शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

योग्य मोबदला द्या, अन्यथा शेती परत करा; सुलवाडे - जामफळ - कनोली योजनेत जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:33 IST

यावेळी प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींसह जिल्हाधिकाऱ्यांवर रोष व्यक्त केला. तसेच सरकार देत असलेल्या मोबदल्यात इतर ठिकाणी जमीन घेणे शक्य नाही. ...

यावेळी प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींसह जिल्हाधिकाऱ्यांवर रोष व्यक्त केला. तसेच सरकार देत असलेल्या मोबदल्यात इतर ठिकाणी जमीन घेणे शक्य नाही. उदरनिर्वाहाचे साधन गेल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येऊ शकते, अशी भीती व्यक्त केली. या योजनेत शेतजमिनी संपादित झाल्या आहेत. बाजारभावाच्या चारपट मोबदल्याची मागणी आहे.

साहेबचंद जैन यांनी सांगितले की, सोनगीर, सोंडले परिसरातील शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर शेतजमिनी संपादित केल्याची नोंद केली आहे. जमिनी विक्रीला प्रतिबंध करण्यात आला; परंतु अजूनपर्यंत मोबदला मिळालेला नाही. शासनाने केलेला निवाडा समाधानकारक नाही. त्या निवाड्याची रक्कमही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. सन २०१३-१४ च्या भूसंपादन कायद्यानुसार बाजारभावाच्या चारपट मोबदला द्यावा, तसेच शेतकऱ्यांच्या परवानगीने जमिनी संपादित कराव्या, अशी मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांशी चर्चा न करता जमिनी संपादित केल्याने आता विक्री करता येत नाही, कर्जही मिळत नाही, शासनाच्या योजनांचा लाभदेखील मिळत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. उताऱ्यावरील नोंदी रद्द कराव्यात, शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.