शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

अल्प मुदतीच्या पिकांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 22:56 IST

कापडणे : पाणीटंचाईमुळे शेपा व पालक भाजीवर्गीय पिक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल

कापडणे : कापडणेसह परिसरात सलग तीन ते चार वर्षांपासून पावसाळा कमी होत असल्याने विहिरी व कुपनलिकांची पाण्याची पातळी खूपच खालावली आहे. पाणीटंचाईमुळे अल्पमुदतीचे शेपू व पालक भाजीवर्गीय पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे.विहिरींची जलपातळी दिवसेंदिवस झपाट्याने कमी होत असल्याने खूपच कमी क्षेत्रफळात बागायत शेती दिसून येत आहे. बोटावर मोजण्याइतपत शेतकऱ्यांकडे थोड्याफार प्रमाणात पाण्याची सोय आहे. मात्र, हे पाणीही मे व जूनपर्यंत पूर्णत: टिकणार नसल्याने शेतकºयांनी विहिरी व कुपनलिकांच्या पाण्याचा अंदाज घेऊन कमी दिवसात येणाºया पालेभाज्यावर्गीय पिके घेण्यावर भर दिला आहे. सध्या पालक भाजी बाजारात विक्रीसाठी येत आहे.दिर्घकालीन पिकांकडे पाठपाणीटंचाई असल्यामुळे उन्हाळी मका, भुईमूग, ज्वारी, बाजरी, दादर, अशा दीर्घकालीन पिकांकडे शेतकºयांनी पाठ फिरविली आहे. ज्या शेतकºयांकडे थोड्याफार प्रमाणात पाण्याची सोय आहे, असे शेतकरी सध्या अल्पमुदतीच्या पिकाची लागवड करीत आहेत.शेपा व पालक हे प्रामुख्याने थंड वातावरणात किंवा थंडीच्या दिवसात घेण्याचे पीक असते. या दिवसात पिकाची जोमदार वाढ होत असते. मात्र, ज्या शेतकºयांकडे पाण्याची सोय असते असे शेतकरी पालक पीक वर्षभरही घेऊ शकतात. पालक लागवड केल्यानंतर पाच आठवड्यानंतर पालक काढणीस सुरुवात होते. कापडणे येथील काही शेतकरी सध्या शेपू, पालकची कापणी करून बाजारात विक्रीसाठी नेत आहेत. एकदा तयार झालेल्या पालक भाजीची कापणी झाल्यावर पुन्हा या पिकाला पाणी भरले तर आठ ते दहा दिवसानंतर परत पालक भाजी काढण्यासाठी तयार होत असते. असे पाच ते सहा वेळेस पुन्हा पुन्हा पालक भाजी काढणी करता येते. मात्र, सध्या पाणीटंचाई असल्याने येथील शेतकरी जेमतेम एक ते दोन वेळेस पालक पिकाचे उत्पादन घेत आहेत.वर्षभर ग्राहकांकडून मागणीआरोग्याच्या दृष्टिकोनातून पालक भाजीला वर्षभर ग्राहकांकडून पसंती असते. मात्र, या भाजीचे दर मागणी व पुरवठ्यानुसार कमी अधिक होत असतात. सध्या उन्हाळा असला तरी शेतकºयांनी उत्पादित केलेली पालक भाजी २० ते २५ रुपये किलोच्या दराने विक्री होत आहे. मात्र, पाणीटंचाई असल्याने पिकांची वाढ खुंटून पालक उत्पादनात घट येत आहे. परिणामी शेतकºयांना याचा आर्थिक फटका बसत आहे. जाणकार शेतकºयांनी सांगितले की, पालकचे पीक वर्षभर घेता येऊ शकते. बहुतांश पाण्याचा निचरा होणाºया शेतजमिनीत शेणखताची मात्रा योग्य असल्यास व पाणी मुबलक असल्यास पालक शेतीपासून दोन पैसे शेतकºयांच्या हाती येतात. पाणीटंचाईची समस्या असल्यामुळे ज्या शेतकºयांकडे जेमतेम पाण्याची सोय आहे, असे शेतकरी कमी पाण्यावर ठिबक सिंचनाच्या सहाय्याने सध्या भेंडी, ढेमसे, हिरवी काकडी, कारले, गिलके, वांगी, गवार अशी कमी दिवसात येणारी पालेभाज्यावर्गीय पिके घेताना दिसून येत आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे