शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

प्रत्येक गावापर्यंत पोहोचविला विकास निधी - डॉ.सुभाष भामरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 21:09 IST

केंद्र व राज्य सरकारच्या प्रभावी कामगिरी हाच प्रचाराचा मुद्दा

धुळे : धुळे लोकसभा मतदारसंघाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरवित मी मतदारसंघासह देशाचा सन्मान वाढविण्यासाठी योगदान दिले. लोकप्रतिनिधी या नात्याने प्रत्येक गावापर्यंत विकास निधी पोहोचवून अपेक्षापूर्ती करण्यात यश मिळविले असल्याचा दावा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री व भाजपाचे संभाव्य उमेदवार डॉ.सुभाष भामरे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत केला.लोकसभा निवडणुकीत भाजपातर्फे दुसऱ्यांदा निवडणूक लढविण्यास डॉ.भामरे हे इच्छुक आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांची पाच वर्षांतील कारकिर्द, निवडणुकीतील मुद्दे यासंबंधी चर्चा केली.प्रश्न : लोकसभा निवडणूक तुम्ही कोणत्या मुद्यांवर लढणार आहात?डॉ.भामरे : तीन मुद्यांवर मी निवडणूक लढविणार आहे. पहिला म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने पाच वर्षांत केलेली लोककल्याणकारी कामे तसेच जागतिक पातळीवर भारताला सन्मान मिळवून देण्यासाठी झालेले प्रयत्न, दुसरा मुद्दा म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने शेतकरी आणि विविध समाजघटकांसाठी केलेली कामे, तिसरा मुद्दा म्हणजे, धुळे लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी माझ्याकडून व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यात आलेले यश...हे तीन मुद्दे घेऊन मी पुन्हा मतदारांपुढे जाणार आहे.प्रश : आपल्या कार्यकाळातील ठळक कामे कोणती?डॉ.भामरे : मनमाड इंदूर रेल्वे मार्ग, राज्य महामार्गांना राष्टÑीय महामार्गांचा दर्जा आणि चौपदरीकरण, सुलवाडे-जामफळ योजना, विखरणला सौर उर्जा प्रकल्प, झोडगे येथे पॉलीकॅब फॅक्टरी, नार-पार पाणी योजनेला गती, मालेगावला लॉजिस्टिक पार्क , सटाणा येथील ५ सिंचन प्रकल्प मार्गी, धुळ्याच्या विकास कामांसाठी भरीव निधी ही ठळक कामे आहेत.प्रश्न : केंद्रीय मंत्रिमंडळात आपण असल्याने त्याचा लाभ या मतदारसंघाला आपण किती करुन देऊ शकलात?डॉ.भामरे : मंत्रिपदाचा १०० टक्के लाभ या मतदारसंघाला करुन दिला. जी कामे मार्गी लागली, ती अनेक अडचणींमुळे खूप वर्षे प्रलंबित होती. निव्वळ खासदार म्हणून त्याचा केवळ पाठपुरावा करु शकलो असतो. परंतु, मंत्रिमंडळातील सहकारी या नात्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, अरुण जेटली, नितीन गडकरी, उमा भारती, सुरेश प्रभू, स्मृती इराणी या मंत्र्यांनी मला अमूल्य असे सहकार्य केले.प्रश्न : केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री म्हणून देश-विदेश पातळीवर आपण प्रतिनिधीत्व केले, कसा होता एकूण अनुभव?डॉ. भामरे : वैयक्तीक मला आणि या मतदारसंघाला अभिमान वाटावा, अशी कामगिरी संरक्षण मंत्रालयात काम करताना करु शकतो, हे माझे सद्भाग्य म्हणावे लागेल. संयुक्त राष्टÑ संघात मी देशाची बाजू मांडली. पाकिस्तानविषयक धोरणांमध्ये देशाची कूटनिती प्रभावी ठरली. सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक, जवान चंदू चव्हाण व विंग कमांडर अभिनंदन यांची सुखरुप सुटका, कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी चाललेले प्रयत्न हे दृष्यस्वरुपात सगळा देश पहात आहे. जगात भारताची नवी ओळख निर्माण करण्याचे कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे. सैनिकांच प्रश्न सोडविणे तसेच आपत्ती काळात सामान्य नागरिकांना सहकार्य केल्याची अनेक उदाहरणे आहेत.प्रश्न : विकास कामांमध्ये आलेल्या अडथळ्यांविषयी काय सांगाल?डॉ. भामरे : मी विरोधकांचा आभारी आहे. कारण त्यांनी अडथळे आणि आरोप केले नसते तर ही कामे घेऊन मला जनतेपर्यंत जाण्याची संधी मिळाली नसती. प्रत्येक अडथळा प्रयत्नपूर्वक दूर केला आणि आरोप पुराव्यानिशी खोडून टाकला.

टॅग्स :Dhuleधुळे