शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

धरणात पाणी, मग गावात का नाही? महिलांनी काढला घागर माेर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 16:26 IST

ईट ग्रामपंचायतीचा गलथान कारभार : पंधरा-पंधरा दिवस पाणी मिळेना

ईट (जि. धाराशिव) : भूम तालुक्यातील सर्वांत माेठी ग्रामपंचायत म्हणून ईटची ओळख. या गावाला मांजरा नदीवरील संगमेश्वर प्रकल्पावरून पाणीपुरवठा हाेताे. या धरणात सध्या चांगला पाणीसाठा आहे. असे असतानाही गावकऱ्यांना मात्र पंधरा-पंधरा दिवस पाणी मिळत नाही. हे सर्व ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळे घडत असल्याचा आराेप करीत महिलांनी शनिवारी थेट ग्रामपंचायत कार्यालयावर घागर माेर्चा काढला. कार्यालयात सरपंच नसल्याने महिलांनी रिकाम्या खुर्चीला हार घातला.

ईट ग्रामपंचायतीअंतर्गत पांढरेवाडी व झेंडेवाडी ही दाेन छाेटी गावेही येतात. पांढरेवाडी गावासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा याेजना आहे. तर ईट गावासाठी मांजरा नदीवरील संगमेश्वर प्रकल्पातून पाणीपुरवठा याेजना राबविण्यात आलेली आहे. प्रकल्पाच्या पायथ्याशी दाेन विहिरी खाेदण्यात आल्या आहेत. या विहिरींनाही मुबलक पाणी आहे. विजेचाही प्रश्न नाही. असे असतानाही ईटकरांना मात्र पंधरा-पंधरा दिवस पाण्यासाठी तरसावे लागत आहे.

ग्रामपंचायतीकडून पाणी याेजनेच्या देखभाल-दुरुस्तीची कामे वेळेवर हाेत नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांना कृत्रिम टंचाईला सामाेरे जावे लागत आहे. दरम्यान, गावचा पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी वेळाेवेळी झाली; परंतु त्याचा फारसा परिणाम झाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी शनिवारी हाती रिकामी घागर घेऊन ग्रामपंचायतीवर धडक माेर्चा काढला. हा माेर्चा कार्यालयात पाेहाेचला असता, सरपंचांची खुर्ची रिकामी हाेती. हे पाहून संतापलेल्या महिलांनी थेट रिकाम्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी केली. 

यानंतर निवेदन उपसरपंच देशपांडे यांनी स्वीकारले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अण्णासाहेब देशमुख, पंचायत समितीचे माजी उपसभापती काकासाहेब चव्हाण, संचालक प्रवीण देशमुख, युवासेना तालुका प्रमुख नीलेश चव्हाण, सुनील देशमुख, सयाजी हुंबे, वंचित आघाडीचे समाधान हाडोळे आदी उपस्थित हाेते.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादagitationआंदोलनWaterपाणी