शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

मौनातून बाहेर येताच तानाजी सावंतांना घातला वादाने 'कर्क'विळखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 10:14 IST

बोलता-बोलता त्यांनी मित्रपक्षालाच अंगावर घेतल्याने त्यांचे बोल पुन्हा वादग्रस्त ठरले आहेत.

उस्मानाबाद : परंड्याचे आमदार तानाजी सावंत आणि त्यांच्या शब्दांना जणू वादाचा कर्कविळखाच बसला आहे. ते जेव्हा-केव्हा बोलतात, तेव्हा त्यांच्या शब्दांसोबतच वादही बाहेर पडतो. दीर्घ काळानंतर नकतेच त्यांनी मौन सोडले होते. यावेळी बोलता-बोलता त्यांनी मित्रपक्षालाच अंगावर घेतल्याने त्यांचे बोल पुन्हा वादग्रस्त ठरले आहेत.तानाजी सावंत धडाकेबाज राजकारणी म्हणून जितके ओळखले जातात तितकेच ते बेधडकही समजले जातात. एखादी गोष्ट पटली नाही तर, कोणताही मुलाहिजा न बाळगता सावंत कोणावरही आपले 'वाक्बाण' चालवतात. या त्यांच्या 'बाण्या'मुळे अनेकदा 'धनुष्याची'ही कोंडी झालेली आहे.

नजिकच्या काळात ते त्यांच्या तिवरे धरण खेकड्यांनी फोडल्याच्या विधानावरुन पहिल्यांदा वादात अडकले होते. या विधानास बेजबाबदार ठरवून त्यांच्याविरुद्ध सर्वाधिक आक्रमक पवित्रा राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला होता. अगदी त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी खेकडे सोडून आंदोलनही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते. त्यानंतर त्यांच्या 'भिखारी' शब्दांवरुनही मोठा गजहब माजविण्यात आला होता. याहीवेळी राष्ट्रवादीच त्यांच्याविरुद्ध अग्रस्थानी होती. शिवाय, त्यांच्या परंडा मतदारसंघात विधानसभेला विरोधात राष्ट्रवादीच असल्याने सावंत व राष्ट्रवादीच्या नेते, पदाधिकाऱ्यांचा छत्तीसचा आकडा आहे.

महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर सावंतांना मंत्रीपद मिळू नये, यासाठी स्वपक्षातील काही नेते जितके प्रयत्नशील होते, त्यापेक्षा काकणभर जास्त राष्ट्रवादीचे नेते प्रयत्न करीत होते. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लॉबिंग झाल्याची चर्चा खुलेपणाने होत होती. याचदरम्यान, त्यांना मंत्रीमंडळातन डावलण्यात आले. यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी खटकल्याचे तेव्हा बोलले गेले.

मात्र, सावंत यांचा ठाकरे यांच्यापेक्षाही जास्त राग कदाचित राष्ट्रवादीवरच असावा, हे त्यांच्या बोलण्यातून जाणवते आहे. सरकारच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच मतदारसंघात येत असताना त्यांनी आपण नाराज नसल्याचे सांगत दीर्घकाळाचे मौन सोडले. यानंतर भूम येथील एका सत्कार समारंभाच्या अनौपचारिक बैठकीत त्यांनी सध्या मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर तोंडसुख घेतले. मराठवाड्यावर पन्नास वर्षे अन्याय झाल्याचे सांगत याला राष्ट्रवादी जबाबदार असल्याचे विधान केले होते. शिवाय, अजित पवार यांचा नामोल्लेख टाळत वाटरग्रीड योजनेला खीळ घातली तर मराठवाडा पेटून उठेल, असा इशारा दिल्याचा एक व्हिडिओ वायरल झाला आहे.

या विधानांना 'हायलाईट'करुन तानाजी सावंत यांच्यासमोर पुन्हा एक नवा वाद उभा करण्यात आला आहे. दरम्यान, याची उलटसुलट चर्चा झडू लागल्यानंतर लगेचच त्यांनी सोशल मिडीयाद्वारे आपल्या वक्तव्यांची मोडतोड करुन विपर्यास करण्यात आल्याचा खुलासा केला आहे. २१ टीएमसी पाण्याच्या बदल्यात गरज पडल्यास आपण राजीनामाही द्यायला तयार असून, या पाण्यासाठी आपला आग्रह कायम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, या त्यांच्या स्पष्टीकरणाने वादाचे वादळ शमणार का. हे पाहणे औत्सक्याचे ठरेल.