शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 21:14 IST

सततच्या पावसाचा खरीपांच्या पिकांना फटका : मंगळवारी झालेल्या पावसामुळे शेती शिवारांना आले तळ्याचे स्वरूप

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसाने कहर केलेला आहे. मंगळवारी रात्री शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांना मुसळधार पावसाने झोडपून काढले. दमदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. नद्यांना पूर आला. मात्र सर्वाधिक नुकसान खरीप पिकांचे झालेले आहे. कापूससह ज्वारी, बाजरी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. दरम्यान मंगळवारी सर्वाधिक पाऊस धुळे तालुक्यात झाल्याची नोंद आहे.यावर्षी मृग नक्षत्रापासूनच समाधानकारक पाऊस होत आलेला आहे. त्यामुळे पिकांची स्थिती अतिशय चांगली होती. कोरोनाच्या काळात उत्पन्न चांगले येईल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यानंतर होत असलेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या या आशेवर पाणी फिरवले आहे.सप्टेंबर महिन्याच्या ४ व ५ तारखेला जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. यामुळे ज्वारी, मका, बाजरी, या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. धुळे व साक्री तालुक्यातील एकूण १४४६ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधीत झाल्याचा कृषी विभागाचे म्हणणे आहे.यातून बळीराजा सावरत नाही, तोच १९ सप्टेंबर रोजी जिल्हयातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले. तर मंगळवारी झालेल्या दमदार पावसामुळे खरीपाच्या आशा जवळपास संपुष्टात आलेल्या आहेत.शिरूड परिरास सर्वाधिक नुकसानधुळे तालुक्यातील शिरूड तालुक्यात मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शिरूड भागात मंगळवारी सायंकाळी ७ ते साडेसात वाजेपर्यंत मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर रात्री नऊ पर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. या पावसामुळे खरीपाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक शेतकºयांच्या शेतात ज्वारी, बाजरीची तोडणी झाली असून, कणसे काढण्याचे काम सुरू होते. मात्र पावसामुळे या कणसांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वादळामुळे कपाशीच्या कैºया गळून पडल्या आहेत. अनेक शेतांमध्ये तलाव साचलेले आहेत. पाण्याचा निचरा कसा करावा असा प्रश्न शेतकºयांसमोर उभा राहिलेला आहे. बोरी परिसरातील सुमारे ६० ते ७० गावांना मुसळधार पावसाचा फटका बसलेला आहे.वडजाईमंगळवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे पीके जमीनदोस्त झाली. शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मंगळवारी सायंकाळी सायकाळी सहा ते सात वाजेदरम्यान वादळवाº्यासह मुसळधार पाऊसाला सुरुवात झाली. तब्बल दोन ते अडीच तास झालेल्या पावसानमुळे कपाशी, सोयाबीन, बाजरी, आदि पिके वाº्यामुळे जमीनदोस्त झाली. अतिपावसामुळे कपाशी लाल पडली आहे. झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी सहाय्यक प्रिती भदाने सह तलाठी दत्तात्रय लहामगे यांनी शेतकºयांना सोबत घेऊन शेतात प्रत्यक्ष पाहणी केली. आदेश मिळताच पंचनामे सुरू करू असे त्यांनी सांगितले. सायंकाळी झालेल्या मुसळधार पाऊसात शेतकº्याचे खूप हाल झाले. नदी नाले तुडुब भरून वाहत असल्याने काही शेतकºयांना शेतातच मुक्काम करावा लागला. नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकºयांना भरपाई मिळावी अशी मागणी कैलास बाविस्कर, संतोष देवरे, शरद देवरे, संजय जगदाळे , दिलीप देवरे, संजय महाराज, लोटने देवरे, प्रकाश देवरे, रामकृष्ण सुर्यवंशी आदींनी केली आहे.विंचूरबोरी व कान्होळी नदीच्या परिसरात शिरूड व बोरकुंड मंडळात गेल्या आठवड्यापासून सलग व मंगळवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने परिसर झोडपून काढला. ऐन काढणीच्या हंगामात कापुससह खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान झालेल्या पिक नुकसानीबाबत पंचनामा करण्यात यावा अशी मागणी शेतकº्यांनी केली आहे. े परिसरात जूनवणे,दोंदवाड, धामणगाव, विसरणे, विंचूर, चांदे, तरवाडे व विशेषता बोरकुंड परिसरात अधिकच पाऊस आल्याने शेतीच नुकसान झाले आहे. कापूस या नगदी पिकाचे उन्हाळ्यात मे च्या शेवटच्या आठवडयात लागवड केलेला कापुस पहिल्या च वेचणीचा कापुस मुसळधार पावसामुळे गळुन पडला. कैºयापण सडल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन पिक नुकसानीबाबत पंचनामा करण्यात यावा अशी मागणी संदिप देवरे, डॉ. अशोक पगारे, विंचूर माजी उपसरपंच जनार्दन देसल, बाबाजी देसले, भाऊसाहेब देसले, बोरकुंडचे सरपंच बाळासाहेब भदाणे, दोंदवाडचे माजी सरपंच हेमलता देवरे, ईश्वर पाटील आदींनी केली आहे.मालपूरशिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे सायंकाळी दमदार पाऊसाने हजेरी लावल्याने शेतशिवारातुन परतीची वाट धरणाºया शेतकºयांसह मजुरांची देखील एकच धांदल उडाली. हा पाऊस रात्रभर सुरुच असल्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे चित्र दिसुन आले.सध्या येथील परीसरात कापुस वेचणीचे मुख्य काम सुरू आहे. दररोज पाऊस येत असल्यामुळे या पावसाची अवस्था अधिकच बिकट होत असुन दुसरीकडे मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे मिळतील तेवढे मजुर घेवुन शेतकरी हातातोंडाशी आलेला घास घरादारात आणण्यासाठी धडपड करत आहे. सायंकाळी पाऊस सुरू झाल्याने, वेचलेला कापुस झाकण्यासाठी तसेच घरात भरण्याच्या हालचालीची एकच धांदल उडाली. पावसामुळे कापुस बाजरी ज्वारी कांदा पिकाला याचा जोरदार फटका बसला आहे. रात्रभर पाऊसाच्या सरी पहाटे चार वाजेपर्यंत सुरू होत्या. याशिवाय कांदा पिकांच्या वाफ्यात सतत पाणी असल्याने पात पिवळी पडत आहे. तर बाजरी ज्वारी भुईसपाट झाल्यामुळे अखेर अस्मानी सुलतानी संकटाचा सामना दरवर्षी येथील शेतकº्यांना करावा लागत आहे.