शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 14:44 IST

धुळ्यातल्या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हैं तो सेफ हैं अशी नवी घोषणा दिली आहे.

Maharashtra Assembly Election 2024 : गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेची जोरदार चर्चा सुरु आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आलेल्या योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगेची घोषणा दिली होती. आता धुळे येथे झालेल्या प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी घोषणा देत 'एक हैं तो सेफ हैं', असे म्हटले होते. बटेंगे तो कटेंगे या घोषणेची ही पुढची आवृत्ती असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

याआधी वाशिममध्ये निवडणूक प्रचारादरम्यान योगी आदित्यनाथ यांनी, हम एक हैं तो नेक हैं और एक हैं तो सेफ हैं, असं विधान केलं होतं. आपल्यात विभाजन व्हायला नको. जेंव्हा आपल्यात फूट पडली तेंव्हा आम्ही कापले गेलो आहोत, असेही योगी आदित्यनाथ म्हणाले होते. धुळ्यातील सभेत पंतप्रधान मोदी यांनी, काँग्रेस एका जातीला दुसऱ्या जातीविरोधात उभे करण्याचा धोकादायक खेळ खेळत असल्याचे म्हटलं आहे.

"आदिवासींची ओळख, अनुसूचित जाती जमातींची एकता तोडण्याचे काम काँग्रेस करत आहे. आदिवासी जातींची एकजूटता काँग्रेसला सहन होत नाहीये. काँग्रेसचा अजेंडा आहे की, देशभरातील आदिवासी जाती एकमेकांविरुद्ध लढत रहाव्यात, त्यांची सामूहिक आदिवासी ताकद संपायला हवी. धर्माच्या नावावर असाच कट काँग्रेसने रचला होता तेव्हा देशाचे विभाजन झालं होतं. आता काँग्रेस अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसी समाजाच्या जातींना एकमेकांविरुद्ध उभं करत आहे. भारताच्या विरुद्ध यापेक्षा मोठा कट कुठलाही असू शकत नाही. आदिवासी जेव्हा एकत्र राहतील तेव्हाच त्यांची ताकद वाढेल. वेगवेगळ्या जातींमध्ये विभागले गेल्यानंतर तुमची ताकद कमी होईल. त्यामुळेच मी म्हणत आहे एक हैं तो सेफ हैं. आपल्याला एकजूट राहून काँग्रेसचा धोकादायक खेळ हाणून पाडून विकासाच्या वाटेवर पुढे जात राहायचे आहे," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

"महाविकास आघाडी हे एक असे वाहन आहे ज्याला ना चाक आहे ना ब्रेक आणि तिथले प्रत्येकजण ड्रायव्हरच्या सीटवर बसण्यासाठी भांडत आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुतीमुळेच महाराष्ट्राचा जलद विकास होईल. आम्ही जनतेला देवाचे दुसरे रूप मानतो, पण काही लोक जनतेला लुटण्यासाठी राजकारण करत आहेत. जेव्हा मी महाराष्ट्राकडे काही मागितले तेव्हा राज्यातील जनतेने मला मनापासून आशीर्वाद दिले आहेत. गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्राच्या विकासाचा जो वेग सुरू आहे तो थांबू दिला जाणार नाही, याची ग्वाही मी देतो. भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकारच महाराष्ट्राला आवश्यक असलेले सुशासन देऊ शकते," असंही पंतप्रधान मोदी म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४north maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकdhule-city-acधुळे शहरNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस