शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

धुळे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांसाठी अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 17:01 IST

पाटबंधारे विभाग : एका दिवसात ३५ दशलक्ष घनफूट नदीपात्रात; पांझरा काठच्या गावांना दिलासा

ठळक मुद्देअक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून सोडण्यात येणाºया आवर्तनाचे पाणी शिंदखेडा तालुक्यातील मुडावदपर्यंत पोहचणे अपेक्षित असते. कारण मुडावद हे आवर्तनाचे शेवटचे गाव आहे. तेथून पुढे गेल्यानंतर तेथे पांझरा व तापी या दोन नद्यांचा संगम होतो. त्या ठिकाणी पांझरा ही तापी नदीत विलीन होते. त्यामुळे आवर्तनाचे पाणी पुढे गेल्यास तापी नदीत पोहचणार असते. त्यामुळे मुडावद येथील के.टी. वेअर बंधाºयादरम्यान, अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे धुळे व शिंदखेडा तालुक्यातील ९० तर जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील १० अशा एकूण १०० गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

धुळे : जिल्हा प्रशासनाच्या आदेशावरून साक्री तालुक्यात असलेल्या अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून बुधवारी दुपारी १ वाजता पाटबंधारे विभागातर्फे  पाणी सोडण्यात आले आहे. प्रतिसेकंद  ३५० क्युसेस या वेगाने एका दिवसात ३५ दशलक्ष घनफूट पाण्याचा विसर्ग होणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता के. टी. सूर्यवंशी यांनी दिली. अक्कलपाडा धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे धुळे, शिंदखेडा व जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. यंदा समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे पाणी टंचाईची झळ धुळे व शिंदखेडा तालुक्यातील गावांना सहन करावी लागत आहे. त्यात गेल्यावर्षी परतीचा दमदार पाऊस झाल्यामुळे अक्कलपाडा धरणात समाधानकारक जलसाठा होता. त्यामुळे या धरणातून पाणी कधी सुटणार? याकडे टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थांचे लक्ष लागून  होते. 

जिल्हाधिकाºयांनी दिले होते पाणी सोडण्यासाठी पाटबंधारे विभागाला आदेश  अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता के. टी. सूर्यवंशी यांना सोमवारीच आदेश दिले होते. त्यात म्हटले होते, की धुळे व शिंदखेडा तालुक्यातील पांझरा नदीकाठावरील गावांना टंचाईची परिस्थितीची पाहणी करण्यात आली आहे.   त्यामुळे अक्कलपाडा प्रकल्पातून पांझरा नदी पात्रात पाणी सोडणे आवश्यक आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मौजे मुळी प्र. डांगरी व निमकपिलेश्वर गावापर्यंत जाणवणाºया टंचाई निवारणार्थ पाणी सोडण्याची मागणी करण्यात आल्यामुळे पाटबंधारे विभागाने कार्यवाही करावी, असे पत्रात नमूद केले होते. तीन दिवसात धुळ्यात येणार पाणी अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्याप्रसंगी बुधवारी दुपारी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता एस. ओ. पवार, शाखा अभियंता बी. व्ही. जिरे, जे. डी. खैरनार, भाजपा नेते रामकृष्ण खलाणे, न्याहळोदच्या सरपंच ज्योती भिल, गटनेते विकास पवार, उपसरपंच प्रताप माळी, नेरचे सरपंच शंकर खलाणे, कैलास रोकडे व ज्ञानेश्वर रोकडे आदी उपस्थित होते. अक्कलपाडा धरणातून सोडण्यात आलेले पाणी पुढील तीन दिवसात धुळ्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

९ क्रमांकाच्या दरवाजातून सुटले पाणी अक्कलपाडा धरणाला एकूण १७ दरवाजे आहेत. एकूण दरवाजांपैकी ९ व्या क्रमांकाच्या दरवाजातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. हे पाणी पुढील १२ दिवसात पांझरा नदीच्या अखेरच्या टप्प्यात असलेल्या मुडावद या गावापर्यंत पोहचणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागातर्फे देण्यात आली आहे.