शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

रस्ता होईना, आगरपाड्यात लालपरी जाईना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 11:41 IST

राज्य परिवहन महामंडळ। ठेलारी बांधवांचा पाडा, प्रशासनाच्या कार्यपध्दतीवर ग्रामस्थांची नाराजी

संडे हटके बातमीगणेश जैन । लोकमत न्यूज नेटवर्क बळसाणे :  साक्री तालुक्यातील आगरपाडा हे लहानसे गाव म्हणजे ठेलारी बांधवांचा पाडा़ ‘गाव तेथे रस्ता’ आणि ‘रस्ता तेथे एसटी’ या अनुषंगाने राज्य परिवहन महामंडळाची एसटी धावते़ परंतु आगरपाडा या गावाला जाण्यासाठी रस्ता नसल्याने येथील लोकांचे अतोनात हाल होतांना दिसून येत आहेत़ शालेय विद्यार्थी, वयोवृद्ध, आजारी रुग्ण, प्रसुतीसाठी जाणाºया महिलांना तर जीव मुठीत घेऊन अंतर कापावे लागते, अशी वाईट स्थिती असूनही आजपर्यंत या गावात ‘लालपरी’ अर्थात एसटी पोहचली नसल्याची खंत रहिवाशांनी व्यक्त केली़कढरे ते आगरपाडा व बळसाणे पर्यंत रस्ता तयार असून या रस्त्यावरून एखादी तरी बस सुरू व्हावी, अशी मागणी आता जोर धरत आहे़ आगरपाडा ते कढरे यादरम्यान रस्ता वाहतूकीस खराब असल्याने आणि कढरे गावापासून साधारणत: ५ ते ६ किमी पायी चालत यावे लागते़ तसेच बळसाणे व कढरे या दोन्ही गावात बसेससह खासगी वाहनांची नियमितपणे वर्दळ राहते़ कदाचित आगरपाडा गावाकडे जाण्याच्या रस्तेत सुधारणा राहिली असती तर येथील एसटी बसेस ही आगरपाड्यापर्यंत पोहचली असती तर तेथील लोकांनी ही लालपरीवर प्रवास करण्याचा आनंद घेतला असता़ खराब अशा रस्त्यांमुळे या गावाला आजही एसटीची सेवा पोहचलेली नाही़ एसटी व कुठल्याही प्रकाराचे खासगी वाहन येत नसल्याने तेथील रहिवाशांना मोटरसायकल व बैलगाडीचा वापर करुन बळसाणे अथवा कढरे गावापर्यंत पोहचून एसटीचा पुढील प्रवास करावा लागत असल्याचे ठेलारी बांधवांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़  आगरपाडा हे माळमाथा परिसरातील १०० ते १२५ घरांचे गाव आहे़ गावातील जवळपास १५ ते २० मुल , मुली शिक्षणांसाठी कढरे या गावी पायी जातात़ उन, वारा सहन करुन पाच ते सहा किमी पायीचा प्रवास शाळेच्या दिवशी विद्यार्थ्यांना रोजच करावा लागतो़ या गावात खासगी वाहतुकीचे कोणतेही साधन नाही़ या गावातील रहिवाशांना तसेच विद्यार्थ्यांना पायी प्रवास करावा लागत असल्याने राज्य परिवहन महामंडळाचा ‘गाव तेथे एसटी’ या संकल्पनेला तडा जात आहे़ अशा अनेक समस्यांनी आगरपाडा हे गाव ग्रासलेले आहे़ तसेच गावाच्या विकासाकडे प्रशासनाकडून पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते आहे़ नवस फेडण्यासाठी होतेय गर्दी४आगरपाड्याच्या पायथ्याशी जोगेबा देवस्थान असून याठिकाणी पोळ्याच्या दुसºया दिवशी मोठी यात्रा भरते़ खान्देशभरातून भाविक नवस फेडण्यासाठी गर्दी करतात़ रस्त्याअभावी भाविकांना जोगेबा देवस्थान गाठण्यासाठी मोठ्या प्रमाणावर त्रास सोसावा लागत असल्याचे भाविकांकडून सांगितले जाते़ खराब रस्त्याची अशी ही दैनाआगरपाड्यात जाण्यासाठी कढरे या गावांपासून साधारणपणे ५ ते ६ किमीचा रस्ता असून हा रस्ता पूर्णत: खराब झालेला आहे़ याठिकाणी पायी चालणे देखील अशक्य आहे़ पावसाळ्यात तर चिखल तुडवीत ग्रामस्थांना हा रस्ता पार करावा लागतो़ रस्त्यांअभावी अपघाताला ही आमंत्रण येण्याची शक्यता नाकारता येत नाही़ अपघाताच्या आमंत्रणाला आळा घालण्यासाठी संबंधित विभागाने लक्ष केंद्रित करुन आगरपाड्याच्या रहिवाशांना रस्ता तयार करुन एखादीतरी लालपरी अर्थात एसटीची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, अशी अपेक्षा गावकºयांनी व्यक्त केली आहे़ याकडे साक्री तालुक्यातील लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष असल्याची वस्तुस्थिती आहे़ 

टॅग्स :Dhuleधुळे