शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

प्रत्येक गावापर्यंत पोहोचविला विकास निधी - डॉ.सुभाष भामरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 21:09 IST

केंद्र व राज्य सरकारच्या प्रभावी कामगिरी हाच प्रचाराचा मुद्दा

धुळे : धुळे लोकसभा मतदारसंघाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरवित मी मतदारसंघासह देशाचा सन्मान वाढविण्यासाठी योगदान दिले. लोकप्रतिनिधी या नात्याने प्रत्येक गावापर्यंत विकास निधी पोहोचवून अपेक्षापूर्ती करण्यात यश मिळविले असल्याचा दावा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री व भाजपाचे संभाव्य उमेदवार डॉ.सुभाष भामरे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत केला.लोकसभा निवडणुकीत भाजपातर्फे दुसऱ्यांदा निवडणूक लढविण्यास डॉ.भामरे हे इच्छुक आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांची पाच वर्षांतील कारकिर्द, निवडणुकीतील मुद्दे यासंबंधी चर्चा केली.प्रश्न : लोकसभा निवडणूक तुम्ही कोणत्या मुद्यांवर लढणार आहात?डॉ.भामरे : तीन मुद्यांवर मी निवडणूक लढविणार आहे. पहिला म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने पाच वर्षांत केलेली लोककल्याणकारी कामे तसेच जागतिक पातळीवर भारताला सन्मान मिळवून देण्यासाठी झालेले प्रयत्न, दुसरा मुद्दा म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने शेतकरी आणि विविध समाजघटकांसाठी केलेली कामे, तिसरा मुद्दा म्हणजे, धुळे लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी माझ्याकडून व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यात आलेले यश...हे तीन मुद्दे घेऊन मी पुन्हा मतदारांपुढे जाणार आहे.प्रश : आपल्या कार्यकाळातील ठळक कामे कोणती?डॉ.भामरे : मनमाड इंदूर रेल्वे मार्ग, राज्य महामार्गांना राष्टÑीय महामार्गांचा दर्जा आणि चौपदरीकरण, सुलवाडे-जामफळ योजना, विखरणला सौर उर्जा प्रकल्प, झोडगे येथे पॉलीकॅब फॅक्टरी, नार-पार पाणी योजनेला गती, मालेगावला लॉजिस्टिक पार्क , सटाणा येथील ५ सिंचन प्रकल्प मार्गी, धुळ्याच्या विकास कामांसाठी भरीव निधी ही ठळक कामे आहेत.प्रश्न : केंद्रीय मंत्रिमंडळात आपण असल्याने त्याचा लाभ या मतदारसंघाला आपण किती करुन देऊ शकलात?डॉ.भामरे : मंत्रिपदाचा १०० टक्के लाभ या मतदारसंघाला करुन दिला. जी कामे मार्गी लागली, ती अनेक अडचणींमुळे खूप वर्षे प्रलंबित होती. निव्वळ खासदार म्हणून त्याचा केवळ पाठपुरावा करु शकलो असतो. परंतु, मंत्रिमंडळातील सहकारी या नात्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, अरुण जेटली, नितीन गडकरी, उमा भारती, सुरेश प्रभू, स्मृती इराणी या मंत्र्यांनी मला अमूल्य असे सहकार्य केले.प्रश्न : केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री म्हणून देश-विदेश पातळीवर आपण प्रतिनिधीत्व केले, कसा होता एकूण अनुभव?डॉ. भामरे : वैयक्तीक मला आणि या मतदारसंघाला अभिमान वाटावा, अशी कामगिरी संरक्षण मंत्रालयात काम करताना करु शकतो, हे माझे सद्भाग्य म्हणावे लागेल. संयुक्त राष्टÑ संघात मी देशाची बाजू मांडली. पाकिस्तानविषयक धोरणांमध्ये देशाची कूटनिती प्रभावी ठरली. सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक, जवान चंदू चव्हाण व विंग कमांडर अभिनंदन यांची सुखरुप सुटका, कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी चाललेले प्रयत्न हे दृष्यस्वरुपात सगळा देश पहात आहे. जगात भारताची नवी ओळख निर्माण करण्याचे कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे. सैनिकांच प्रश्न सोडविणे तसेच आपत्ती काळात सामान्य नागरिकांना सहकार्य केल्याची अनेक उदाहरणे आहेत.प्रश्न : विकास कामांमध्ये आलेल्या अडथळ्यांविषयी काय सांगाल?डॉ. भामरे : मी विरोधकांचा आभारी आहे. कारण त्यांनी अडथळे आणि आरोप केले नसते तर ही कामे घेऊन मला जनतेपर्यंत जाण्याची संधी मिळाली नसती. प्रत्येक अडथळा प्रयत्नपूर्वक दूर केला आणि आरोप पुराव्यानिशी खोडून टाकला.

टॅग्स :Dhuleधुळे