शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
देशातील मुस्लिमांना दाबले जाते, म्हणून पहलगाम हल्ला झाला; रॉबर्ड वाड्रांचे धक्कादायक वक्तव्य
5
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
6
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
7
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
9
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
10
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
11
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
15
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
16
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
17
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
18
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
19
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
20
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!

सोशल माध्यम साक्षरता काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 14:05 IST

सोशल माध्यम साक्षरता काळाची गरज मानवाने कालौघात तंत्रज्ञानाच्या मदतीने फार  मोठी प्रगती साधत आधुनिक जीवनशैलीची कास धरली आहे. कधी ...

सोशल माध्यम साक्षरता काळाची गरज

मानवाने कालौघात तंत्रज्ञानाच्या मदतीने फार  मोठी प्रगती साधत आधुनिक जीवनशैलीची कास धरली आहे. कधी काळी तंत्रज्ञानाच्या बाबतीत अनेक साधनांचा अभाव आज अनेक बाबतीत आपल्या आवाक्यात आला आहे. दूरदर्शनच्या उपलब्धतेनंतर संगणक आणि अलीकडच्या  अँड्रॉइड मोबाईलमुळे सगळ्या तंत्रज्ञानाच्या बाबी अगदी सुलभ आपल्या हातात येऊन पोहचल्या आहेत. इंटरनेटमुळे तर माध्यमाच्या  माहितीची  देवाणघेवा अगदी जलद गतीने व्हायला लागली आहे. आज आपल्या शहरात व अगदी खेड्यापाड्यात सहजच महागडे अँड्रॉइड मोबाईल फोन उपलब्ध आहेत. या माध्यमातून अनेक सोशल नेटवर्किंग च्या माध्यमातून जगातील कुठलीही माहिती सेकंदाला आपल्यापर्यंत येऊन पोहचत आहे .एकप्रकारे माहितीचा भडीमारच सतत सुरु आहे. या सगळ्या बाबी हाताळताना मात्र माध्यमसाक्षरता ज्या प्रमाणात व्हायला हवी ती झालेली नाही. व्हाट्सअप, फेसबुक या सारख्या माध्यमातून संदेश किंवा माहितीची देवाणघेवाण करताना कुठलीही सत्यता आपण पडताळून पाहत नाही़ अनेक प्रकारच्या समाजविघातक बाबीबाबत ‘आलाय मेसेज करा फॉरवर्ड’ असा पवित्रा वापरकर्त्यांच्या दिसतो़ या बाबतीत सोशल माध्यम हाताळताना माहितीची पडताळणी व  सत्यता किती लोक तपासून पाहतात, हा मोठा प्रश्न आहे तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबर ते वापरण्याच्या बाबतीतली साक्षरता व जागृती निर्माण होण्याची गरज आहे. या तंत्रज्ञानाचा वापर विधायक कामासाठी व्हावा़

 वसंत कुलकर्णी, धुळे

टॅग्स :Dhuleधुळे