शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

मानव समाजासाठी खरी गरज नितीमूल्यांची 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 9:54 PM

संडे अँकर । प्रजापिता ब्रम्हाकुमारीज केंद्राच्या नवीन वास्तूच्या उद्घाटनप्रसंगी राजयोगीनी विजयादिदिंचे प्रतिपादन

विशाल गांगुर्डे । लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळनेर : मानव समाजाला खरी गरज नितीमूल्यांची आहे. एकजुटीनं प्रामाणिक प्रयत्न केल्यास सर्व समस्या प्रश्नांवर उपाय शक्य आहे. आपापसातील द्वेष, वैरभाव, तिरस्कार विसरून परस्पर सहयोग, आदर, प्रेमसारखी नितीमूल्य समाजात बाणवण्याची आज आवश्यकता आहे असे प्रतिपादन ब्रम्हाकुमारी विजयादीदी यांनी प्रतिपादन केले.साक्री तालुक्यातील देशशिरवाडे येथीले प्रजापिता ब्रम्हाकुमारीज केंद्राच्या नवीन वास्तूच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. ‘नितीमूल्याधिष्ठीत समाजाचे निर्माण’ ह्या ब्रम्हाकुमारीजच्या उपक्रमात जास्तीत जास्त सहभागाची आता खरी गरज आहे, असे सांगत दीदींनी सर्वांना केंद्रास भेट देण्याचे आवाहन केले.  घनश्याम पवार आपल्या मनोगतात म्हणाले की, प्रत्येक व्यक्ती जेव्हा ज्याही स्थितीत असते त्याला ती स्वत:च सर्वस्वी जबाबदार असते. कर्माची गती अतिशय गुह्य आहे, आपले विचारवाणी कर्मच आपलं नशिब घडवत असतात. तेव्हा आपल्या विचारवाणी कर्मांवर आपले लक्ष असावे. त्यानंतर प्रकाश क्षीरसागर, प्रभाकर भाई, भोगेभाई यांनीही सभेस मार्गदर्शन केले. तत्पूर्वी उषा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातून सद्भावना फेरी काढण्यात आली. देशशिरवाडे गावाचे सरपंच सुमर्न ठाकरे, उपसरपंच निलेश पगारे, जि.प. सदस्य विलास बिरारीस, सामाजिक कार्यकर्ते व माजी सरपंच विजय महाजन यांच्या उपस्थितीत ब्रम्हाकुमारीज केंद्राच्या नवीन वास्तूचे उद्घाटन तथा ध्वजारोहण पार पडले.  शेवटी सर्व उपस्थितांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमास धुळे, नंदुरबार, नेर, अंतापुर, जायखेडा, बल्हाणे, चिकसे, पानखेडा, सामोडे, पिंपळनेर तथा परिसरातून बी.के.परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तुकाराम सोनवणे, साधना जगताप, दिगंबर सोनवणे, रुपाली पगारे, रोहिणी हिरे, पार्वती सोनवणे, काशिनाथ दुसाने, गुरुदत घरटे आदींनी परिश्रम घेतले.

उपाय तोकडे़़आजचा मनुष्य हा अनेकानेक समस्यांनी ग्रस्त दिसतो, सर्वच क्षेत्रात सततची जीवघेणी स्पर्धा, स्वास्थ्य, बेरोजगारी, भ्रष्टाचार, त्यातच पुन्हा दुष्काळ, नापिकी, पाणी टंचाई सारख्या नैसर्गिक आपदा, या सर्वांनी तो पुरता हतबल झालाय. समस्या सोडवण्यासाठीचे त्याचे सर्वप्रकारचे उपाय तोकडे ठरताहेत. येणारा काळ तर आणखीच भीषण असू शकेल. तेव्हा ह्या प्रश्नांवर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची अत्यंत गरज आहे, मानवी प्रयत्नांना अध्यात्माचीही जोड हवी.

टॅग्स :Dhuleधुळे