शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे, खतांची दरवाढ थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:37 IST

धुळे : रासायनिक खतांचे भाव कमी करावेत अन्यथा, केंद्र सरकारने तीन वर्षांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी करार स्वरुपाने घ्याव्या आणि नफ्याची ...

धुळे : रासायनिक खतांचे भाव कमी करावेत अन्यथा, केंद्र सरकारने तीन वर्षांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी करार स्वरुपाने घ्याव्या आणि नफ्याची शेती करुन दाखवावी, असे आव्हान धुळे जिल्ह्यातील कृषीकन्यांनी शासनाला दिले आहे.

धुळे येथील कृषीकन्या प्रियंका जोशी, अर्चना अहिरे, अलका खैरनार, कल्पना खैरनार, अंजिराबाई खैरनार, सुनंदा खैरनार, दीपक खैरनार, नरेंद्र खैरनार आदींच्या शिष्टमंडळाने साेमवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकीआधी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु वास्तवात पिकांचे भाव दुप्पटीने कमी झाले आहेत. याऊलट रासायनि खतांचे भाव दुप्पटीने वाढले आहेत. त्यामुळे शेतकरी आत्महत्या तिप्पटीने वाढतील की काय अशी परिस`थिती सरकारने निर्माण केली आहे. कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांनी जीडीपी वाढवला. संपूर्ण जग बंद असताना देशाला शेतकऱ्यांनी जगवले. त्यामुळे केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर`थिक मदत केली पाहिजे. शिवाय खरीप हंगामात खते आणि बियाणे मोफत देवून दुप्पटीने मदत करायला हवी. केंद्र सरकारने खतांचे भाव दीडपट वाढवले आहेत.

नोटबंदी, कांदा निर्यातबंदी, कोरोना, सततची गारपीट आणि अवकाळी वादळी पाऊस या साऱ्या संकटांमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. खतांचे भाव वाढवले तसे पिकांना हमीभाव देण्यासाठी सरकार ठोस पाऊले कधी उचलणार असा प्रश्न निवेदनात उपस`थित केला आहे. सरकारने खतांचे भाव त्वरीत कमी करावे. ते करणे शक्य नसेल तर केंद्र सरकारने स्वत: शेती करुन नफा मिळवून दाखवावा. सरकारला हे जमले तर त्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी बक्षिस म्हणून स्वत:कडे ठेवाव्यात असे अव्हाने कृषीकन्यांनी दिले आहे.