शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

तिरोड्यात काढली शासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 22:10 IST

तिरोडा तालुका शेतकरी सेवा समितीतर्फे शुक्रवारी (दि.२२) रोजी राज्य शासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून व पुतळ्याचे दहन करुन सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध नोंदविण्यात आला.

ठळक मुद्देशेतकरी विरोधी धोरणाचा निषेध : शेतकरी सेवा समितीचे नेतृत्व

लोकमत न्यूज नेटवर्क
परसवाडा : तिरोडा तालुका शेतकरी सेवा समितीतर्फे शुक्रवारी (दि.२२) रोजी राज्य शासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून व पुतळ्याचे दहन करुन सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध नोंदविण्यात आला.
जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करुन शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, यासह विविध मागण्यांकरिता शासनाला वांरवार निवेदन देण्यात आले. मात्र यावर शासनाने कुठलाच निर्णय न घेतल्याने शेतकरी सेवा समितीने शुक्रवारी तिरोडा शहरात राज्य शासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून व पुतळ्याचे दहन करुन निषेध नोंदविला. पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून शेतकरी हवालदिल आहे. कर्जमाफी, धानाला भाव, जी.एसटी, सीएसटी, बेरोजगारी दूर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. यात तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले होते. यानंतर विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार व उपविभागीय अधिकारीे यांना देण्यात आले. निवेदनातून जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करा, शेतकºयांना हेक्टरी ३५ हजार रुपयांची मदत करा, पिक विम्याची रक्कम त्वरीत देण्यात यावी, बारमाही पाण्याची सोय करा, कोणतीही अट लावता सरकट कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा आदी मागण्यांचा त्यात समावेश होता.
सदर आंदोलन शेतकरी समितीचे अध्यक्ष नरेंद्र रहांगडाले, भरत रहांगडाले, शिशुपाल पटले, सेवा सहकारी अध्यक्ष गणराज पटले, हेमराज बिसेन, मनोहर हरिणखेडे, सहेषराम पटले, सुरेश पटले, अशोक टेंभरे, विजय क्षीरसागर, मुन्ना हरिणखेडे, धमेंद्र कटरे, जयेश हरिणखेडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.