शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

निम्मा पावसाळा होऊनही धरणे कोरडीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:38 IST

शिरपूर : तालुक्यात निम्मा पावसाळा होऊनही पिकांना पोषक व धरणेदेखील पाण्याने भरलेली नसताना गत आठवड्यापासून तालुक्यात सर्वत्र पाऊस झाल्यामुळे ...

शिरपूर : तालुक्यात निम्मा पावसाळा होऊनही पिकांना पोषक व धरणेदेखील पाण्याने भरलेली नसताना गत आठवड्यापासून तालुक्यात सर्वत्र पाऊस झाल्यामुळे पिके टवटवीत दिसू लागली आहेत़ आतापर्यंत सरासरीच्या ६१ टक्के इतका पाऊस तालुक्यात झाला आहे़ बहुतांश धरणेदेखील अद्याप निम्मीदेखील भरलेली नाहीत़

जून व जुलै या दोन महिन्यांत तालुक्यात केवळ ३२ टक्के पाऊस झाला होता़ जूनच्या पहिल्या आठवड्यात सर्वत्र पाऊस झाल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी केली़ सुरुवातीच्या नक्षत्रातील दमदार पावसामुळे सर्वांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या़ मात्र पुन्हा पावसाने दडी मारली आणि शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या़ त्यानंतर पुन्हा पावसाची कृपादृष्टी झाली़ मात्र त्यानंतर पावसाने दांडी मारल्यामुळे पिके कोमेजू लागली होती़ पाण्याअभावी पिकांची वाढ खुंटवू लागली़ शिरपूर तालुक्यातील १ लाख ४ हजार १७३ हेक्टर सर्वसाधारण खरीप क्षेत्रापैकी आतापर्यंत ९९ हजार ७५६ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड करण्यात आली आहे़ ९५़.७५ टक्के खरीप पिकांची लागवड झाली आहे़

ऑगस्ट महिन्याचे निम्मे दिवस होऊनही पाऊस झाला नाही़ दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले़ तशातच १७ रोजी तालुक्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला, काही मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली़ दुसऱ्या, तिसऱ्या दिवशीदेखील सलग असे ३ दिवस पाऊस झाला़ त्यामुळे कोमेजलेली पिकेदेखील टवटवीत दिसू लागलीत़ २१ रोजीपर्यंत मंडळनिहाय झालेला पाऊस पुढीलप्रमाणे- शिरपूर ३९५ मिमी, थाळनेर- २१४, होळनांथे- २४६, अर्थे- २६५, जवखेडा-२५६, बोराडी- ३७०, सांगवी-२८३ मिमी पाऊस आतापर्यंत झाला आहे़

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या करवंद धरणाची पाण्याची उपयुक्त क्षमता १८.२६ दलघमी असताना आतापर्यंत या पावसाळ्यात केवळ ४.८९ दलघमी पाण्याचा साठा म्हणजेच २६.७८ टक्के पाण्याने भरले आहे़ गतवर्षी या धरण परिसरात ७०१ मिमी पाऊस झाला असतांना आतापर्यंत २६५ मिमी पाऊस झाला आहे़

अनेक धरणांची ४९़२७ दलघमी क्षमता असताना १८.३१ म्हणजेच ३७.२६ टक्के पाण्याने भरली आहेत. गतवर्षी या धरण परिसरात ६२५ मिमी पाऊस झाला असतांना यावर्षी आतापर्यंत केवळ १४५ मिमी पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे़ तसेच तालुक्यातील बहुतांश लघु प्रकल्पातदेखील पाण्याचा ठणठणाट आहे़

दरम्यान, हतूनर धरणाचे १४ दरवाजे उघडण्यात आल्यामुळे ते पाणी तापी नदीत सोडण्यात येत आहे़ त्यामुळे तापी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे़