शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Accident: भरधाव वेगाचे बळी; दोन बाईकच्या समोरासमोरील धडकेत दोघे जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 19:39 IST

दोन्ही बाईकचा वेग जास्त असल्याने दोन तरुणांनी गमावले प्राण

लोहारा (जि.उस्मानाबाद) : दोन बाईक समोरासमोर धडकून झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर तीघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात गुरूवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास लोहारा ते पाटोदा रस्त्यावरील बेंडकाळ गावाजवळ झाला. मनमोहन उर्फ नाना कदम व धीरज आनंदगावकर अशी मृतांची नावे आहेत.

तालुक्यातील मार्डीहून लोहाऱ्याकडे धीरज महादेव आनंदगावकर (वय २६), नितिन व्यंकट कोळी (वय २६ दोघे रा. भातागळी) व आकाश भोसले (वय २१ रा.मातोळा ता.औसा) तिघेजण एकाच बाईकवर प्रवास करत होते. तर कानेगाव येथील मनमोहन उर्फ नाना सुभाष कदम (वय ३०), रविकांत ज्ञानदेव कदम (वय ३५) हे दोघे एकाच बाईकवरून मार्डीकडे येत होते. 

दरम्यान, बेंडकाळ गावाजवळ दोन्ही बाईक समोरासमोर धडकल्या. यात मनमोहन उर्फ नाना कदम व धीरज आनंदगावकर हे दोघे जागीच ठार झाले. तर रविकांत कदम, नितिन कोळी, आकाश भोसले हे तीघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना लोहारा शहरातील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उस्मानाबाद येथील शासकीय रूग्णालयाकडे रवाना केले आहे. 

भरधाव वेगाने घेतले दोन बळीदोन्ही दुचाकी भरधाव असल्याने भीषण अपघात झाला. दोन्ही दुचाकीची पुढील चाके तुटली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिस किशोर शेवाळे, आनिल बोदमवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादDeathमृत्यूAccidentअपघात