येथील पाच प्रभागांतून १५ जागांसाठी ४१ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यात परिवर्तन पॅनेलने १३ जागांवर विजय मिळवित बाजी मारली. विजयी उमेदवार व कंसात त्यांना मिळालेली मते अशी- किरण शिवाजी देवरे(६१६), मन्सुरी प्रविशहाबानो प्यारेलाल( ५१३), रेखाबाई अशोक सोनवणे(४०५), विष्णू देवराम गायकवाड(४४४), सुनील शालीग्राम पवार(४३७), ज्योती बालू ठाकरे(६०१),चंद्रकांत पंडितराव देवरे(६४१),सुंदरबाई दौलतराव देवरे(५७२),शैलजा राजेंद्र देवरे(४४८),विजय देवीदास देवरे (४०४),वनमाला रत्नाकर बागुल(४७९),प्रतिभा उमेश देवरे(६३८) अशोक तुळशीराम मोहिते (३२९) तर लोकशाही पॅनेलच्या रंजनाबाई निंबाजी देवरे(३३०) व अपक्ष नरेंद्र आत्माराम देवरे (५०७) हे उमेदवार विजयी झाले आहेत.
निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत गुलालाची उधळण केली. विजयी उमेदवारांनी गावात फेरी काढल्यामुळे अनेकांनी विजयी उमेदवारांचे औक्षण केले. परिवर्तन पॅनेलचे प्रमुख चंद्रकांत देवरे यांचा पराभव व्हावा म्हणून अनेक प्रतिष्ठित मैदानात उतरले होते, पण परिवर्तन पॅनलमध्ये सर्वात जास्त मते मिळाल्यामुळे विरोधकांचे प्रयत्न असफल ठरल्याची चर्चा मात्र सुरू आहे.