शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 14:44 IST

धुळ्यातल्या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हैं तो सेफ हैं अशी नवी घोषणा दिली आहे.

Maharashtra Assembly Election 2024 : गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेची जोरदार चर्चा सुरु आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आलेल्या योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगेची घोषणा दिली होती. आता धुळे येथे झालेल्या प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी घोषणा देत 'एक हैं तो सेफ हैं', असे म्हटले होते. बटेंगे तो कटेंगे या घोषणेची ही पुढची आवृत्ती असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

याआधी वाशिममध्ये निवडणूक प्रचारादरम्यान योगी आदित्यनाथ यांनी, हम एक हैं तो नेक हैं और एक हैं तो सेफ हैं, असं विधान केलं होतं. आपल्यात विभाजन व्हायला नको. जेंव्हा आपल्यात फूट पडली तेंव्हा आम्ही कापले गेलो आहोत, असेही योगी आदित्यनाथ म्हणाले होते. धुळ्यातील सभेत पंतप्रधान मोदी यांनी, काँग्रेस एका जातीला दुसऱ्या जातीविरोधात उभे करण्याचा धोकादायक खेळ खेळत असल्याचे म्हटलं आहे.

"आदिवासींची ओळख, अनुसूचित जाती जमातींची एकता तोडण्याचे काम काँग्रेस करत आहे. आदिवासी जातींची एकजूटता काँग्रेसला सहन होत नाहीये. काँग्रेसचा अजेंडा आहे की, देशभरातील आदिवासी जाती एकमेकांविरुद्ध लढत रहाव्यात, त्यांची सामूहिक आदिवासी ताकद संपायला हवी. धर्माच्या नावावर असाच कट काँग्रेसने रचला होता तेव्हा देशाचे विभाजन झालं होतं. आता काँग्रेस अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसी समाजाच्या जातींना एकमेकांविरुद्ध उभं करत आहे. भारताच्या विरुद्ध यापेक्षा मोठा कट कुठलाही असू शकत नाही. आदिवासी जेव्हा एकत्र राहतील तेव्हाच त्यांची ताकद वाढेल. वेगवेगळ्या जातींमध्ये विभागले गेल्यानंतर तुमची ताकद कमी होईल. त्यामुळेच मी म्हणत आहे एक हैं तो सेफ हैं. आपल्याला एकजूट राहून काँग्रेसचा धोकादायक खेळ हाणून पाडून विकासाच्या वाटेवर पुढे जात राहायचे आहे," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

"महाविकास आघाडी हे एक असे वाहन आहे ज्याला ना चाक आहे ना ब्रेक आणि तिथले प्रत्येकजण ड्रायव्हरच्या सीटवर बसण्यासाठी भांडत आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुतीमुळेच महाराष्ट्राचा जलद विकास होईल. आम्ही जनतेला देवाचे दुसरे रूप मानतो, पण काही लोक जनतेला लुटण्यासाठी राजकारण करत आहेत. जेव्हा मी महाराष्ट्राकडे काही मागितले तेव्हा राज्यातील जनतेने मला मनापासून आशीर्वाद दिले आहेत. गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्राच्या विकासाचा जो वेग सुरू आहे तो थांबू दिला जाणार नाही, याची ग्वाही मी देतो. भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकारच महाराष्ट्राला आवश्यक असलेले सुशासन देऊ शकते," असंही पंतप्रधान मोदी म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४north maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकdhule-city-acधुळे शहरNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस