शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
3
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
4
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
5
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
6
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
7
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
8
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
9
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
10
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
11
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
12
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
13
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
14
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
15
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
16
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
17
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
18
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
19
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
20
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण

जिल्ह्यात आठ महिन्यांत तीन महिला विकृत वासनेच्या शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:43 IST

आपली मुलगी ही वयात आलेली असताना तिच्या गरजा कोणत्या, ती कोणासोबत जास्त वावरताना दिसून येते, पालकांना कोणते कारण सांगून ...

आपली मुलगी ही वयात आलेली असताना तिच्या गरजा कोणत्या, ती कोणासोबत जास्त वावरताना दिसून येते, पालकांना कोणते कारण सांगून ती घराबाहेर पडते, तिचे मित्र, मैत्रिणी कोण आहेत, यासह अनुषंगिक बाबी आता पालकांनी चोखंदळपणे तपासायला हव्यात. पण, या बाबींची कोणत्याही प्रकारची माहिती नसल्याने अपहरणकर्त्यांना ते सोईचे ठरत आहे, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

गत वर्षीच्या तुलनेत वाढ

मुलींचे अपहरण करणे, महिलांचा विनयभंग करणे, त्यांच्यावर अत्याचारासारखे प्रसंग ओढवून आणणे अशा घटना या सध्या काळात मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत त्यात एकप्रकारे वाढच झाली आहे. हे रोखण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

विकृती मोडीत काढावी

- दिवसेंदिवस अशा प्रकारची विकृती ही मोडीत काढण्याची गरज आहे. पण, ही विकृती नेमकी मोडीत काढणार कोण हाच मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यासाठी पुढे येण्याची गरज व्यक्त होत आहे.

- बहुतेकवेळा वयात आलेल्या तरुणी या आमिषाला बळी पडत असतात. त्या बळी पडतात म्हणूनच त्यांचे अपहरण करणे विकृत मनाच्या व्यक्तीला खूपच सोईचे ठरत आहे. त्यात लग्न हेदेखील प्रमुख कारण असल्याचे म्हणावे लागेल.

अल्पवयीन मुली

येतात जाळ्यात

अपहरण करण्याचा उद्देश मनात बाळगणाऱ्या विकृत मनाच्या व्यक्तींना मुलींचे अपहरण करणे सहज शक्य होत असल्याचे समोर येत आहे. यात पालकांचा संवाद हरवत असल्याने ही बाब घडत आहे. आमिष दाखवून त्यांना जाळ्यात ओढण्याचे प्रमाण कमी न होता वाढत आहे. हे रोखण्यासाठी पालकांनी लक्ष द्यायला हवे.

गुन्ह्यांची उकल ही अल्पच

अपहरण, अत्याचार अथवा पळवून नेण्याच्या घटना घडत असताना त्यांचा शोध लावण्याचे प्रमाण तुलनेत कमीच आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे. पालकांनीदेखील पोलीस प्रशासनाला साथ दिल्यास अशा प्रकारच्या गुन्ह्याची उकल होणे सोपे होऊ शकते.