शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

'आम्ही ताटकळत उभे असतो, बस थांबतच नाही'; एसटीसाठी विद्यार्थ्यांचा रस्त्यावरच ठिय्या

By चेतनकुमार धनुरे | Updated: August 9, 2023 12:29 IST

दोन तासांच्या ठिय्यात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर अभ्यास करुन केले आंदोलन

तामलवाडी (जि.धाराशिव) : तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बसेस थांबत नसल्याने उघड्यावरच अनेक तास वाट पाहत थांबावे लागते. यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी बुधवारी रस्त्यावरच ठिय्या मांडून दोन तास अभ्यास करीत आंदोलन केले.

तामलवाडी येथील शाळेत लगतच्या माळुंब्रा, पांगरदरवाडी, सांगवी (काटी), सुरतगाव येथील सुमारे दोनशे विद्यार्थी गावातून ये-जा करीत असतात. मात्र, अनेक बसेस या मार्गावर थांबत नाहीत. चालक-वाहकांचे विद्यार्थ्यांशी वर्तन असभ्य असते. निवारा पुरेसा नसल्याने उन्ह-पावसात बराच वेळ या विद्यार्थ्यांची हेळसांड होते. यासंदर्भात मुख्याध्यापक सुहास वडणे यांनी वर्षभरापासून एसटीच्या अधिकाऱ्यांना लेखी पत्र व्यवहार केला आहे.

तरीही बदल होत नसल्याने अखेर बुधवारी शाळेच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडून दोन तास अभ्यास केला. तातडीने सुधारणा नाही झाल्यास विद्यार्थी, पालक, शिक्षक तामलवाडी येथील टोलनाक्यावर आंदोलन छेडणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच सायंकाळी चार ते पाच या वेळेत तुळजापूर डेपोच्या दोन बसेस विद्यार्थ्यांसाठी सोडाव्यात, अशी मागणीही करण्यात आली.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादEducationशिक्षणstate transportएसटीStudentविद्यार्थी