अनियमित पावसात कापूस पिकाची काळजी महत्वाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:17 IST2021-09-02T05:17:32+5:302021-09-02T05:17:32+5:30
न्याहळोद : यावर्षी अत्यंत कमी पावसात पिकांची वाढ होत आहे . शेतकऱ्यांनी वेळोवेळी मशागत व खतांची मात्रा ...

अनियमित पावसात कापूस पिकाची काळजी महत्वाची
न्याहळोद : यावर्षी अत्यंत कमी पावसात पिकांची वाढ होत आहे . शेतकऱ्यांनी वेळोवेळी मशागत व खतांची मात्रा दिली असली तरी पाऊस नसल्याने पिकांच्या वाढीस अन्नद्रव्ये न मिळाल्याने कापूस फुटण्यापूर्वीच कापूस पीक लाल पडत आहे . नाशिकचे विभागीय जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सुनील वानखेडे यांनी जापी परिसरात पीक पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे .शेतकऱ्यांनी एक गाव एक वाण ही संकल्पना राबवावी . गुलाबी बोन्ड अळी व्यवस्थापन करून कीड नियंत्रण करणे . यासाठी कामगंध सापळे वापरावे . कापूस वेचणी चालू झाली तरी गरजेनुसार खतांची मात्रा व फवारणी करावी , असे मार्गदर्शन उपस्थित शेतकऱ्यांना केले .
यावर्षी अत्यंत कमी पाऊस आहे . पिकांना खते दिली त्या प्रमाणात पाणी न मिळाल्याने उष्णता वाढली . त्यातच कडक ऊन यामुळे पाऊस लाल पडून पिक जळत आहे कृषी विभाग कंडे या बाबत तक्रारी होत असल्या कारणाने विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी सुनील वानखेडे , उपविभागीय कृषी अधिकारी मालपुरे , तालुका कृषि अधिकारी वाल्मिक प्रकाश , मंडळ कृषि अधिकारी मनीषा पाटील , कृषि पर्यवेक्षक एस पी देवरे कृषि सहाय्यक राकेश परदेशी व मनोज वानखेड़े यांनी क्षेत्रीय भेट न्याहळोद परिसरातील जापी येथे भेट दिली .
मोठ्या खंडानंतर पाऊस आल्यावर पिकात मर रोग येतो , हिरवी पाने पिवळी लाल होतात , बोनडे किंवा फुल पाते गळून पडतात . यास ग्रामीण भागात लाल्या म्हणतात . यासाठी पाण्याचा निचरा करावा , कॉपर ऑक्सिक्लोराईड व युरिया यांचे द्रावण झाडांच्या मुळापर्यंत जाईल असे टाकावे असे उपाययोजना सांगितल्या आहेत