शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

पाऊस होऊनही कांदे लागवडीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 23:10 IST

मालपूर परिसर : मुख्य पीक असूनही पूर्वतयारीच्या काळातील पाणीटंचाईचा विपरित परिणाम

मालपूर : यंदा शिंदखेडा तालुक्यात मालपूरसह ग्रामीण भागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली आहे. जोरदार पावसामुळे पुन्हा मूग पीक घेऊन त्या क्षेत्रावर मोठ्या आशेने कांदा लागवड सुरू आहे. तर काही गावाच्या क्षेत्रात या पिकावर कीटकनाशक फवारणी व रासायनिक खतांची मात्रा देण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड दिसून येत आहे. लागवडीवेळी असलेल्या पाणीटंचाईचा विपरित परिणाम लागवडीवर झाला असून त्यात घट झाली आहे.मालपूरसह संपूर्ण परिसरात कांदा शेतकºयांचे मुख्य पीक आहे. त्यामुळे या संपूर्ण परिसरात कांद्याची लागवड पूर्वी मोठ्या प्रमाणात होते. यंदा मात्र पावसाळ्यापूर्वीच्या पाणीटंचाईमुळे कांद्याचे लागवड क्षेत्र घटले आहे. २० जुलैनंतर झालेल्या पावसाने शेतकºयांच्या आशा पल्लवित केल्या. मात्र कांदा लागवडीसाठी खूप आधीपासून नियोजन करावे लागते. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्यासाठी कांदा रोप टाकावे लागते. त्यानंतर महिना-सव्वा महिन्यानंतर कांदा रोपांची मजुरांच्या माध्यमातून प्रत्यक्ष शेतांमध्ये लागवड करण्यात येते. मात्र यंदा या काळात पाण्याची तीव्र टंचाई असल्याने शेतकºयांना रोपे टाकता आली नाहीत. परिणामी कांदा लागवड घटली आहे.बहुतांश शेतकºयांनी दूर अंतरावरून रोपे आणून कांदा लागवड केली. तर काही शेतकºयांची तयारी नसल्याने त्यांच्याकडून लागवडीचे काम अद्याप सुरू आहे. कांदा पिकाने परिसरातील अनेक शेतकºयांची प्रगती झाली आहे. मात्र बºयाच वेळा बाजारात घेऊन गेलेला माल अत्यल्प दरामुळे तेथेच सोडून शेतकºयांना घरी परतावे लागल्याची अनेक उदाहरणे स्वत: शेतकरी सांगतात. त्यामुळे कांदा लागवड म्हणजे एकप्रकारे जुगार असल्याचे प्रत्ययास येते. गेल्या वर्षी शेतकºयांना या पिकांच्या उत्पन्नात मोठा तोटा झाला होता. मध्यप्रदेश राज्यातील इंदूर व नाशिक जिल्ह्यातील उमराणे येथील बाजार समित्यांत येथील शेतकºयांनी मातीमोल भावाने कांदा विक्री केली होती. तेव्हा २ ते ६ रूपये प्रतिकिलोने कांदा विक्री झाला होता. शेतकºयांच्या आंदोलनानंतर राज्यात विक्री झालेल्या कांद्यास सरकारकडून अनुदान प्राप्त झाले. मात्र इंदूर तसेच नंदुरबार येथे कांदा विक्री केलेल्या शेतकºयांना या अनुदानाचा लाभ न मिळाल्याने त्यांच्या पदरी निराशा पडली.मात्र या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करून शेतकºयांनी नव्या उमेदीने व अपेक्षेने कांद्याची लागवड केली आहे. सध्या दर्जेदार कांद्याला प्रतिक्विंटल ३४०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. एवढा जरी भाव मिळाला तरी येथील शेतकरी समाधानी राहतील. परंतु शेतकºयांचा कांदा बाजारात दाखल होतो तोपर्यंत हा भाव टिकून रहावा, अशी आशा शेतकºयांनी व्यक्त केली.सध्या परिसरात सर्वत्र कांदा लागवडीसह काही शेतकºयांची मशागत, कीडनाशक फवारणी, खते देण्यासाठी धावपळ सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे