजार १३९ हेक्टर क्षेत्रावर लागवड अपेक्षित आहे.  हरभºयाची ३२ हजार ५३९ हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. आता पाण्याअभावी हे उद्दिष्ट कसे गाठणार हा प्रश्न निर्माण झालेला आहे.त्यातही धुळे व शिंदखेडा तालुक्यात पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी  गव्हाची लागवड होणे कठीण आहे. फक्त शिरपूर व पिंपळनेर याच भागात पाणी काही प्रमाणात असल्याने त्याठिकाणी थोड्याफार प्रमाणात गहू, हरभºयाची लागवड होऊ शकते असे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या अधिकाºयांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे