शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

धुळ्यात शांतता अबाधितच रहावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 22:40 IST

जिल्हास्तरीय शांतता समिती : मनोगतातून उमटला सूर

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरात शांतता कशी नांदेल यासाठी प्रयत्न करावेत़ सोशल मीडियाचा योग्य वापर करुन चुकीच्या संदेशाकडे दुर्लक्ष करायला हवे़ लोकप्रतिनिधींची देखील भूमिका अधोरेखित झाली पाहीजे़ धुळ्याच्या इतिहासाकडे न डोकावता भविष्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे़ शहराची शांतता अबाधीत राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे, असा सूर जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत निघाला़ शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील हॉलमध्ये जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक नाशिक विभागाचे विशेष पोलीस         महानिरीक्षक छेरींग दोर्जे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली़ यावेळी उपस्थितांपैकी काहींनी मनोगत व्यक्त करत शांतता कशी नांदेल यासाठी मत व्यक्त केले़ पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस    अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ, प्रांताधिकारी भिमराज दराडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, श्रीकांत घुमरे, रविंद्र सोनवणे यांच्यासह विविध पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते़ यावेळी अनूप अग्रवाल, साबीर शेख, अमीन पटेल, डॉ़ संजय पाटील यांच्यासह अन्य उपस्थित होते़ बैठकीत, शंकरराव थोरात, प्राचार्य बाबा हातेकर, वाल्मिक दामोदर, हिरामण गवळी, उमेश चौधरी, शव्वाल  अन्सारी, अ‍ॅड़ प्रसाद देशमुख, आप्पा खताळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले़ सोशल मीडियाचा दिवसेंदिवस वाढणारा वापर-गैरवापर यावर निर्बंध असायला हवे़ बेरोजगारी दूर करण्यासाठी शहरात प्रयत्न हवेत़ पार्किंग समस्या दिवसेंदिवस जटील होत असल्याने त्याचेही नियोजन करावे़ चौपाटीसह संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात यावा़ धुळ्यात घडलेल्या इतिहासाची पुनरावृत्ती टाळण्यात यावी़ गो-हत्या आणि लव-जिहाद सारखे विषय गांभिर्याने हाताळण्यात यावेत़ चुकांची पुनरावृत्ती टाळायला हवी़ कायदा हातात न घेता त्याची माहिती पोलिसांना तातडीने द्यावी़ शांतता समितीची बैठक असे न होता यापुढे शांतता संकल्प बैठक म्हणून नवी ओळख व्हावी़ शांतता समितीच्या सदस्यांनी शांततेसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे़ असे मत यावेळी उपस्थितांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले़ पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी सर्वत्र शांतता नांदण्याचे आवाहन करत कायद्याचे पालन करण्याचे सांगितले़ सुत्रसंचालन पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी केले़ आभार उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी मानले़ 

कायदा हातात घेतल्यास कारवाईच : दोर्जेकोणीही कायदा हातात घेवू नये़ कायद्याचा सन्मानच करायला हवा़ एकता, अखंडता अबाधित राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत़ सण आणि उत्सव यांची परंपरा लक्षात घेता आपल्यात एकजूट असावी़ या माध्यमातून आपण एकत्र येत असतो, हे विसरु नये़ सोशल मीडियाचा वापर सध्या वेगाने होतो आहे, यातून काय घ्यावे आणि काय घेवू नये आपण ठरवायला हवे़ प्रत्येकाला मेंदू आहे, त्याचा योग्य वापर झाला पाहीजे़ आपण काय करत आहोत, हे कोणाला कळत नसेल या भ्रमात राहू नका़ आमचे बारीक लक्ष आहे हे विसरु नका़ आयुष्याच्या सरतेशेवटी आपण काय केले याचे आत्मपरिक्षण केल्यास आपल्याला पश्चाताप होणार नाही याकडे लक्ष असू द्या़ त्यावेळेस वेळ आपल्या हातातून गेली असेल, हे विसरु नका़ कोणीही कायदा हातात घेवू नका़ चुकीचे वाटत असल्यास पोलिसांना माहिती द्या़ शांतता समितीच्या सदस्यांनी आपली जबाबदारी योग्य रितीने पार पाडण्यासाठी प्रयत्न करावेत़ कोणी कायदा हातात घेतल्यास त्याची गय केली जाणार नाही़ जात-पात, धर्म न पाहता त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरींग दोर्जे यांनी सांगितले़ 

टॅग्स :DhuleधुळेPoliceपोलिस