शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
2
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
3
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
4
२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा?
5
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या
6
Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा
7
अलर्ट! चप्पलचीही असते एक्सपायरी डेट; 'ही' लक्षणं दिसताच ताबडतोब बदला अन्यथा होईल पश्चाताप
8
Lunchbox recipe: मुलं पालकाची भाजी खात नाहीत? डब्यात द्या टेस्टी पालक पुडला; दोनाऐवजी चार खातील
9
धक्कादायक! ठाण्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच मालगाडीसमोर ढकललं
10
ऋतुराज गायकवाडनं चांगली संधी गमावली! आयत्या वेळी इंग्लंडला न जाण्याचा निर्णय घेत संघाला दिला धक्का
11
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
12
'अशी ही बनवाबनवी'चं शूटिंग झालेलं या ठिकाणी, लीलाबाई काळभोर यांचा बंगला आहे तरी कुठे?, जाणून घ्या
13
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
14
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
15
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
16
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
17
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
18
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
19
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
20
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

‌उमेदवार गावात.. मतदार शेतात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:29 IST

मात्र मतदार आपल्या जवळचा असला तरी त्याला भेटण्यात उमेदवाराला अडचण येऊ लागली आहे. त्याला कारणही तसेच आहे. सध्या ग्रामीण ...

मात्र मतदार आपल्या जवळचा असला तरी त्याला भेटण्यात उमेदवाराला अडचण येऊ लागली आहे. त्याला कारणही तसेच आहे. सध्या ग्रामीण भागात शेतीची कामे जोरात सुरू आहेत. त्यामुळे मजूर वर्ग, शेतकरी वर्ग सकाळी ८ वाजेपासूनच शेताकडे रवाना होत आहे. तसेच दिवसभर काम करून सायंकाळी घरी परतत आहे. त्यामुळे दिवसभरात ग्रामीण भागात अतिशय शुकशुकाट असतो. लहान मुले, ज्येष्ठ मंडळीशिवाय गावात चिटपाखरू नसते. त्यामुळे उमेदवार गावात आणि मतदार शेतात अशी स्थिती निर्माण झालेली आहे.

अशा स्थितीत उमेदवाराला प्रचारासाठी काही मोजके तास मिळत आहेत. सकाळी एक- दीड तास व सायंकाळी दीड-दोन तास. एवढ्या कमी कालावधीत प्रचार करताना, आपली बाजू मांडताना उमेदवारांना सध्या चांगलीच कसरत करावी लागत आहे. कारण आता मतदानासाठी अवघे सातच दिवस शिल्लक राहिलेले आहेत. अशीच स्थिती राहिली तर प्रचार कसा करायचा, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.

पक्षीय पाठबळ नाही

नगरपालिकेपासून लोकसभा निवडणुकीपर्यंत उमेदवारांना पक्षाचे पाठबळ असते. पक्षाचे नेते उमेदवाराच्या प्रचारासाठी येत असतात. विविध ठिकाणी बैठका, मेळावे घेत असतात. त्यामुळे सर्वच पक्षांच्या उमेदवारांची बाजू भक्कम होत असते. मात्र या निवडणुकीत तसे नाही. उमेदवारच पक्ष आणि उमेदवारच नेता अशी स्थिती आहे. त्यामुळे स्वबळावर प्रचार करूनच मतांचा जोगवा मागावा लागत असल्याचे चित्र ग्रामीण भागात बघावयास मिळत आहे.