शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

थाळनेर ग्रामीण रुग्णालयातील पॅरासिटामॉल (हिवताप) गोळ्यांचा साठा संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:39 IST

शासनातर्फे मोफत कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड लसीकरण केले जात आहे. लस घेतल्यानंतर काही नागरिकांना थंडी, ताप या गोष्टींचा ...

शासनातर्फे मोफत कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड लसीकरण केले जात आहे. लस घेतल्यानंतर काही नागरिकांना थंडी, ताप या गोष्टींचा त्रास होत असल्याने रुग्णालयातून लस घेतलेल्या नागरिकांना कुठल्याही प्रकारचा शारीरिक त्रास होऊ नये म्हणून पॅरासिटामॉल गोळ्यांचे वाटप केले जात आहे. परंतु, थाळनेर ग्रामीण रुग्णालयात चक्क पॅरासिटामॉल गोळ्यांचाच साठा संपल्यामुळे लसीकरण झालेल्या नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करून पॅरासिटामॉल गोळ्यांची बाहेरून खरेदी करावी लागत आहे. लसीकरणाच्या ठिकाणी जर हिवतापाचे मेडिकल लसीकरण धारकांना मिळाले, तर ते हिवताप व अंगपाठ दुखणे किंवा कणकण वाटणे अशा गोष्टींचा त्रास झाल्यावर गोळीचे सेवन करून आराम मिळू शकतो. जे अशिक्षित आहेत, ते लस घेऊन सरळ घरचाच रस्ता धरतात व कामधंद्याला लागून जातात. मग काही वेळाने त्रास जाणवायला लागत असल्याने खासगी दवाखान्यात जाणे, अशा गोष्टींनी आर्थिक भुर्दंड खावा लागतो. सुशिक्षित लोक त्रासापासून मुक्त होण्यासाठी ते बाहेरून औषध घेऊ शकतात. परंतु, गरीब जनतेचे काय, असा प्रश्न सर्वसाधारण कुटुंबांतून होत आहे.

लसीकरणानंतर नागरिक पॅरासिटामॉल गोळ्या घेण्यासाठी औषध वाटप केंद्राकडे गेले असता औषध वाटप करणारा कर्मचारी तासन-तास मोबाईलवर व्यस्त असल्यामुळे नागरिकांना उडवाउडवीचे उत्तरे देऊन मोकळे होत असल्याने नागरिकांना लसीकरणानंतर पॅरासिटामॉल गोळ्या न घेता रिकाम्या हाती परतावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. अजूनही काही नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत द्विधा मन:स्थिती आहे. त्यातच लसीकरणानंतर बाहेरून घेतलेल्या गोळ्यांचे रुग्णांवर काही विपरीत परिणाम झाल्यास या घटनेला कोण जबाबदार राहणार, असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.

वैद्यकीय अधिकारी डॉ. राजपूत यांच्याशी पॅरासिटामॉल गोळ्यांचा साठा किती व केव्हापासून संपलेला आहे याविषयी मोबाईलद्वारे संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल नेटवर्क कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर होता.