शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

धरणात पाणी, मग गावात का नाही? महिलांनी काढला घागर माेर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 16:26 IST

ईट ग्रामपंचायतीचा गलथान कारभार : पंधरा-पंधरा दिवस पाणी मिळेना

ईट (जि. धाराशिव) : भूम तालुक्यातील सर्वांत माेठी ग्रामपंचायत म्हणून ईटची ओळख. या गावाला मांजरा नदीवरील संगमेश्वर प्रकल्पावरून पाणीपुरवठा हाेताे. या धरणात सध्या चांगला पाणीसाठा आहे. असे असतानाही गावकऱ्यांना मात्र पंधरा-पंधरा दिवस पाणी मिळत नाही. हे सर्व ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळे घडत असल्याचा आराेप करीत महिलांनी शनिवारी थेट ग्रामपंचायत कार्यालयावर घागर माेर्चा काढला. कार्यालयात सरपंच नसल्याने महिलांनी रिकाम्या खुर्चीला हार घातला.

ईट ग्रामपंचायतीअंतर्गत पांढरेवाडी व झेंडेवाडी ही दाेन छाेटी गावेही येतात. पांढरेवाडी गावासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा याेजना आहे. तर ईट गावासाठी मांजरा नदीवरील संगमेश्वर प्रकल्पातून पाणीपुरवठा याेजना राबविण्यात आलेली आहे. प्रकल्पाच्या पायथ्याशी दाेन विहिरी खाेदण्यात आल्या आहेत. या विहिरींनाही मुबलक पाणी आहे. विजेचाही प्रश्न नाही. असे असतानाही ईटकरांना मात्र पंधरा-पंधरा दिवस पाण्यासाठी तरसावे लागत आहे.

ग्रामपंचायतीकडून पाणी याेजनेच्या देखभाल-दुरुस्तीची कामे वेळेवर हाेत नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांना कृत्रिम टंचाईला सामाेरे जावे लागत आहे. दरम्यान, गावचा पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी वेळाेवेळी झाली; परंतु त्याचा फारसा परिणाम झाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी शनिवारी हाती रिकामी घागर घेऊन ग्रामपंचायतीवर धडक माेर्चा काढला. हा माेर्चा कार्यालयात पाेहाेचला असता, सरपंचांची खुर्ची रिकामी हाेती. हे पाहून संतापलेल्या महिलांनी थेट रिकाम्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी केली. 

यानंतर निवेदन उपसरपंच देशपांडे यांनी स्वीकारले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अण्णासाहेब देशमुख, पंचायत समितीचे माजी उपसभापती काकासाहेब चव्हाण, संचालक प्रवीण देशमुख, युवासेना तालुका प्रमुख नीलेश चव्हाण, सुनील देशमुख, सयाजी हुंबे, वंचित आघाडीचे समाधान हाडोळे आदी उपस्थित हाेते.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादagitationआंदोलनWaterपाणी