कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यावर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:48 IST2021-02-27T04:48:06+5:302021-02-27T04:48:06+5:30
मालपूर येथे नागरिकांना व ग्रामपंचायत प्रशासन तसेच कोविड १९ समितीला कोरोनाचा विसर पडला असून सर्व आलबेल सुरू आहे. लग्न ...

कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यावर भर
मालपूर येथे नागरिकांना व ग्रामपंचायत प्रशासन तसेच कोविड १९ समितीला कोरोनाचा विसर पडला असून सर्व आलबेल सुरू आहे. लग्न समारंभ व अंत्यविधीसाठी घालून दिलेले नियम केवळ कागदावरच शिल्लक आहेत. अशा आशयाचे वृत्त प्रसारीत होताच उपाययोजना सुरुवात करण्यात आली. लग्न समारंभात केवळ ५० लोकांची उपस्थिती तर अंत्यसंस्कारप्रसंगी २० जणांच परवानगी राहील. ग्रामस्थांच्या तोंडावर मास्क नसल्यास दंडात्मक कारवाई तसेच आपत्कालीन कार्यवाही करण्यात येईल. दुकाने भाजीपाला विक्री सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत सुरू राहतील,
यानंतर कडक संचारबंदी लागू होईल सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्रित जमू नये. दुकानावर ग्राहकांना विनामास्क उभे राहू देऊ नये. अन्यथा दुकानदारांवर कार्यवाही करण्यात येईल. असे सर्वानुमते बैठकीत ठरविण्यात आले. याबाबत सायंकाळी गावात दंवडी देण्यात आली. बैठकीला जिल्हा परिषदेच्या सदस्या चंद्रकला पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष महावीरसिंह रावल, लोकनियुक्त सरपंच मच्छिंद्र शिंदे, उपसरपंच तुकाराम पाटील, माजी सरपंच हेमराज पाटील, ग्रामविकास अधिकारी एल.सी. पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हितेंद्र पाटील, रवींद्र पाटील, अरुण धनगर, जगदीश खंडेराव, संतोष कोळी, पोलीस पाटील बापू बागुल, अंगणवाडी सुपरवायझर सुनंदा थोरात, पत्रकार मोहन चव्हाण, सदाशिव भलकार, रवींद्र राजपूत, आदी सह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.