शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

नेत्यांसाठी बास ! आता शेतकरी बापासाठी लढू

By चेतनकुमार धनुरे | Updated: August 31, 2023 19:14 IST

भूम येथे शेतकरी पुत्रांनी काढला मोर्चा

भूम (जि.धाराशिव) : सरकार कोणतेही आले तरी शेतकऱ्यांचे प्रश्न कायमच दुर्लक्षित ठेवले जातात. त्यामुळे यापुढे राजकीय नेत्यांसाठी रस्त्यावर उतरणे बंद करुन आता फक्त शेतकरी बापासाठी लढण्याचा निर्धार करीत गुरुवारी असंख्य शेतकरी पुत्रांनी भूम येथे मोर्चा काढला. याद्वारे विविध मागण्यांकडेही त्यांनी लक्ष वेधले.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी शेतकरी पुत्रांनी गुरुवारी भूम येथे आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. सुरुवात शहरातील आठवडी बाजार येथून करण्यात आली. मोर्चाला सुरुवात होताच शेतकऱ्यांनी, त्यांच्या पुत्रांनी बास झाले नेत्यांसाठी, आता लढू फक्त आपल्या शेतकरी बापासाठी, अशी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच २५ टक्के अग्रीम विमा मिळालाच पाहिजे, दुधाला भाव मिळालाच पाहिजे, शेतकरी एकजुटीचा विजय असो, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. मोर्चा आठवडी बाजार येथून साठे चौक, नगर पालिका, ओंकार चौक मार्गे गोलाई येथे धडकला. यावेळी येथे शेतकऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी भर उन्हात शेतकऱ्यांच्या समस्यांवर मनोगत व्यक्त केले. यानंतर उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांना शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादFarmerशेतकरी