शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

हलगीच्या गजरात निघाला महावितरणवर मोर्चा; सततच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे ग्रामस्थ वैतागले

By गणेश कुलकर्णी | Updated: September 4, 2023 19:27 IST

महावितरणच्या ईट येथील उपकेंद्रातून ईटसह परिसरातील १७ गावांना वीजपुरवठा केला जातो.

धाराशिव : भूम तालुक्यात सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या ईट गावातील एका डीपीवरून वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे ग्रामस्थ जाम वैतागले असून, वारंवार पाठपुरावा करूनही याबाबत कार्यवाही होत नसल्याने सोमवारी हलगी वाजवत महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त केला.

महावितरणच्या ईट येथील उपकेंद्रातून ईटसह परिसरातील १७ गावांना वीजपुरवठा केला जातो. यासाठी येथे अभियंता, कनिष्ठ यंत्र चालक, लाइनमन, वाहिनी मदतनीस अशी अनेक पदे मान्य आहेत. त्यापैकी काही पदे रिक्त असून, आहेत ते कर्मचारीही कामात हयगय करीत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. अनेकदा फ्युज टाकण्यासाठीही कर्मचारी मिळत नसल्याचे गावकरी सांगतात. वरिष्ठ कार्यालयाकडून देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी नेमलेले ठेकेदारही दुरुस्तीकडे दुर्लक्ष करतात. आवश्यक साहित्याचाही पुरवठा होत नाही. यातूनच येथील नागेवाडी फिडरवर असलेल्या चार डीपींचा विद्युत पुरवठा दोन महिन्यांपासून सतत खंडित होत आहे. येथील सिंगल फेजचे ट्रान्सफॉर्मर सतत नादुरुस्त असतात. मागील तीन दिवसांपासून मुख्य बाजारपेठ असलेल्या या डीपीवरील ग्राहक अंधारात आहेत. रविवारी वीज वितरण कंपनीकडून सिंगल फेजच्या तीन ट्रान्सफॉर्मरचा पुरवठा सुरू करण्यात आला. परंतु, हे तिन्ही ट्रान्सफॉर्मर चालू करण्याअगोदरच ते खराब असल्याचे आढळून आले. यामुळे संतप्त ग्राहकांनी वाजत-गाजत मोर्चा काढून वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी युवा सेनेचे तालुकाप्रमुख नीलेश चव्हाण, मनोज हुंबे, बाळासाहेब जालन, बापू हुंबे, अशोक देशमुख, अशोक लिमकर यांच्यासह ग्राहक उपस्थित होते.

आंदोलनाचा दिला इशाराया डीपीवरील ग्राहकांचा वीजपुरवठा तत्काळ सुरळीत करावा; अन्यथा वीज वितरण कंपनीविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला. तसेच कामचुकार कर्मचाऱ्यांची इतरत्र बदली करून दुसऱ्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीOsmanabadउस्मानाबादelectricityवीज