शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बकऱ्या चोरताना प्रतिकार केल्याने चोरट्यांनी हल्ला करून शेतकऱ्याचा केला खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 19:47 IST

खून केल्यानंतरही बकऱ्या नाही सोडल्या; हिंगळजवाडीची घटना, चौघांवर गुन्हा दाखल

तेर (जि. धाराशिव) : पत्र्याच्या शेडमधून बकऱ्या चोरून नेत असताना, शेतकऱ्याने प्रतिकार केल्यामुळे चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात संबंधित शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना धाराशिव तालुक्यातील हिंगळजवाडी येथे रविवार व सोमवारच्या मध्यरात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

हिंगळजवाडी येथील शेतकरी तानाजी भगवान मुळे यांची गावाच्या शिवारात शेती आहे. शेतीतील पत्र्याच्या शेडमध्ये त्यांनी बकऱ्या व शेळ्या बांधून ठेवल्या होत्या. नेहमीप्रमाणे रविवारी रात्री ते शेताकडे मुक्कामी गेले होते. दरम्यान, मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास चार चोरट्यांनी त्यांच्या शेतातील पत्र्याचे शेड उचकटून आतील बकऱ्या पळविण्याचा प्रयत्न केला. आवाजाने जागे झालेले शेतकरी तानाजी मुळे यांनी चोरट्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, चारही चोरट्यांनी त्यांच्यावर प्रतिहल्ला चढविला. लाथा-बुक्क्यांसोबतच दगडाने जबर मारहाण केल्यामुळे मुळे यांचा जागीच मृत्यू झाला.

हा प्रकार सकाळी लक्षात आल्यानंतर मयताचा मुलगा विजय मुळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ढोकी ठाण्यात आरोपी संजय राजेंद्र पवार, जितू प्रभू पवार (दोघे रा.तेर), अमोल ईश्वर काळे, ईश्वर रामा काळे (दोघे रा. हिंगळजवाडी) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेची माहिती कळल्यानंतर अपर पोलिस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पवार, ढोकी ठाण्याचे सपोनि. विलास हजारे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली व आरोपींचा शोध सुरू केला.

खून केल्यानंतरही बकऱ्या नाही सोडल्याचारही आरोपींनी शेतकरी तानाजी मुळे यांना दगडाने जबर मारहाण केली. या मारहाणीत काही वेळातच मुळे गतप्राण झाले. यानंतरही चोरट्यांनी शेडमधील २ बकरे व २ शेळ्या, असे ३४ हजार रुपये किमतीचे पशुधन चोरून नेले. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFarmerशेतकरीdharashivधाराशिव