शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
2
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
3
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
4
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
5
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
6
राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
7
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
9
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
10
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
11
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
12
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
13
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   
14
पक्के घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेची मुदत वाढवली, कशी आहे प्रक्रिया?
15
१८ महिन्यांनी राहु-केतु गोचर: शनीशी अशुभ युती संपणार; ८ राशींना बंपर लाभ होणार, शुभच घडणार!
16
परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' सोडला, दिग्दर्शक प्रियदर्शन यांची आली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणाचे नाव बदलून 'शहीद हिंदू घाटी पर्यटन स्थळ' करा, उच्च न्यायालयात याचिका
18
भाच्याच्या प्रेमासाठी पतीची हत्या करुन शेजाऱ्यांना पाठवलं जेलमध्ये, सत्य समजताच हादरले पोलीस
19
3 दिवसांत सर केली हिमालयाची 5 शिखरे, CISFच्या महिला अधिकाऱ्याची ऐतिहासिक कमगिरी
20
जम्मू-काश्मीरमधील सुरनकोट मंदिरावरील हल्ल्यात पाकिस्तानचा हात; SIA कडून मोठा खुलासा

‌उमेदवार गावात.. मतदार शेतात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:29 IST

मात्र मतदार आपल्या जवळचा असला तरी त्याला भेटण्यात उमेदवाराला अडचण येऊ लागली आहे. त्याला कारणही तसेच आहे. सध्या ग्रामीण ...

मात्र मतदार आपल्या जवळचा असला तरी त्याला भेटण्यात उमेदवाराला अडचण येऊ लागली आहे. त्याला कारणही तसेच आहे. सध्या ग्रामीण भागात शेतीची कामे जोरात सुरू आहेत. त्यामुळे मजूर वर्ग, शेतकरी वर्ग सकाळी ८ वाजेपासूनच शेताकडे रवाना होत आहे. तसेच दिवसभर काम करून सायंकाळी घरी परतत आहे. त्यामुळे दिवसभरात ग्रामीण भागात अतिशय शुकशुकाट असतो. लहान मुले, ज्येष्ठ मंडळीशिवाय गावात चिटपाखरू नसते. त्यामुळे उमेदवार गावात आणि मतदार शेतात अशी स्थिती निर्माण झालेली आहे.

अशा स्थितीत उमेदवाराला प्रचारासाठी काही मोजके तास मिळत आहेत. सकाळी एक- दीड तास व सायंकाळी दीड-दोन तास. एवढ्या कमी कालावधीत प्रचार करताना, आपली बाजू मांडताना उमेदवारांना सध्या चांगलीच कसरत करावी लागत आहे. कारण आता मतदानासाठी अवघे सातच दिवस शिल्लक राहिलेले आहेत. अशीच स्थिती राहिली तर प्रचार कसा करायचा, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.

पक्षीय पाठबळ नाही

नगरपालिकेपासून लोकसभा निवडणुकीपर्यंत उमेदवारांना पक्षाचे पाठबळ असते. पक्षाचे नेते उमेदवाराच्या प्रचारासाठी येत असतात. विविध ठिकाणी बैठका, मेळावे घेत असतात. त्यामुळे सर्वच पक्षांच्या उमेदवारांची बाजू भक्कम होत असते. मात्र या निवडणुकीत तसे नाही. उमेदवारच पक्ष आणि उमेदवारच नेता अशी स्थिती आहे. त्यामुळे स्वबळावर प्रचार करूनच मतांचा जोगवा मागावा लागत असल्याचे चित्र ग्रामीण भागात बघावयास मिळत आहे.