शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

धुळेकर हरवितात दिवसाला ४ मोबाइल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:37 IST

धुळे : माेबाइल लंपास होण्याचे प्रमाण कमी अधिक होत असताना जबरी चोरी आणि घरफोडीच्या घटनेतदेखील मोबाइल लांबविल्याचा प्रकार ...

धुळे : माेबाइल लंपास होण्याचे प्रमाण कमी अधिक होत असताना जबरी चोरी आणि घरफोडीच्या घटनेतदेखील मोबाइल लांबविल्याचा प्रकार समोर आलेला आहे. घटनेनंतर प्रत्येकाची नोंद होतेच असे नाही. पण, पोलिसात नोंद झाल्यानंतर साधारणपणे ३५ ते ४० टक्के प्रमाण हे मोबाइल संबंधिताना शोधून देण्याचे असल्याचे सूत्रांनी सांगितले.

जीवनावश्यक वस्तुंप्रमाणे आता मोबाइल ही चैनीची नसून गरजेची बाब झाली आहे. संवादाचे प्रमुख माध्यम म्हणून त्याकडे पाहण्यात येते. गर्दीच्या ठिकाणी मोबाइल लांबविण्याचे प्रमाण तुलनेने जास्त असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. याशिवाय जबरी चाेरी आणि घरफोडीच्या माध्यमातूनदेखील मोबाइल लांबविण्याचे प्रमाण घडलेले आहे, हे नाकारुन चालणार नाही. पण, असे असलेतरी पोलिसात नोंद झाल्यानंतर त्याचा तपास ऑनलाइन पद्धतीने केला जातो. ३५ ते ४० टक्के प्रमाण हे माेबाइल शोधण्याचे आहे.

गर्दीच्या ठिकाणी मोबाइलची चोरी

शहरातील आग्रा रोड, पाचकंदीलसह अन्य गर्दीची ठिकाणे चोरट्यानी आपल्या नजरेसमोर ठेवलेली असल्याचे एकंदरीत चित्र पहावयास मिळत आहे. याठिकाणी सकाळी आणि सायंकाळी नेहमीपेक्षा अधिकची गर्दी राहते. शिवाय लग्नसराई असेल तर या मार्गावर पायी चालणे देखील मुश्कील होत असते. शिवाय एकांत ठिकाणी देखील मोबाइल लांबविल्याचा प्रकार वेळोवेळी घडत असतो. चोरट्यांनी याकडे लक्ष केंद्रित केल्याचे चित्र प्रकर्षाने समोर येत आहे. ग्रामीण भागातही अशीच काहीसी स्थिती पहावयास मिळत आहे.

३५ ते ४० टक्के मोबाइल शोधण्याचे प्रमाण

वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या वेळेस नागरिकांचे मोबाइल लंपास होण्याचे प्रमाण समोर आले आहे. त्यात मोबाइल हरविण्यासोबतच घरात चोरी झाल्यानंतर, हातातून माेबाइल हिसकावून घेतल्यानंतर याप्रमाणे त्या त्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्याचा शोध घेण्यात सुरुवात होत असते. वर्षभरात मोबाइल चोरीच्या प्रमाणातील तुलनेत ३५ ते ४० टक्केे लांबविलेले मोबाइल पुन्हा संबंधितांकडे सुपुर्द करण्यात आलेले आहेत. त्यानुसार पोलीस ठाण्यात देखील तशी नोंद घेण्यात येत असते.

नागरिकांनी आपल्या वस्तू सुरक्षितपणे सांभाळणे गरजेचे आहे. सद्याच्या काळात मोबाइल ही गरजेची बाब झाली असून नेमके त्याचकडे अनेकांकडून दुर्लक्ष केले जाते. ही बाब योग्य नाही. आपल्या वस्तू आणि त्यातल्या त्यात मोबाइल फोन हा नीट सांभाळणे आवश्यक असताना नेमके त्याचकडे दुर्लक्ष केले जाते. पोलीस ठाण्यात नोंद झाल्यानंतर पोलीस तपास करतातच. पण, आपला मोबाइल आपण नीट सांभाळला तर त्याची चोरी होऊ शकत नाही. प्रत्येकाने नीटपणे काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

- चिन्मय पंडित, पोलीस अधीक्षक, धुळे