महानगरात एकही नवजात बालक लठ्ठ जन्माला नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:32 IST2021-03-07T04:32:56+5:302021-03-07T04:32:56+5:30
नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात, यासाठी मनपाने शहरात १७ आरोग्य केंद्रांची निर्मिती केली आहे. त्यातील सुभाष नगरातील आरोग्य केंद्र व ...

महानगरात एकही नवजात बालक लठ्ठ जन्माला नाही
नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात, यासाठी मनपाने शहरात १७ आरोग्य केंद्रांची निर्मिती केली आहे. त्यातील सुभाष नगरातील आरोग्य केंद्र व जुन्या महापालिकेच्या इमारतीमधील आरोग्य केंद्र अशा दोन ठिकाणी महिलांची प्रसूती केली जाते. २०१९ मध्ये एकूण १ हजार ६५६ महिलांची प्रसूती झाली. त्या महिलांनी जन्म दिलेल्या मुलांची संख्या ९७२ तर मुलींची संंख्या ६८४ होती. अशा १,६५६ पैकी एकाही मुलाचे वजन ३ किलोपेक्षा अधिक नव्हते. शिवाय २०२० मध्ये एकूण ३,०९७ महिलांची प्रसूती झाली. त्या महिलांनी जन्म दिलेल्यांत ६७५ मुले व ६८४ मुली होत्या. त्यातील एकाही बालकाला लठ्ठपणाची लक्षणे दिसून आलेली नाहीत.
शहरी मुलांचे प्रमाण अधिक
लहान वयात मैदानी खेळांची आवड मुलांमध्ये असायली हवी. त्यामुळे मुलांचा नियमित व्यायाम होतो. मात्र, हल्ली कोरोनामुळे मुलांनी बाहेर जाणे टाळले आहे. परिणामी, मुले दिवसभर तासन् तास मोबाइलवर गेम खेळत असतात. जेवणानंतरही हालचाल होत नसल्याने त्यांच्या लठ्ठपणा वाढू लागला आहे. याचे प्रमाण शहरी भागात अधिक जाणवते.
मातांच्या आहाराचा प्रभाव
गर्भवती महिलांना पोषण आहार आवश्यक असतो. पूरक पोषण आहार सेवनात असला म्हणजे बाळाच्या प्रकृतीवर त्याचा चांगला परिणाम होतो. पर्यायाने जन्माला येणारे बाळ हे सुदृढ असते. अधिक वजन असलेली काही मुले मात्र अॅनॉर्बल असू शकतात.
- डाॅ. कल्पना देशमुख,
महिला प्रसूती विभाग,
महापालिका आरोग्य केंद्र