शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

शाळा बंदमुळे आवारात झाडेझुडपे वाढले, स्वच्छतेची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:44 IST

धुळे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षापासून जिल्हा परिषदेच्या शाळा बंद आहेत. त्यामुळे परिसरात काटेरी झुडपांसह गवतही मोठ्या प्रमाणात ...

धुळे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षापासून जिल्हा परिषदेच्या शाळा बंद आहेत. त्यामुळे परिसरात काटेरी झुडपांसह गवतही मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. या शाळा परिसरांमध्ये स्वच्छता होणे गरजेचे आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर राज्य शासनाच्यावतीने ग्रामीण भागातील ८ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत. मात्र, पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग ॲानलाइन पद्धतीने सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थीच नसल्याने, गेल्या दीड वर्षापासून स्वच्छता मोहीमच रखडलेली आहे. काही शाळांचा परिसर तेथील शिक्षक स्वच्छ ठेवत असले तरी काही शाळांच्या परिसरात झुडपे, गवत मोठ्या प्रमाणावर वाढलेली दिसून येतात.

सध्या शाळेत विद्यार्थी येत नसले तरी शिक्षकांची उपस्थिती असते. येत्या काही महिन्यांत शाळा सुरू झाल्यास, विद्यार्थ्यांना याचा मोठा धोका होऊ शकतो. त्यामुळे शाळांचा परिसर स्वच्छ होणे गरजेेेचे आहे.

वर्गखोल्यांमधील धूळ हटेना

ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू असताना वर्षभर काही ना काही कार्यक्रम होत असतात. त्यामुळे शाळेत नीटनेटकेपणा ठेवला जातो. वर्गखोल्यांमध्येही विशेष स्वच्छता करण्यात येत असते.

मात्र गेल्या दीड-दोन वर्षांपासून शाळा बंदच आहेत. त्यामुळे खोल्यांमध्येही जळमटेशिवाय धूळ मोठ्या प्रमाणात झालेली असून, त्यांचीही स्वच्छता होणे गरजेेचे आहे.

जबाबदारी कोणाची?

ग्रामीण भागात गावपातळीवर शाळा व्यवस्थापन समिती असते. तसेच शिक्षक-पालक संघ असतो. या समितीच्या माध्यमातून शाळांची कामे, शाळा सुविधा व गुणवत्तेवर लक्ष ठेवले जात असते. मात्र, कोरोनामुळे विद्यार्थ्यांविनाच शाळा असल्याने, अनेक शाळा अस्वच्छतेच्या कचाट्यात सापडलेल्या आहे. अशा स्थितीत शाळा स्वच्छतेची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न निर्माण झालेला आहे.

शिक्षकांची उपस्थिती किती

जिल्हा परिषद शाळा सुरू झालेल्या नाहीत. मात्र ऑनलाइन व ऑफलाइन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे शिक्षकांची उपस्थिती पूर्ण आहे.

जिल्ह्यात ग्रामीण भागातील खासगी प्राथमिक शाळाही बंद आहेत. मात्र त्या ठिकाणचा परिसर स्वच्छ ठेवण्यात येत असतो. त्याचप्रमाणे जि. प. शाळांचा परिसरही स्वच्छ ठेवण्याची गरज आहे.