शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मौनातून बाहेर येताच तानाजी सावंतांना घातला वादाने 'कर्क'विळखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 10:14 IST

बोलता-बोलता त्यांनी मित्रपक्षालाच अंगावर घेतल्याने त्यांचे बोल पुन्हा वादग्रस्त ठरले आहेत.

उस्मानाबाद : परंड्याचे आमदार तानाजी सावंत आणि त्यांच्या शब्दांना जणू वादाचा कर्कविळखाच बसला आहे. ते जेव्हा-केव्हा बोलतात, तेव्हा त्यांच्या शब्दांसोबतच वादही बाहेर पडतो. दीर्घ काळानंतर नकतेच त्यांनी मौन सोडले होते. यावेळी बोलता-बोलता त्यांनी मित्रपक्षालाच अंगावर घेतल्याने त्यांचे बोल पुन्हा वादग्रस्त ठरले आहेत.तानाजी सावंत धडाकेबाज राजकारणी म्हणून जितके ओळखले जातात तितकेच ते बेधडकही समजले जातात. एखादी गोष्ट पटली नाही तर, कोणताही मुलाहिजा न बाळगता सावंत कोणावरही आपले 'वाक्बाण' चालवतात. या त्यांच्या 'बाण्या'मुळे अनेकदा 'धनुष्याची'ही कोंडी झालेली आहे.

नजिकच्या काळात ते त्यांच्या तिवरे धरण खेकड्यांनी फोडल्याच्या विधानावरुन पहिल्यांदा वादात अडकले होते. या विधानास बेजबाबदार ठरवून त्यांच्याविरुद्ध सर्वाधिक आक्रमक पवित्रा राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला होता. अगदी त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी खेकडे सोडून आंदोलनही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते. त्यानंतर त्यांच्या 'भिखारी' शब्दांवरुनही मोठा गजहब माजविण्यात आला होता. याहीवेळी राष्ट्रवादीच त्यांच्याविरुद्ध अग्रस्थानी होती. शिवाय, त्यांच्या परंडा मतदारसंघात विधानसभेला विरोधात राष्ट्रवादीच असल्याने सावंत व राष्ट्रवादीच्या नेते, पदाधिकाऱ्यांचा छत्तीसचा आकडा आहे.

महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर सावंतांना मंत्रीपद मिळू नये, यासाठी स्वपक्षातील काही नेते जितके प्रयत्नशील होते, त्यापेक्षा काकणभर जास्त राष्ट्रवादीचे नेते प्रयत्न करीत होते. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लॉबिंग झाल्याची चर्चा खुलेपणाने होत होती. याचदरम्यान, त्यांना मंत्रीमंडळातन डावलण्यात आले. यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी खटकल्याचे तेव्हा बोलले गेले.

मात्र, सावंत यांचा ठाकरे यांच्यापेक्षाही जास्त राग कदाचित राष्ट्रवादीवरच असावा, हे त्यांच्या बोलण्यातून जाणवते आहे. सरकारच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच मतदारसंघात येत असताना त्यांनी आपण नाराज नसल्याचे सांगत दीर्घकाळाचे मौन सोडले. यानंतर भूम येथील एका सत्कार समारंभाच्या अनौपचारिक बैठकीत त्यांनी सध्या मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर तोंडसुख घेतले. मराठवाड्यावर पन्नास वर्षे अन्याय झाल्याचे सांगत याला राष्ट्रवादी जबाबदार असल्याचे विधान केले होते. शिवाय, अजित पवार यांचा नामोल्लेख टाळत वाटरग्रीड योजनेला खीळ घातली तर मराठवाडा पेटून उठेल, असा इशारा दिल्याचा एक व्हिडिओ वायरल झाला आहे.

या विधानांना 'हायलाईट'करुन तानाजी सावंत यांच्यासमोर पुन्हा एक नवा वाद उभा करण्यात आला आहे. दरम्यान, याची उलटसुलट चर्चा झडू लागल्यानंतर लगेचच त्यांनी सोशल मिडीयाद्वारे आपल्या वक्तव्यांची मोडतोड करुन विपर्यास करण्यात आल्याचा खुलासा केला आहे. २१ टीएमसी पाण्याच्या बदल्यात गरज पडल्यास आपण राजीनामाही द्यायला तयार असून, या पाण्यासाठी आपला आग्रह कायम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, या त्यांच्या स्पष्टीकरणाने वादाचे वादळ शमणार का. हे पाहणे औत्सक्याचे ठरेल.