शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

शिरपूर तालुक्यातील 11 पैकी 9 प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट

By admin | Updated: April 5, 2017 12:42 IST

उन्हामुळे नैसर्गिक जलस्त्रोत आटू लागल्याने शिरपूर तालुक्यातील 11 पैकी 9 लघू प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट आहे.

ऑनलाई लोकमत/सुनील सांळुखे

शिरपूर, जि.धुळे, दि.4- उन्हामुळे नैसर्गिक जलस्त्रोत आटू लागल्याने शिरपूर  तालुक्यातील 11 पैकी 9 लघू प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट आहे. ग्रामीण भागातील जनतेला पाण्यासाठी वणवण करावी लागत असली तरी  शिरपूर शहरासाठी आरक्षित असलेल्या करवंद धरणात समाधानकारक पाणी साठा असल्याने शहरवासियांना 24 तास शुद्ध पाणी सोडण्यात येत आहे. 
शिरपूर तालुक्यात 2 मध्यम प्रकल्पासह 11 लघू प्रकल्प आहेत़ शिरपूर पॅटर्नच्या माध्यमातून आतार्पयत दीडशेच्यावर बंधारे बांधण्यात आली आहेत़ तसेच जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अनेक गावांमध्ये ओढे, नाले, नदी व तलावांचे प्रशासनाने लोकसहभागातून पुनरुज्जीवन केले आह़े   
गेल्या पावसाळ्यात बहुतांशी धरणे ओव्हर फ्लो सुध्दा झाली होती, परंतु,  काही बंधारे कमी-अधिक पावसामुळे भरली नव्हती़ पश्चिम भागातील बंधा:यात अडविण्यात आलेले पाणी काही महिन्यानंतर आटले. गेल्या वर्षी  नदी-नाले वाहून नेणारा पाऊस न झाल्यामुळे बंधारे-धरणे पाण्याने भरली नाहीत़ त्यामुळे आता जवळपास सर्वच  धरणे व बंधारे कोरडठाक पडली आहेत. 
आदिवासी पाडय़ात भीषण टंचाई
 उन्हाची तीव्रता वाढत असताना आदिवासी भागातील गावांमधील नैसर्गिक जलस्त्रोत हळूहळू आटू लागले आहेत़ परिणामी ग्रामस्थांना ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आह़े आदिवासी पाडय़ांवर तर 2-4 किमीर्पयत पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत  आह़े काही पाडय़ांवर तर मुलांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.  
टंचाई असतानाही टॅँकर सुरू नाही
तालुक्यात पाण्याची टंचाई असतानाही अद्याप  एकही गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू नाही. अधिक टंचाईग्रस्त गावांमध्ये मुख्यमंत्री पेयजल योजना मंजूर  आह़े त्यांचे अंदाजपत्रकासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आलेला आह़े संभाव्य पाणीटंचाई होवू शकते म्हणून प्रस्तावित गावांमध्ये बोअरविहिर करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. एकीकडे जलस्त्रोत आटत चालले असताना दुसरीकडे धरणांमधील पाणीसाठाही खालावत चालला आह़े  
करवंद धरणामुळे शहरातील नागरिकांना दिलासा 
करवंद व अनेर  प्रकल्पात ब:यापैकी पाणी साठा आह़े पैकी करवंद धरणाचे सुमारे 100 दशलक्ष घन फूट पाणी शहरासाठी आरक्षित आह़े हे पाणी साधारणत: जुलै अखेर्पयत पुरू शकणार असल्यामुळे शहरवासियांना दिलासा मिळाला आहे. तर अनेर धरणात 50 टक्के पाणी असून येत्या मे-जूनमध्ये कापसाची लागवड करणा:या शेतक:यांच्या पिकांसाठी हे पाणी पुरविले जाणार आह़े त्यामुळे सध्या दोन्ही धरणातील पाटचारीच्या माध्यमाने सोडण्यात येणारे पाणी बंद केले आह़े आजमितीस अनेर धरणात 50 टक्के तर करवंद धरणात 26.50 टक्के पाणीसाठा आह़े 
 
धरणांमधील पाणी साठा असा : 
 
धरण क्षमता साठा दशघमी टक्के
करवंद       18.26   4.87 26.50 
अनेर 49.27 25.47 50
बुडकी 1.73 0.24 5
वकवाड         2.67 0.15 2
बुडकी 1.73 निरंक---
वाडी          1.34 निरंक---
जळोद 2.11 निरंक---
विखरण          1.90 निरंक---
कालीकराड  1.99  निरंक---
रोहिणी          0.96 निरंक---
नांदर्डे 3.60 निरंक---
गधडदेव          1.53 निरंक---
मिटगांव            1.02 निरंक---