शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

उपेक्षित उभरांडी गाव विकासापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 23:08 IST

निजामपूर : साक्री तालुक्यातील माळमाथ्यावर निजामपूरजवळ असलेले उभरांडी गाव अजूनही विकासापासून वंचित आहे. या गावाचा विकास व्हावा, यासाठी सातत्याने ...

निजामपूर : साक्री तालुक्यातील माळमाथ्यावर निजामपूरजवळ असलेले उभरांडी गाव अजूनही विकासापासून वंचित आहे. या गावाचा विकास व्हावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा करुनही अनेक वर्षांपासून हे गाव उपेक्षितच राहिले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.उभरांडी हे लहानसे गाव स्वातंत्र्य मिळून ७२ वर्षे होऊनही विकास कामांच्या बाबतीत मागे राहिले आहे. होडदाणे व उभरांडी गावे मिळून ग्रुप ग्रामपंचायत आहे.परंतू ग्रामपंचायत कार्यालय खूप जुने असून त्यात कपाटे, २ टेबल आणि १० खुर्च्या ठेवल्या तर जेमतेम १५ ते १६ लोक बसू शकतील. १८०० वस्तीच्या गावाची ग्रामसभा होणे अशक्य आहे. त्यातच आॅनलाईन यंत्रणा कुठे ठेवावी, असा प्रश्न आहे.विविध ग्रामविकासाची कामे व्हावीत, यासाठी ग्रामपंचायतीची सातत्याने लोप्रतिनिधींकडे फिरफिर सुरु असते. मात्र, अद्यापपर्यंत खासदार निधीतून एकही काम झालेले नसल्याचे उभरांडीच्या सरपंच विनिता नारायण पाटील यांनी सांगितले.उभरांडी ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठयाच्या विहीरीला भरपुर पाणी आहे. मात्र, त्या पाण्यात क्षाराचे प्रमाण अतिशय जास्त असून ते मळकट लागते. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी ते पाणी धोकेदायक आहे. म्हणून गावासाठी १५०० लिटरच्या पाणी फिल्टर प्लांटची नितांत गरज निर्माण झाली आहे.गावात सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटारी नाहीत. ग्रामपंचायतीने काही ठिकाणी थोडयाफार गटारी केल्या आहेत. मात्र, गावभर उघडया गटारीतून दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असते. अंडरग्राऊंड गटारी करिता शासन निधीची गरज आहे.गावात पूर्वीचे मातीचे रस्ते आहेत. आदिवासी वस्तीत थोडे काँक्रीट रस्ते झाले आहेत. गावात रस्ते व्हावेत यासाठी निधी नाही. पेव्हरब्लॉक बसवणे गरजेचे झाले आहे. शिवाय गावात समाजमंदीराची नितांत आवश्यकता आहे. लहान-लहान गावात आमरधाम आहेत. मात्र, या गावासाठी अमरधाम नाही. गाव दरवाजा नाही.निजामपूरकडून गावाकडे येणारा रस्ता अत्यंत खाचखळग्याचा आहे. रस्त्याच्या उर्वरित भागाचे पुननिर्माण होण्यासाठी लोकप्रतिनिधींकडे अनेक खेटे घातल्याचे सरपंच प्रतिनिधी नारायण हरी पाटील यांनी सांगितलेसदर कामांसाठी मोठया प्रमाणात निधीची आवश्यकता असतांना ग्रामपंचायतीला १४ व्या वित्त आयोगाअंतर्गत केवळ रुपये ६ लाख रुपये इतका निधी मिळतो. त्यातून सरकार सेवा केंद्राकरीता रुपये १ लाख ४७ हजार निधी द्यावा लागतो. उर्वरित रक्कमेतून विकासाची मोठी कामे करणे ग्रामपंचायतीला शक्य होत नाही. त्यामुळे गावाच्या विकास खुंटला आहे. यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे