शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
3
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
4
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
5
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
6
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
7
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
8
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
9
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
10
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
11
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
12
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
13
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
14
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
15
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
16
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
17
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
18
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
19
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
Daily Top 2Weekly Top 5

मरण झाले स्वस्त; महामारीत कोरोनाने, नंतर रस्ते अपघातामध्ये वाढले मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:24 IST

कोरोनाचा काळ हा जिल्ह्यात मागील वर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झाला होता़ टप्प्या-टप्प्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र ...

कोरोनाचा काळ हा जिल्ह्यात मागील वर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झाला होता़ टप्प्या-टप्प्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून काही निर्बंध लावले गेले़ त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाल्याने रस्त्यावरची वर्दळ थांबली़ धावणारे महामार्गदेखील थांबले़ शहरातील गर्दी कमी झाल्याने अपघाताच्या संख्येत घट झाली़ जे काही अपघात झाले ते अगदी बोटावर मोजण्याइतकेच झाले़

आता कोरोनाचा काळ तसा संपुष्टात आलेला आहे़ कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने शासनाकडून लावलेले निर्बंधदेखील बऱ्याच प्रमाणावर हटविण्यात आलेले आहेत़ रस्त्यावरील वर्दळ पुन्हा वाढल्याने अपघाताची मालिका पुन्हा सुरू झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे़

लॉकडाऊनमध्ये अपघात झाले कमी; पण...

- कोरोनाचा काळ सुरू झाल्यानंतर रस्त्यावरची वर्दळ हटविण्यासाठी निर्बंध लावण्यात आले होते़ त्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला़ परिणामी, वर्दळ थांबल्यामुळे अपघाताच्या प्रमाणात घट झाली़

- अपघातदेखील कमी झाले असले तरी कोरोनाचा त्रास मात्र अनेकांना असह्य करून गेला़ त्यात काही जणांनी स्वत:ला सावरले तर काही जणांनी आपला प्राण त्यागला़ अपघात आणि कोरोना हे एकसारखे ठरले़

पायी चालणाऱ्या

व्यक्तींनाही धोका

- कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या वेळी अपघात होईल हे आजच्या या धावपळीच्या जगात कोणीही सांगू शकत नाही़ अगदी आपण पायी चालत असताना आपल्या पाठीमागून वेगाने येणारे वाहन आपल्याला धडकून केव्हा निघून जाईल, हे कोणीही सांगू शकत नाही़

मृतांमध्ये सर्वाधिक

तरुणांचा समावेश

- वाहने अतिशय वेगाने चालविणाऱ्यांमध्ये सर्वाधिक तरुणांचा समावेश आहे़ हे कोणीही नाकारू शकत नाही़ शहरात आणि महामार्गावर त्यांचे वेगाने वाहन चालविण्याचे प्रमाण बऱ्यापैकी म्हणावे लागेल़ त्यांच्यामुळे अपघात इतका मोठा होता की अक्षरश: स्वत:चा अथवा दुसऱ्याचा जीव घेतो़

वेळ मौल्यवान; पण जीवन अमूल्य

- वाहन चालविताना प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी़ आपल्यामुळे स्वत:ला आणि दुसऱ्याला त्रास होणार नाही याकडे देखील गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे़

-केतन चौधरी

- शहरात प्रत्येकाने वाहन हे वेगाची मर्यादा सांभाळून चालविण्याची गरज आहे; पण महामार्गाप्रमाणे वाहने वेगाने चालविली जातात़ अपघाताला वेग हेच कारण म्हणावे लागेल़

-महेश सोनवणे