शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

खंडीत वीजपुरवठ्याने नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 12:11 IST

मुख्य वीज वाहिन्या आठवड्यात तीन वेळा तुटल्या : स्वस्तधान्य दुकानांपासून बँकांपर्यंतची कामे ठप्प

मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे विद्युत वीज उपकेंद्र असून देखील विजेचा लपंडाव होतो. सुराय चौफुलीवर आठवड्यातून तीनदा मुख्य वाहिनीच्या तारा तुटल्या. भरदिवसा तारा तुटत असल्यामुळे जीवीत हानी होण्याचा गंभीर धोका उद्भवू शकतो. तर विजे अभावी स्वस्तधान्य दुकानापासून ते बँकेच्या शाखेपर्यंत विविध कामांसाठी नागरिक ताटकळत असतात. याबाबत वरिष्ठांनी योग्य दखल घ्यावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.मालपूर येथे अमरावती मध्यम प्रकल्पात ३३/११ केव्ही क्षमतेचे विद्युत विज उपकेंद्र असून स्वतंत्र तीन फिडर आहेत. मात्र हे ‘केंद्र कुचकामी आहे की कर्मचारी’ हा सध्या शोधाचा विषय परसरात बोलला जात आहे. पाऊस असो किंवा नसो वीज पुरवठा सतत खंडीत होतो. गावात वीज उपकेंद्र असून काय उपयोगाचे अशी नागरिकांमध्ये चर्चा होते.सुराय रस्ता चौफुली येथे नेहमी वर्दळ असते. सुराय, चुडाणे, अक्कलकोस व कर्ले, परसोळे, साक्रीकडे जाणारे प्रवासी तसेच जवळच माध्यमिक शाळा असून या शाळेच्या पटांगणाजवळू गेलेल्या सुराय रस्ता चौफुलीवरच्या मुख्य वीज वाहिनीच्या तारा या आठवड्यात तीन वेळा तुटल्या. भरदिवसा या तारा तुटत असून जीवीत हानी होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.वीज पुरवठा खंडीत होताच येथील सेंट्रल बँकेची कनेक्टीव्हीटी सुद्धा खंडीत होते. तसेच सरकार मान्य स्वस्तधान्य दुकानावरील इलेक्ट्रॉनिक वजन काटा बंद पडून अक्षरश: धान्य दुकानापासून ते बँकेच्या शाखेपर्यंत नागरिक ताटकळतांना दिसून येतात. वेळेवर काम होत नसल्यामुळे ग्रामस्थ हैराण असून कंपनीच्या वरिष्ठ अधिकाºयांनी याची दखल घ्यावी अशी मालपूर ग्रामस्थांची मागणी  आहे.

टॅग्स :Dhuleधुळे