शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

उपेक्षित उभरांडी गाव विकासापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 23:08 IST

निजामपूर : साक्री तालुक्यातील माळमाथ्यावर निजामपूरजवळ असलेले उभरांडी गाव अजूनही विकासापासून वंचित आहे. या गावाचा विकास व्हावा, यासाठी सातत्याने ...

निजामपूर : साक्री तालुक्यातील माळमाथ्यावर निजामपूरजवळ असलेले उभरांडी गाव अजूनही विकासापासून वंचित आहे. या गावाचा विकास व्हावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा करुनही अनेक वर्षांपासून हे गाव उपेक्षितच राहिले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.उभरांडी हे लहानसे गाव स्वातंत्र्य मिळून ७२ वर्षे होऊनही विकास कामांच्या बाबतीत मागे राहिले आहे. होडदाणे व उभरांडी गावे मिळून ग्रुप ग्रामपंचायत आहे.परंतू ग्रामपंचायत कार्यालय खूप जुने असून त्यात कपाटे, २ टेबल आणि १० खुर्च्या ठेवल्या तर जेमतेम १५ ते १६ लोक बसू शकतील. १८०० वस्तीच्या गावाची ग्रामसभा होणे अशक्य आहे. त्यातच आॅनलाईन यंत्रणा कुठे ठेवावी, असा प्रश्न आहे.विविध ग्रामविकासाची कामे व्हावीत, यासाठी ग्रामपंचायतीची सातत्याने लोप्रतिनिधींकडे फिरफिर सुरु असते. मात्र, अद्यापपर्यंत खासदार निधीतून एकही काम झालेले नसल्याचे उभरांडीच्या सरपंच विनिता नारायण पाटील यांनी सांगितले.उभरांडी ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठयाच्या विहीरीला भरपुर पाणी आहे. मात्र, त्या पाण्यात क्षाराचे प्रमाण अतिशय जास्त असून ते मळकट लागते. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी ते पाणी धोकेदायक आहे. म्हणून गावासाठी १५०० लिटरच्या पाणी फिल्टर प्लांटची नितांत गरज निर्माण झाली आहे.गावात सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटारी नाहीत. ग्रामपंचायतीने काही ठिकाणी थोडयाफार गटारी केल्या आहेत. मात्र, गावभर उघडया गटारीतून दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असते. अंडरग्राऊंड गटारी करिता शासन निधीची गरज आहे.गावात पूर्वीचे मातीचे रस्ते आहेत. आदिवासी वस्तीत थोडे काँक्रीट रस्ते झाले आहेत. गावात रस्ते व्हावेत यासाठी निधी नाही. पेव्हरब्लॉक बसवणे गरजेचे झाले आहे. शिवाय गावात समाजमंदीराची नितांत आवश्यकता आहे. लहान-लहान गावात आमरधाम आहेत. मात्र, या गावासाठी अमरधाम नाही. गाव दरवाजा नाही.निजामपूरकडून गावाकडे येणारा रस्ता अत्यंत खाचखळग्याचा आहे. रस्त्याच्या उर्वरित भागाचे पुननिर्माण होण्यासाठी लोकप्रतिनिधींकडे अनेक खेटे घातल्याचे सरपंच प्रतिनिधी नारायण हरी पाटील यांनी सांगितलेसदर कामांसाठी मोठया प्रमाणात निधीची आवश्यकता असतांना ग्रामपंचायतीला १४ व्या वित्त आयोगाअंतर्गत केवळ रुपये ६ लाख रुपये इतका निधी मिळतो. त्यातून सरकार सेवा केंद्राकरीता रुपये १ लाख ४७ हजार निधी द्यावा लागतो. उर्वरित रक्कमेतून विकासाची मोठी कामे करणे ग्रामपंचायतीला शक्य होत नाही. त्यामुळे गावाच्या विकास खुंटला आहे. यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे