दातर्ती शिवारात बिबट्याची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:37 IST2021-02-24T04:37:11+5:302021-02-24T04:37:11+5:30
संगणक परिचालकांच्या आंदोलनाला भेट म्हसदी : संगणक परिचालकांचे विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. या आंदोलन ...

दातर्ती शिवारात बिबट्याची दहशत
संगणक परिचालकांच्या आंदोलनाला भेट
म्हसदी : संगणक परिचालकांचे विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. या आंदोलन स्थळाला शेवाळी गावाचे भूमिपूत्र तथा काॅंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा. प्रकाश सोनवणे यांनी भेट देऊन आंदोलकांचे म्हणणे सरकारपर्यंत पोहचविणार असल्याचे सांगितले. यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी त्यांचे आभार मानले.
प्रा.डाॅ. बाविस्कर यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर
कुसुंबा : श्रीमती एनएमसी महाविद्यालयातील प्रा. डॅा. सुनील बाविस्कर यांना महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषदेतर्फे महात्मा ज्योतीराव फुले राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ७ मार्च २१ रोजी शिर्डी येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
शाळांनी विद्यार्थ्यांची काळजी घेणे गरजेचे
धुळे : जिल्ह्यात पाचवी ते पदवीपर्यंत शाळा, महाविद्यालये सुरू झालेली आहेत. मात्र अनेक ठिकाणी आता मास्क, सॅनिटायझर याकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने, शाळांनी विद्यार्थ्यांची काळजी घेणे गरजेचे असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
पेट्रोल दरवाढीने रिक्षाचालक चिंतेत
धुळे : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलचे दर सारखे वाढत असल्याने प्रवासी वाहतूक करणारे रिक्षा चालक चिंताग्रस्त झालेले आहेत. प्रवासी भाडेवाढवून देत नाही. मात्र पेट्रोल तेवढेच लागत असून, त्यातून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याची तक्रार आहे.
वाहतूक सिग्नल सुरू झाल्याने समाधान
धुळे : अनेक वर्षानंतर कमलबाई कन्या शाळेच्या चौकात वाहतूक सिग्नल सुरू झाल्याने, वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र याची अंमलबजावणी नियमित झाली पाहिजे. तसेच शहरातील प्रमुख चौकांमध्येही वाहतूक सिग्नल सुरू कऱण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. वाहतूक सिग्नल सुरू झाल्यास वाहतूक पोलिसांवरील ताण कमी होणार आहे.
अवजड वाहनांना शहरात प्रवेश देऊ नये
धुळे : शहरातील जुनी महानगरपालिका ते पारोळा चौफुलीपर्यंत सकाळपासून सायंकाळपर्यंत वाहनांची प्रचंड गर्दी असते. अशातच अवजड वाहने आल्यास, वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे अवजड वाहनांना या रस्त्यावर बंद घालण्याची गरज आहे
चाळीसगाव चौफुलीवर उड्डाणपूल बांधावा
धुळे : चाळीसगाव चौफुलीवर वाहनांची प्रचंड गर्दी असते. या परिसरातून अवजड वाहनांची सारखी वर्दळ असते. त्यामुळे चाळीसगावकडे जाणाऱ्या चालकांना रस्ता पार करण्यासाठी वाट पाहावी लागते. त्यामुळे चाळीसगाव चौफुलीवर उड्डाणपुलाची गरज आहे.
शेतकऱ्यांना दादर बियाणे वाटप
तिसगाव ढंढाणे : विकेल ते पिकेल या कार्यक्रमांतर्गत आत्मा प्रकल्पाच्या वतीने पढावद येथे गो ऑरगॅनिक शेतकरी बचत गटामार्फत रेवती दादर बियाणे वाटप करण्यात आले. शेतकरी अनंत ठाकरे, शरद निकम, किशोर पवार यांच्या शेतावर जाऊन आत्माचे प्रकल्प उपसंचालक एस.डी.मालपुरे, कृषी अधिकारी विनय बोरसे, संदीप पवार, नवनाथ साबळे आदींनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.