शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

१० वर्षानंतर बुराईला पूर, पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 11:24 AM

परतीचा पाऊस : म्हसाळे गाव परिसरात घरांची पडझड, लाखोंचे नुकसान

ठळक मुद्देम्हसाळे गावात घरांची पडझड झाली आहे. शिंदखेडा शहरातील नदीच्या काठावर राहणाºया लोकांना सर्तकतेचा इशारा ॅपावसामुळे पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यात मंगळवारी रात्री    १९२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. परतीच्या पावसामुळे माळमाथ्यावर म्हसाळे गावात घरांची पडझड झाली आहे. तसेच बाजरी, मका आणि कापूस पिकाचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे.  पांझरा आणि बुराई नदीला पूर आला आहे. शिंदखेडा शहरातील नदीच्या काठावर राहणाºया लोकांना सर्तकतेचा इशारा दिला आहे.जिल्ह्यात मंगळवारी रात्री जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे माळमाथ्यावरील म्हसाळे गावात घरांची पडझड झाली आहे.बळसाणे - साक्री तालुक्यातील म्हसाळे गावातील कृष्णा नथ्थू ईशी  यांच्या मातीचे घराचे छत्त कोसळले. त्यात संसारोपयोगी साहित्य  आणि अन्य सर्वच वस्तु त्याखाली दाबल्या गेल्या आहेत.   कृष्णा ईशी यांच्या मुलीचे  ३ नोव्हेंबरला लग्न असल्याने  त्यासाठी केलेली सर्व खरेदीच्या वस्तुही त्यात गेल्या आहेत. त्यामुळे ईशी कुटुंबिय रस्त्यावर आले आहे.याशिवाय गावातील गिरधर माणिक कोळी, विलास भिकनराव पाटील, किशोर  गिरधर ठाकर, जितेंद्र देविदास बोरसे, लटकनबाई सोनवणे, अमृत पारधी , शालीग्राम चव्हाण  यांच्या घरांचीही पडझड झाली आहे. बळसाणे येथील शिवसेना उपविभाग प्रमुख व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य महावीर जैन यांनी गावास  भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. नुकसानीचे पंचनामे करून त्यांना लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी मसाले ग्रामस्थ महावीर जैन , वना जाधव , महेंद्र निकुंभे , प्रशांत माळी , योगेश कोळी , परेश जैन , दादा पाटील , चेतन गिरासे , ईश्वर खैरनार यांनी केली आहे.माळमाथ्यावर बळसाणे, म्हसाळे,  छाडवी गावात मंगळवारी मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला. सुमारे दोन ते अडीच तासापर्यंत पाऊस झाला.शिंदखेडा -  परतीच्या पावसाच्या धुळे तालुक्यातील लामकानी, बोरिस, निकुंभे आदी परिसरात जोरदार  पाऊस झाल्याने बुराई नदीची उपनदी पान नदीला पूर आला. पुराचे पाणी  बुराई नदीत आल्याने बुराईला मोठा पूर आला आहे.  त्यामुळे नदीकाठावर राहणाºया नागरीकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.शिंदखेडा येथील बंधारा चिरणे रस्त्याकडील भाग पावसाने मातीचा भराव खचल्याने येथून बंधारा फुटण्याच्या बेतात होता मात्र धुळे येथील पाटबंधारे विभागाचे अभियंता महाजन व चिमठाणे येथील पाट कर्मचारी यांनी लागलीच जेसीबीच्या साहयाने बुजला म्हणून पुढील अनर्थ              टळला.  धुळे तालुक्यात लामकानी परिसरात  रात्री पाऊस झाल्याने पान नदीला पूर आला. पान नदी ही बेहेड येथे बुराई ला मिळते. त्यामुळे  बुराईला मोठा पूर आला आहे. याआधी सन २००६ मध्ये   बुराई  नदीला पूर आला होता. त्यानंतर १० वर्षानंतर बुराईला असा मोठा                  पूर आला आहे.  त्यामुळे नदीकाठावरील गावातील  नागरिकांनी नदीकाठी एकच गर्दी केली होती. गेल्या चार दिवसापासून होत असरलेल्या परतीच्या जोरदार पावसामुळे  बुराई नदीला मोठा पूर आला आहे. त्यामुळे शहरातील गाव दरवाज्याजवळ राहत असलेल्या नागरीकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. रात्रीतून नदीचे पाणी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने  नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.ॅॅ