शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

शिरपूर तालुक्यात १०३ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 11:33 IST

बंधारे झाले ‘ओव्हरफ्लो’ : तीन दिवसांपासून श्रावणसरींचा दमदार वर्षाव

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : शहरासह तालुक्यात गेल्या ३ दिवसापासून श्रावणसरींचा दमदार वर्षाव होत आहे़ सकाळपासूनच ढगाळ हवामान आहे़ दिवसभर पावसाच्या हलक्या व मध्यम सरींची रिपरिप सुरूच आहे. दरम्यान, आज शेवटचा श्रावण सोमवार होता. मात्र, अद्यापही कोरोनाच्या संकटामुळे भक्तांना दर्शनाचा लाभ घेता आलेला नाही़शहर व परिसरात गेल्या बुधवारपासून मध्यम सरींचा वर्षाव होत आहे़ शिरपूर मंडळात १३ रोजी १० मिमि, १४ रोजी ७९, १५ रोजी ४ तर १६ रोजी १७ मिमि पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे़ रविवारी देखील रिमझिम पावसाच्या सरी पडल्या़ या श्रावणीसरींमुळे वातावरणात मोठा गारठा निर्माण झाला आहे़गेल्या काही दिवसांपासून हुलकावणी देणाऱ्या पावसाने गेल्या ३ दिवसापासून संततधार सुरुच ठेवली असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे़ दरम्यान, धरण क्षेत्रात देखील पाऊस होत असल्यामुळे धरणसाठा वाढ होण्यास मदत होत आहे़ तालुक्यात पावसाची सरासरी ६४६ मिमि असतांना या तालुक्यात आतापावेतो ६६२ मिमि इतका पाऊस झाला आहे, म्हणजेच १०३ टक्के पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे़ गतवर्षी तालुक्यात २३७ टक्के पाऊस झाला होता़१६ रोजी मंडळनिहाय झालेला पाऊस तर कंसात आतापर्यंत झालेला पाऊस पुढीलप्रमाणे- शिरपूर मंडळात १७ मिमि (६६२ मिमि), थाळनेर ८ (६१४), होळनांथे ६ (३१९), अर्थे ८ (५१०), जवखेडा ९ (४३९), बोराडी ७ (४८६), सांगवी मंडळात ७ मिमि (५५०) पावसाची नोंद करण्यात आली आहे़ करवंद येथील मध्यम प्रकल्पात आतापर्यंत ८६़४० टक्के तर अनेर मध्यम प्रकल्पात ४०़५३ टक्के पाण्याचा साठा आहे़ १५ आॅगस्टपासून अनेर धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आल्यामुळे आता पाण्याचा साठात वाढ होत आहे़ तसेच तालुक्यातील १३ पैकी ४ लघु प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट आहे़ निम्मेच्यावर पावसाळा होत आला तरी बुडकी, मिटगांव, रोहिणी, वाडी धरणे कोरडे आहेत़ अभाणपूर ३१ टक्के, बुडकी ०, गधडदेव १६, जळोद २२, कालीकराड १२, खामखेडा ६०, लौकी १२, मिटगांव ०, नांदर्डे २३, रोहिणी ३, विखरण ३३, वाडी ६ तर वकवाड २७ टक्के पाण्याने भरले आहे़१७ रोजी जिल्ह्यात धुळे तालुका- ५ मि.मी., साक्री- ६ मि.मी., शिरपूर- १ मि.मी., शिंदखेडा- २ मि.मी. असा एकूण १४ मि.मी. पाऊस झाला.नेरला सतर्कतेचा इशारानेर- गेल्या ४ ते ५ दिवसांपासून संततधार सुरू आहे. अक्कलपाडा धरणात जलसाठा वाढल्याने धरणाचे चार दरवाजे उघडले आहे. त्यामुळे नदी पात्रात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने नदीला पूर आहे. त्यामुळे नदी काठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन सरपंच शंकरराव खलाणे यांनी केले आहे.