शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूर तालुक्यातील 11 पैकी 9 प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट

By admin | Updated: April 5, 2017 12:42 IST

उन्हामुळे नैसर्गिक जलस्त्रोत आटू लागल्याने शिरपूर तालुक्यातील 11 पैकी 9 लघू प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट आहे.

ऑनलाई लोकमत/सुनील सांळुखे

शिरपूर, जि.धुळे, दि.4- उन्हामुळे नैसर्गिक जलस्त्रोत आटू लागल्याने शिरपूर  तालुक्यातील 11 पैकी 9 लघू प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट आहे. ग्रामीण भागातील जनतेला पाण्यासाठी वणवण करावी लागत असली तरी  शिरपूर शहरासाठी आरक्षित असलेल्या करवंद धरणात समाधानकारक पाणी साठा असल्याने शहरवासियांना 24 तास शुद्ध पाणी सोडण्यात येत आहे. 
शिरपूर तालुक्यात 2 मध्यम प्रकल्पासह 11 लघू प्रकल्प आहेत़ शिरपूर पॅटर्नच्या माध्यमातून आतार्पयत दीडशेच्यावर बंधारे बांधण्यात आली आहेत़ तसेच जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अनेक गावांमध्ये ओढे, नाले, नदी व तलावांचे प्रशासनाने लोकसहभागातून पुनरुज्जीवन केले आह़े   
गेल्या पावसाळ्यात बहुतांशी धरणे ओव्हर फ्लो सुध्दा झाली होती, परंतु,  काही बंधारे कमी-अधिक पावसामुळे भरली नव्हती़ पश्चिम भागातील बंधा:यात अडविण्यात आलेले पाणी काही महिन्यानंतर आटले. गेल्या वर्षी  नदी-नाले वाहून नेणारा पाऊस न झाल्यामुळे बंधारे-धरणे पाण्याने भरली नाहीत़ त्यामुळे आता जवळपास सर्वच  धरणे व बंधारे कोरडठाक पडली आहेत. 
आदिवासी पाडय़ात भीषण टंचाई
 उन्हाची तीव्रता वाढत असताना आदिवासी भागातील गावांमधील नैसर्गिक जलस्त्रोत हळूहळू आटू लागले आहेत़ परिणामी ग्रामस्थांना ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आह़े आदिवासी पाडय़ांवर तर 2-4 किमीर्पयत पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत  आह़े काही पाडय़ांवर तर मुलांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.  
टंचाई असतानाही टॅँकर सुरू नाही
तालुक्यात पाण्याची टंचाई असतानाही अद्याप  एकही गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू नाही. अधिक टंचाईग्रस्त गावांमध्ये मुख्यमंत्री पेयजल योजना मंजूर  आह़े त्यांचे अंदाजपत्रकासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आलेला आह़े संभाव्य पाणीटंचाई होवू शकते म्हणून प्रस्तावित गावांमध्ये बोअरविहिर करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. एकीकडे जलस्त्रोत आटत चालले असताना दुसरीकडे धरणांमधील पाणीसाठाही खालावत चालला आह़े  
करवंद धरणामुळे शहरातील नागरिकांना दिलासा 
करवंद व अनेर  प्रकल्पात ब:यापैकी पाणी साठा आह़े पैकी करवंद धरणाचे सुमारे 100 दशलक्ष घन फूट पाणी शहरासाठी आरक्षित आह़े हे पाणी साधारणत: जुलै अखेर्पयत पुरू शकणार असल्यामुळे शहरवासियांना दिलासा मिळाला आहे. तर अनेर धरणात 50 टक्के पाणी असून येत्या मे-जूनमध्ये कापसाची लागवड करणा:या शेतक:यांच्या पिकांसाठी हे पाणी पुरविले जाणार आह़े त्यामुळे सध्या दोन्ही धरणातील पाटचारीच्या माध्यमाने सोडण्यात येणारे पाणी बंद केले आह़े आजमितीस अनेर धरणात 50 टक्के तर करवंद धरणात 26.50 टक्के पाणीसाठा आह़े 
 
धरणांमधील पाणी साठा असा : 
 
धरण क्षमता साठा दशघमी टक्के
करवंद       18.26   4.87 26.50 
अनेर 49.27 25.47 50
बुडकी 1.73 0.24 5
वकवाड         2.67 0.15 2
बुडकी 1.73 निरंक---
वाडी          1.34 निरंक---
जळोद 2.11 निरंक---
विखरण          1.90 निरंक---
कालीकराड  1.99  निरंक---
रोहिणी          0.96 निरंक---
नांदर्डे 3.60 निरंक---
गधडदेव          1.53 निरंक---
मिटगांव            1.02 निरंक---