शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
2
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
3
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
4
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
5
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
6
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
7
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
8
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
9
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
10
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
11
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
12
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
13
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
14
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
15
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
16
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
17
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
18
Nitin Nabin: चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत?
19
सिडनी येथे जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; दोन हल्लेखोर ताब्यात, १० पर्यटकांचा जीव घेतला
20
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांसाठी अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 17:01 IST

पाटबंधारे विभाग : एका दिवसात ३५ दशलक्ष घनफूट नदीपात्रात; पांझरा काठच्या गावांना दिलासा

ठळक मुद्देअक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून सोडण्यात येणाºया आवर्तनाचे पाणी शिंदखेडा तालुक्यातील मुडावदपर्यंत पोहचणे अपेक्षित असते. कारण मुडावद हे आवर्तनाचे शेवटचे गाव आहे. तेथून पुढे गेल्यानंतर तेथे पांझरा व तापी या दोन नद्यांचा संगम होतो. त्या ठिकाणी पांझरा ही तापी नदीत विलीन होते. त्यामुळे आवर्तनाचे पाणी पुढे गेल्यास तापी नदीत पोहचणार असते. त्यामुळे मुडावद येथील के.टी. वेअर बंधाºयादरम्यान, अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे धुळे व शिंदखेडा तालुक्यातील ९० तर जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील १० अशा एकूण १०० गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

धुळे : जिल्हा प्रशासनाच्या आदेशावरून साक्री तालुक्यात असलेल्या अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून बुधवारी दुपारी १ वाजता पाटबंधारे विभागातर्फे  पाणी सोडण्यात आले आहे. प्रतिसेकंद  ३५० क्युसेस या वेगाने एका दिवसात ३५ दशलक्ष घनफूट पाण्याचा विसर्ग होणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता के. टी. सूर्यवंशी यांनी दिली. अक्कलपाडा धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे धुळे, शिंदखेडा व जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. यंदा समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे पाणी टंचाईची झळ धुळे व शिंदखेडा तालुक्यातील गावांना सहन करावी लागत आहे. त्यात गेल्यावर्षी परतीचा दमदार पाऊस झाल्यामुळे अक्कलपाडा धरणात समाधानकारक जलसाठा होता. त्यामुळे या धरणातून पाणी कधी सुटणार? याकडे टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थांचे लक्ष लागून  होते. 

जिल्हाधिकाºयांनी दिले होते पाणी सोडण्यासाठी पाटबंधारे विभागाला आदेश  अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता के. टी. सूर्यवंशी यांना सोमवारीच आदेश दिले होते. त्यात म्हटले होते, की धुळे व शिंदखेडा तालुक्यातील पांझरा नदीकाठावरील गावांना टंचाईची परिस्थितीची पाहणी करण्यात आली आहे.   त्यामुळे अक्कलपाडा प्रकल्पातून पांझरा नदी पात्रात पाणी सोडणे आवश्यक आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मौजे मुळी प्र. डांगरी व निमकपिलेश्वर गावापर्यंत जाणवणाºया टंचाई निवारणार्थ पाणी सोडण्याची मागणी करण्यात आल्यामुळे पाटबंधारे विभागाने कार्यवाही करावी, असे पत्रात नमूद केले होते. तीन दिवसात धुळ्यात येणार पाणी अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्याप्रसंगी बुधवारी दुपारी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता एस. ओ. पवार, शाखा अभियंता बी. व्ही. जिरे, जे. डी. खैरनार, भाजपा नेते रामकृष्ण खलाणे, न्याहळोदच्या सरपंच ज्योती भिल, गटनेते विकास पवार, उपसरपंच प्रताप माळी, नेरचे सरपंच शंकर खलाणे, कैलास रोकडे व ज्ञानेश्वर रोकडे आदी उपस्थित होते. अक्कलपाडा धरणातून सोडण्यात आलेले पाणी पुढील तीन दिवसात धुळ्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

९ क्रमांकाच्या दरवाजातून सुटले पाणी अक्कलपाडा धरणाला एकूण १७ दरवाजे आहेत. एकूण दरवाजांपैकी ९ व्या क्रमांकाच्या दरवाजातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. हे पाणी पुढील १२ दिवसात पांझरा नदीच्या अखेरच्या टप्प्यात असलेल्या मुडावद या गावापर्यंत पोहचणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागातर्फे देण्यात आली आहे.