शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूर तालुक्यात १०३ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 11:33 IST

बंधारे झाले ‘ओव्हरफ्लो’ : तीन दिवसांपासून श्रावणसरींचा दमदार वर्षाव

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : शहरासह तालुक्यात गेल्या ३ दिवसापासून श्रावणसरींचा दमदार वर्षाव होत आहे़ सकाळपासूनच ढगाळ हवामान आहे़ दिवसभर पावसाच्या हलक्या व मध्यम सरींची रिपरिप सुरूच आहे. दरम्यान, आज शेवटचा श्रावण सोमवार होता. मात्र, अद्यापही कोरोनाच्या संकटामुळे भक्तांना दर्शनाचा लाभ घेता आलेला नाही़शहर व परिसरात गेल्या बुधवारपासून मध्यम सरींचा वर्षाव होत आहे़ शिरपूर मंडळात १३ रोजी १० मिमि, १४ रोजी ७९, १५ रोजी ४ तर १६ रोजी १७ मिमि पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे़ रविवारी देखील रिमझिम पावसाच्या सरी पडल्या़ या श्रावणीसरींमुळे वातावरणात मोठा गारठा निर्माण झाला आहे़गेल्या काही दिवसांपासून हुलकावणी देणाऱ्या पावसाने गेल्या ३ दिवसापासून संततधार सुरुच ठेवली असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे़ दरम्यान, धरण क्षेत्रात देखील पाऊस होत असल्यामुळे धरणसाठा वाढ होण्यास मदत होत आहे़ तालुक्यात पावसाची सरासरी ६४६ मिमि असतांना या तालुक्यात आतापावेतो ६६२ मिमि इतका पाऊस झाला आहे, म्हणजेच १०३ टक्के पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे़ गतवर्षी तालुक्यात २३७ टक्के पाऊस झाला होता़१६ रोजी मंडळनिहाय झालेला पाऊस तर कंसात आतापर्यंत झालेला पाऊस पुढीलप्रमाणे- शिरपूर मंडळात १७ मिमि (६६२ मिमि), थाळनेर ८ (६१४), होळनांथे ६ (३१९), अर्थे ८ (५१०), जवखेडा ९ (४३९), बोराडी ७ (४८६), सांगवी मंडळात ७ मिमि (५५०) पावसाची नोंद करण्यात आली आहे़ करवंद येथील मध्यम प्रकल्पात आतापर्यंत ८६़४० टक्के तर अनेर मध्यम प्रकल्पात ४०़५३ टक्के पाण्याचा साठा आहे़ १५ आॅगस्टपासून अनेर धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आल्यामुळे आता पाण्याचा साठात वाढ होत आहे़ तसेच तालुक्यातील १३ पैकी ४ लघु प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट आहे़ निम्मेच्यावर पावसाळा होत आला तरी बुडकी, मिटगांव, रोहिणी, वाडी धरणे कोरडे आहेत़ अभाणपूर ३१ टक्के, बुडकी ०, गधडदेव १६, जळोद २२, कालीकराड १२, खामखेडा ६०, लौकी १२, मिटगांव ०, नांदर्डे २३, रोहिणी ३, विखरण ३३, वाडी ६ तर वकवाड २७ टक्के पाण्याने भरले आहे़१७ रोजी जिल्ह्यात धुळे तालुका- ५ मि.मी., साक्री- ६ मि.मी., शिरपूर- १ मि.मी., शिंदखेडा- २ मि.मी. असा एकूण १४ मि.मी. पाऊस झाला.नेरला सतर्कतेचा इशारानेर- गेल्या ४ ते ५ दिवसांपासून संततधार सुरू आहे. अक्कलपाडा धरणात जलसाठा वाढल्याने धरणाचे चार दरवाजे उघडले आहे. त्यामुळे नदी पात्रात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने नदीला पूर आहे. त्यामुळे नदी काठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन सरपंच शंकरराव खलाणे यांनी केले आहे.