शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 14:44 IST

धुळ्यातल्या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हैं तो सेफ हैं अशी नवी घोषणा दिली आहे.

Maharashtra Assembly Election 2024 : गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेची जोरदार चर्चा सुरु आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आलेल्या योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगेची घोषणा दिली होती. आता धुळे येथे झालेल्या प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी घोषणा देत 'एक हैं तो सेफ हैं', असे म्हटले होते. बटेंगे तो कटेंगे या घोषणेची ही पुढची आवृत्ती असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

याआधी वाशिममध्ये निवडणूक प्रचारादरम्यान योगी आदित्यनाथ यांनी, हम एक हैं तो नेक हैं और एक हैं तो सेफ हैं, असं विधान केलं होतं. आपल्यात विभाजन व्हायला नको. जेंव्हा आपल्यात फूट पडली तेंव्हा आम्ही कापले गेलो आहोत, असेही योगी आदित्यनाथ म्हणाले होते. धुळ्यातील सभेत पंतप्रधान मोदी यांनी, काँग्रेस एका जातीला दुसऱ्या जातीविरोधात उभे करण्याचा धोकादायक खेळ खेळत असल्याचे म्हटलं आहे.

"आदिवासींची ओळख, अनुसूचित जाती जमातींची एकता तोडण्याचे काम काँग्रेस करत आहे. आदिवासी जातींची एकजूटता काँग्रेसला सहन होत नाहीये. काँग्रेसचा अजेंडा आहे की, देशभरातील आदिवासी जाती एकमेकांविरुद्ध लढत रहाव्यात, त्यांची सामूहिक आदिवासी ताकद संपायला हवी. धर्माच्या नावावर असाच कट काँग्रेसने रचला होता तेव्हा देशाचे विभाजन झालं होतं. आता काँग्रेस अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसी समाजाच्या जातींना एकमेकांविरुद्ध उभं करत आहे. भारताच्या विरुद्ध यापेक्षा मोठा कट कुठलाही असू शकत नाही. आदिवासी जेव्हा एकत्र राहतील तेव्हाच त्यांची ताकद वाढेल. वेगवेगळ्या जातींमध्ये विभागले गेल्यानंतर तुमची ताकद कमी होईल. त्यामुळेच मी म्हणत आहे एक हैं तो सेफ हैं. आपल्याला एकजूट राहून काँग्रेसचा धोकादायक खेळ हाणून पाडून विकासाच्या वाटेवर पुढे जात राहायचे आहे," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

"महाविकास आघाडी हे एक असे वाहन आहे ज्याला ना चाक आहे ना ब्रेक आणि तिथले प्रत्येकजण ड्रायव्हरच्या सीटवर बसण्यासाठी भांडत आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुतीमुळेच महाराष्ट्राचा जलद विकास होईल. आम्ही जनतेला देवाचे दुसरे रूप मानतो, पण काही लोक जनतेला लुटण्यासाठी राजकारण करत आहेत. जेव्हा मी महाराष्ट्राकडे काही मागितले तेव्हा राज्यातील जनतेने मला मनापासून आशीर्वाद दिले आहेत. गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्राच्या विकासाचा जो वेग सुरू आहे तो थांबू दिला जाणार नाही, याची ग्वाही मी देतो. भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकारच महाराष्ट्राला आवश्यक असलेले सुशासन देऊ शकते," असंही पंतप्रधान मोदी म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४north maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकdhule-city-acधुळे शहरNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस