शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

धुळे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांसाठी अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 17:01 IST

पाटबंधारे विभाग : एका दिवसात ३५ दशलक्ष घनफूट नदीपात्रात; पांझरा काठच्या गावांना दिलासा

ठळक मुद्देअक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून सोडण्यात येणाºया आवर्तनाचे पाणी शिंदखेडा तालुक्यातील मुडावदपर्यंत पोहचणे अपेक्षित असते. कारण मुडावद हे आवर्तनाचे शेवटचे गाव आहे. तेथून पुढे गेल्यानंतर तेथे पांझरा व तापी या दोन नद्यांचा संगम होतो. त्या ठिकाणी पांझरा ही तापी नदीत विलीन होते. त्यामुळे आवर्तनाचे पाणी पुढे गेल्यास तापी नदीत पोहचणार असते. त्यामुळे मुडावद येथील के.टी. वेअर बंधाºयादरम्यान, अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे धुळे व शिंदखेडा तालुक्यातील ९० तर जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील १० अशा एकूण १०० गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

धुळे : जिल्हा प्रशासनाच्या आदेशावरून साक्री तालुक्यात असलेल्या अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून बुधवारी दुपारी १ वाजता पाटबंधारे विभागातर्फे  पाणी सोडण्यात आले आहे. प्रतिसेकंद  ३५० क्युसेस या वेगाने एका दिवसात ३५ दशलक्ष घनफूट पाण्याचा विसर्ग होणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता के. टी. सूर्यवंशी यांनी दिली. अक्कलपाडा धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे धुळे, शिंदखेडा व जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. यंदा समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे पाणी टंचाईची झळ धुळे व शिंदखेडा तालुक्यातील गावांना सहन करावी लागत आहे. त्यात गेल्यावर्षी परतीचा दमदार पाऊस झाल्यामुळे अक्कलपाडा धरणात समाधानकारक जलसाठा होता. त्यामुळे या धरणातून पाणी कधी सुटणार? याकडे टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थांचे लक्ष लागून  होते. 

जिल्हाधिकाºयांनी दिले होते पाणी सोडण्यासाठी पाटबंधारे विभागाला आदेश  अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता के. टी. सूर्यवंशी यांना सोमवारीच आदेश दिले होते. त्यात म्हटले होते, की धुळे व शिंदखेडा तालुक्यातील पांझरा नदीकाठावरील गावांना टंचाईची परिस्थितीची पाहणी करण्यात आली आहे.   त्यामुळे अक्कलपाडा प्रकल्पातून पांझरा नदी पात्रात पाणी सोडणे आवश्यक आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मौजे मुळी प्र. डांगरी व निमकपिलेश्वर गावापर्यंत जाणवणाºया टंचाई निवारणार्थ पाणी सोडण्याची मागणी करण्यात आल्यामुळे पाटबंधारे विभागाने कार्यवाही करावी, असे पत्रात नमूद केले होते. तीन दिवसात धुळ्यात येणार पाणी अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्याप्रसंगी बुधवारी दुपारी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता एस. ओ. पवार, शाखा अभियंता बी. व्ही. जिरे, जे. डी. खैरनार, भाजपा नेते रामकृष्ण खलाणे, न्याहळोदच्या सरपंच ज्योती भिल, गटनेते विकास पवार, उपसरपंच प्रताप माळी, नेरचे सरपंच शंकर खलाणे, कैलास रोकडे व ज्ञानेश्वर रोकडे आदी उपस्थित होते. अक्कलपाडा धरणातून सोडण्यात आलेले पाणी पुढील तीन दिवसात धुळ्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

९ क्रमांकाच्या दरवाजातून सुटले पाणी अक्कलपाडा धरणाला एकूण १७ दरवाजे आहेत. एकूण दरवाजांपैकी ९ व्या क्रमांकाच्या दरवाजातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. हे पाणी पुढील १२ दिवसात पांझरा नदीच्या अखेरच्या टप्प्यात असलेल्या मुडावद या गावापर्यंत पोहचणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागातर्फे देण्यात आली आहे.