शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
4
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
5
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
6
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
7
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
8
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
9
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
10
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
11
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
12
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
13
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
14
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
15
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
20
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे जीवन जगणे झाले अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 22:00 IST

संडे अँकर । हमालांची व्यथा, कोरोना आल्यापासून कामांची बोहोनी देखील होत नसल्याची व्यक्त झाली खंत़

दोंडाईचा : कोरोना संचारबंदीत बाजार समिती व इतर ठिकाणी हमालीवर गुजराण करण्याऱ्या हमाल-कष्टकरीचे जीवन जगणे अशक्य झाले आहे. चार-चार दिवस बोहोनोही होत नसल्याने खायचे काय? एवढे कठीण दिवस कधीही पाहिले नाहीत, कसे-बसे जीवन जगत असल्याची व्यथा हमाल बांधवांनी मांडली.कोरोना पार्श्वभूमीवर शासनाने संचारबंदी लागू केल्याने लहान विक्रेत्याचेही हाल झालेत. अनेकांचे व्यवसाय बंद झाले. हातावर पोट भरणाºया हमालांचे सर्वाधिक हाल झालेत. सुमारे १३५ दिवस झाले असून अजूनही कोरोना संसर्ग कमी व्हायला तयार नाही. अशा परिस्थितीत दोंडाईचा शहरातील हमाली करून गुजरान करणाºया हमालांची स्थिती हलाखीची झाली आहे. दोंडाईचा शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती व स्टेशन भागातील महादेव मंदिर म्हणजे पार ओटा या ठिकाणी हमाल बांधव लोटगाडी घेऊन थांबलेले असतात.कोरोनामुळे शासनाने संचारबंदी घोषित केली. नंतर जनता कर्फ्यू, नंतर दोंडाईचा बंद, पुन्हा पाच दिवसांचा दोंडाईचा जनता कर्फ्यूमुळे बाजार समिती बंद होती. सुरुवातीचे काही दिवस जीवनावश्यक वस्तू सोडता सर्वच दुकाने बंद आदींमुळे हमाल बांधवांना हमाली मिळणे मुश्किल झाले. आर्थिक दु:ख विसरण्यासाठी काही हमाल व्यसनाधीन झालेत. कोणीतरी येईल आपल्याला साहित्य नेण्यास सांगून हमाली देईल अशा केविलवाणी नजरेने हमाल येणाºया जाणाºयाचे निरीक्षण करतात़सद्य परिस्थितीत बाजार समिती बंद आहे. मार्केट सुरु होते तेव्हा हमाली ४०० ते ५०० रुपये मिळत होती़ आता जेमतेम ५० रुपये मिळतात, तर कधी - कधी बोहोनीही होत नाही. अशा विपरीत परिस्थितीत घर कसे चालवायचे? असा प्रश्न हमाल बांधव पुढे पडला आहे.डोळ्यात अश्रू आले़़़कोरोनामुळे दोंडाईचातील हमाल बांधवाची आर्थिक परिस्थिती चांगलीच हलाखीची झाली आहे. गेल्या ३० वर्षांपासून हमाली करीत असून एवढे वाईट दिवस कधीच पाहिले नाहीत, तेवढे वाईट दिवस कोरोनामुळे आलेत. अशी आपबीती सांगताना महेश पारधीच्या डोळ्यात अश्रु तरळलेत. कोरोना मुळे सर्वच हमाल बांधवांची हलाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाने सर्वच सर्वस्व गमाउन बसल्याने घर खर्च कसा करावयाचा असा प्रश्न पडल्याचे हमालांनी सांगितले.कोरोना मुळे आमचे जगणे असह्य झाले आहे. दिवसाला ३०० ते ४०० रुपये हमाली मिळायची, आता जेमतेम ५० रुपये मिळतात. कधी कधी चार चार दिवस बोहोनीही होत नाही़ अशा विपरीत परिस्थितीत आम्ही खायचे काय? घर खर्च कसा करावयाचा? शासनाने आम्हास आर्थिक मदत घ्यावी़- नाना पवार, दोंडाईचा

टॅग्स :Dhuleधुळे