शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

ई-पॉसवर थंब उमटत नसल्याने रेशनधारक वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:40 IST

धुळे : ई-पॉस मशीनवर थंब उमटत नसल्याने अनेक रेशनधारकांना धान्य मिळत नसल्याची तक्रार बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टीच्यावतीने करण्यात आली ...

धुळे : ई-पॉस मशीनवर थंब उमटत नसल्याने अनेक रेशनधारकांना धान्य मिळत नसल्याची तक्रार बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टीच्यावतीने करण्यात आली आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसळ यांना नुकतेच निवेदन देण्यात आले असून, रेशनधारकांच्या समस्येचे निराकरण न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सरकारमान्य रेशन दुकानात थंब होत नसल्याने अनेक नागरिकांना धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. तसेच कुटुंबातील काही सदस्यांनाच धान्य मिळत असल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. उर्वरित धान्य रेशन दुकानातच पडून राहत असल्याने काळाबाजार वाढला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. काही रेशन दुकानदार धान्याची काळ्या बाजारात विक्री करत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे नुकसान होत आहे. आधीच काेरोनामुळे जनता आर्थिक संकटात सापडली आहे. त्यामुळे शासन त्यांना पुरेसे धान्य मिळावे यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र, रेशन दुकानदार शासनाच्या धोरणाच्या विपरीत वागताना दिसत आहेत. सामान्य जनतेच्या हक्काचे धान्य त्यांना मिळावे, यासाठी योग्य कार्यवाही करावी. अन्यथा पुरवठा विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करू तसेच मंत्रालयात तक्रार करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर सुलतान अन्सारी, युसूफ शेख, जमील शेख, सलीम अली, सोनिया कुमावत यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.