धुळे : उन्हाळा सुरू होताच, ग्रामीण भागात भारनियमन केले जाते. त्यामुळे घरात कूलर, वातानुकूलित यंत्र असूनही काहीच उपयोग होत नाही. विजेची पुरेशा प्रमाणात उपलब्धता आहे. त्यामुळे महावितरणने उन्हाळ्यात भारनियमन करू नये, अशी मागणी आहे.
मीटरप्रमाणे रिक्षाभाडे घेण्यात यावे
धुळे : शहरात तीनचाकी रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र, अनेक मार्गावर सीटनुसार भाडे घेण्यात येते. ते प्रवाशांच्या फायद्याचे आहे. मात्र, लांबच्या ठिकाणी जाण्यासाठी जादा भाड्याची आकारणी केली जाते. अशा प्रवाशांसाठी मीटरनेच भाडे आकारण्याची पद्धत राबविण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होऊ लागली आहे.
मासेमारीतून मिळतो अनेकांना रोजगार
धुळे : उन्हाळा सुरू होताच, शेतीची कामेही आटोपत असतात. त्यामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध होत नाही. अशा स्थितीत काहींनी मात्र मासेमारीतून रोजगार उपलब्ध केलेला आहे. हत्ती डोहात अजूनही पाणी असून, अनेक जण त्या ठिकाणी मासेमारी करतात. त्यानंतर, त्या माशांची बाजारात विक्री करून किमान २०० ते ३०० रुपये कमवित आहेत.
पांझरा नदीपात्रातून वाळू वाहतूक सुरू
धुळे : शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या पांझरा नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या परिसरातून महसूलचे अनेक अधिकारी ये-जा करीत असतात. मात्र, त्यांचेही या प्रकाराकडे दुर्लक्ष हाेत असल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.