शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अल्प मुदतीच्या पिकांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 22:56 IST

कापडणे : पाणीटंचाईमुळे शेपा व पालक भाजीवर्गीय पिक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल

कापडणे : कापडणेसह परिसरात सलग तीन ते चार वर्षांपासून पावसाळा कमी होत असल्याने विहिरी व कुपनलिकांची पाण्याची पातळी खूपच खालावली आहे. पाणीटंचाईमुळे अल्पमुदतीचे शेपू व पालक भाजीवर्गीय पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे.विहिरींची जलपातळी दिवसेंदिवस झपाट्याने कमी होत असल्याने खूपच कमी क्षेत्रफळात बागायत शेती दिसून येत आहे. बोटावर मोजण्याइतपत शेतकऱ्यांकडे थोड्याफार प्रमाणात पाण्याची सोय आहे. मात्र, हे पाणीही मे व जूनपर्यंत पूर्णत: टिकणार नसल्याने शेतकºयांनी विहिरी व कुपनलिकांच्या पाण्याचा अंदाज घेऊन कमी दिवसात येणाºया पालेभाज्यावर्गीय पिके घेण्यावर भर दिला आहे. सध्या पालक भाजी बाजारात विक्रीसाठी येत आहे.दिर्घकालीन पिकांकडे पाठपाणीटंचाई असल्यामुळे उन्हाळी मका, भुईमूग, ज्वारी, बाजरी, दादर, अशा दीर्घकालीन पिकांकडे शेतकºयांनी पाठ फिरविली आहे. ज्या शेतकºयांकडे थोड्याफार प्रमाणात पाण्याची सोय आहे, असे शेतकरी सध्या अल्पमुदतीच्या पिकाची लागवड करीत आहेत.शेपा व पालक हे प्रामुख्याने थंड वातावरणात किंवा थंडीच्या दिवसात घेण्याचे पीक असते. या दिवसात पिकाची जोमदार वाढ होत असते. मात्र, ज्या शेतकºयांकडे पाण्याची सोय असते असे शेतकरी पालक पीक वर्षभरही घेऊ शकतात. पालक लागवड केल्यानंतर पाच आठवड्यानंतर पालक काढणीस सुरुवात होते. कापडणे येथील काही शेतकरी सध्या शेपू, पालकची कापणी करून बाजारात विक्रीसाठी नेत आहेत. एकदा तयार झालेल्या पालक भाजीची कापणी झाल्यावर पुन्हा या पिकाला पाणी भरले तर आठ ते दहा दिवसानंतर परत पालक भाजी काढण्यासाठी तयार होत असते. असे पाच ते सहा वेळेस पुन्हा पुन्हा पालक भाजी काढणी करता येते. मात्र, सध्या पाणीटंचाई असल्याने येथील शेतकरी जेमतेम एक ते दोन वेळेस पालक पिकाचे उत्पादन घेत आहेत.वर्षभर ग्राहकांकडून मागणीआरोग्याच्या दृष्टिकोनातून पालक भाजीला वर्षभर ग्राहकांकडून पसंती असते. मात्र, या भाजीचे दर मागणी व पुरवठ्यानुसार कमी अधिक होत असतात. सध्या उन्हाळा असला तरी शेतकºयांनी उत्पादित केलेली पालक भाजी २० ते २५ रुपये किलोच्या दराने विक्री होत आहे. मात्र, पाणीटंचाई असल्याने पिकांची वाढ खुंटून पालक उत्पादनात घट येत आहे. परिणामी शेतकºयांना याचा आर्थिक फटका बसत आहे. जाणकार शेतकºयांनी सांगितले की, पालकचे पीक वर्षभर घेता येऊ शकते. बहुतांश पाण्याचा निचरा होणाºया शेतजमिनीत शेणखताची मात्रा योग्य असल्यास व पाणी मुबलक असल्यास पालक शेतीपासून दोन पैसे शेतकºयांच्या हाती येतात. पाणीटंचाईची समस्या असल्यामुळे ज्या शेतकºयांकडे जेमतेम पाण्याची सोय आहे, असे शेतकरी कमी पाण्यावर ठिबक सिंचनाच्या सहाय्याने सध्या भेंडी, ढेमसे, हिरवी काकडी, कारले, गिलके, वांगी, गवार अशी कमी दिवसात येणारी पालेभाज्यावर्गीय पिके घेताना दिसून येत आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे